Posts

64 कलांच्या देवता, योगिनी परिश्रमपूर्वक त्यांची केलेली आराधना.

  64 कलांच्या देवता योगिनी. परिश्रमपूर्वक त्यांची आराधना. माझ्या प्रिय वाचक मंडळी हो,          काल मी आपल्या सध्याच्या शालेय अभ्यासक्रमाबद्दल लिहिले.  आपला खरा इतिहास, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा तर, महत्वाची बाब म्हणजे त्यांना, त्या बाबत उत्सुकता व कळकळ निर्माण होणे, गरजेचे आहे. त्यासाठी शालेय जीवनातच,म्हणजे, विद्यार्थी दशेत त्यांना, त्याबाबत झलक देणे, योग्य आहे ना?          आपल्या आयुष्यात,   काही योग येतात, मग ते चांगले वा वाईट कसे ही असले तरी, ते का येतात, त्याची समग्र माहिती व जाणिव असणे. हे सुखी जीवनाच्या, दृष्टीने आवश्यक आहे. एक गंमत सांगते. सर्व अनेक ठिकाणी प्रवास करतात.  पण असे एक ठिकाण आहे, ते कित्येक जणांना even टूरच्या कंपनींना माहित नाही.         योगिनी म्हणजे योगाची साधना करणारी महिला. जबलपूर जवळ बेडाघाट च्या पुढे एका टेकडीवर ६४ योगिनींचे मंदीर आहे. तेथे गौरीशंकराचे देऊळ आहे. तिथे सभोवताली ६४ योगिनींच्या मुर्ती आहेत. त्या एक एक ज्ञानाच्या शाखेच्या अधिष्ठित देवता आहेत. पुर्वापार...

आजचे actual शिक्षण व प्रत्यक्षात काय शिकवावयास हवे.

 आजचे शिक्षण आणि प्रत्यक्षात काय शिकवावयस हवे.          छत्रपती शाहूंच्या माता व पित्यांचे जीवन.           स्वागत आहे, तुम्हा चौकस वाचकांचे , या माझ्या Blog मध्ये. इतिहासाकडे बघण्याच्या, माझ्या दृष्टीकोनाकडे, तुम्ही  interest घेऊन व कुतुहलाने, ओढ घेत आहात, याचे समाधान वाटले.          इतिहास फक्त शालेय जीवनातच, लावलेल्या क्रमिक पुस्तकापुरताच नसतो, हो. आपल्याला खरा इति+ हास  शिकवलाच नाही. तो आज ही  अभ्यासक्रमात नाही.  त्याऐवजी इंग्रजी माध्यम म्हणून, परदेशी लेखकांच्या, कादंबरीतील भाग, प्रायमरीत शिकवला जातो.          आता प्रथम आपण, आपल्या स्वधर्मरक्षणासाठी, म्हणजे आपल्यासाठी जो अनोखा त्याग- sacrifice   आपल्या छ. शिवरायांनी केला. त्याला शंभूराजेंनी अवघ्या ८ .९ व्या वर्षी साथ दिली, त्या घटनेचे अध्ययन करू या.  हो. अभ्यासच. सगळ्यांना, आग्राहून सुटका  ही कहाणी माहित आहेच. पण त्याकडे कहाणी म्हणूनच  पाहिलेत. मिठाईच्या पेटार्‍यातून,  दोघांनी...

आ बैल मुझे मार.

Image
 आ बैल मुझे मार.       माझ्या सजग वाचक हो, कालचा लेख, तुम्ही वाचला असेलच. काय समज झाला, की, मी दोन अगदी वेगळेच विषय, चुकून एकत्र टाकले, नाही हं, he दोन्ही विषय, मुद्दामच एकत्र लिहिले आहेत.  दोन्ही प्रकारात, एकच साम्य आहे, ते म्हणजे, " आ बैल मुझे मार " पहिल्यात आपण सामान्य जनता, स्वतः आपल्यावर, जोखीम ओढवून घेतो. त्या मोटरमन वा driver च्या चलाखीमुळे वाचतो. पण आपण जरा गुर्मीतच असतो, मी कसा /कशी चपळ आहे. हे पटतेय का? जर हो तर यापुढे, " जरा संभलके |  तसेच मी, दोन दुकानाचा उल्लेख केला. ते ही, एक प्रकारे, आ बैल मुझे मार ( धंद्यात )  असे धोरण ठेऊन वागतात. मग काय, व्यवसायात, यशा पासून दूर राहतात. त्यांचा माल, उत्कृष्ट असून त्याप्रमाणात मं, फायदा होत नाही. पण सध्या, पुण्याच्या दुकानातील, पुढच्या पिढी ने  नेमके पाऊल उचलले व  आमची कोठे ही शाखा नाही, ही  कल्पना सोडून आपला भरभराट साधला, ये हुई ना बात 👍         ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ

आपली सुरक्षितता आपल्या हातात

Image
 आपली सुरक्षितता आपल्याच हातात..          माझ्या सुज्ञ वाचक हो,  मी काल म्हटलं होते जरा गंमतीच्या कथा लिहीन. पण पेपरातील बातम्या, पुन्हा गंभीर विषयाकडे वळवतात. पण हे सद्यपरिस्थितीत लिहिणे गरजेचे आहे. हा विषय नवीन नाही. वर्षानु वर्षे घटना घडत असल्या, तरी मुंबईकर काही त्यातून धडा         पण हा मी निवडलेला विषय जऽरा शुभ वा अशुभ म्हणता येईल का? तसे तर नाही. पण आपणच आपले दिवस शुभ व  मंगलमय ठरवू शकतो.    हिंदीत एक म्हण आहे, " जान है, तो जहाँ है। हे मला मान्य आहे. त्यामुळे कमाईची साधने, प्राप्त करावयाची तर प्रवास MUST आहे. अन् मुंबईत ट्रेनला पर्याय नाही.   स्टेशनमध्ये शिरकाव होण्यासाठी. तिकिट मिळत नाही. मग दुसरा मार्ग- आडमार्ग पत्करण्यास लोक मजबूर होतात. without ticket travelling. मग TC पासून बचावण्यासाठी, ट्रेनमधून उतरल्या नंतर, लाईनीतून चालत जाऊन, फट असेल, तेथून बाहेर पडणे. हा अपराध आहे, माहित असून ही हाच मार्ग पत्करला जातोय. पण जरा सावध राहा नं! ज्या रूळावरून चालता , तेथे गाडी नाही, ह्याची खात्री करा. ...

बुध भूषण या ग्रंथामधील छ. संभाजी महाराजांचा बहुमोल सल्ला

 बुधभूषणमधील छ. संभाजी महाराजांचा बहुमोल सल्ला.   काल आपण पाहिले जर आपल्याला, जीवनात काहीतरी चांगले करायचे असेल, तर मुख्य आपल्याला स्वतःला ओळखा. आपली योग्यता व क्षमता जाणून घ्या. मुख्य म्हणजे सद्य परिस्थिती जाणून घ्या. यात काय अडचणी येऊ शकतात. त्याचा आढावा घ्या.  त्यानुसार पावले टाका. उगीचच नसते साहस, अपयशी करू शकते. बुद्धीबळ खेळताना माघार  घ्यावी लागते नं? तेच महाराणी येसूबाईंनी केले. रायगडावरील स्वराज्य निष्ठ मंडळी सुखरूप राहणे, गरजेचे होते.          मी नेहमी एक श्लोक सांगते.  "राम"चा  अर्थ क्षमता. त्याची खरी दखल घ्या.        मी छ. शंभुराजेंच्या या, "बुधभूषण" ग्रंथाची आपल्या वाचकांना करून द्यावयाची ठरवली. ती सर्व लहान मोठ्यांना फायद्याची होणार आहे.       शंभुराजेंनी प्रारंभी ईश स्तवन करताना गणेश, शिव शारदा या देवतांबरोबर गुरूंचे स्तवन केले. त्यात त्यांनी गुरू कसे असावेत. हे सांगितले आहे.  हे वर्णन छत्रपती संभाजीमहाराजांच्या व्यक्तीमत्वाचे  नेमके दर्शन  दाखवत आहे.   ...

आजची गरज - मानसिक सामाजिक - राजकीय. शंभूराजे व महा राणी येसूबाईंचे धोरण

  आजची गरज - मानसिक - सामाजिक - राजकिय.   मम जिज्ञासू व अभ्यासू वाचक हो          आज आपण महाराज्ञीचे धैर्य व स्थिर बुद्धी व संयम, त्यांनी कोठून मिळवला हे  पाहणार आहोत. त्यांचे शिक्षण, शंभू राजेयांसोबतच जिजाबाईच्या निगराणीत झाले. त्यांना हीसं संस्कृत, घोडेस्वारी व लढाईचे उत्कृष्ट ज्ञान होते.          छ.संभाजी महाराजांनी त्या वयात- त्या काळात ही गरज समजून घेऊन, त्या वर उपाय लिहून ठेवला होता. हा त्यांचा बुधभुषण जर वाचला, त्यानुसार वर्तन केले तर आपण आदर्श नक्कीच ठरू व यशस्वी ही.  तुम्ही म्हणाल कि मग ते स्वतः का फितुरीचे बळी झाले? ते fully alert होते. पण राज्याच्या लालसेचे शिकार झाले हो. शत्रुच्या कारवाईबाबत सावध होते. पण त्यांच्या पिताश्रींचा मृत्यु, त्यांजपासून लपवून, तिर्‍हाईताच्या हातून अंतःसंस्कार करण्याइतपत मजल जाईल, अशी ते कल्पनाही करू शकले नाहीत.  मासाहेब सोयराबाईंंनी हे केले.पण मतलबी व स्वार्थी मंडळी, या स्वराज्यात होती , ती ही खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसपास कटकारस्थाने करतील, हा अंदाज ते बांधू श...

धर्मरक्षण आपल्या येसूबाई राज्ञीचे व आज आपली धर्म परायणता.

  धर्मरक्षण आपल्या राज्ञीचे व आज आपली धर्मतत्परता.    स्वागत करते, आपण सर्व वाचक रसिकच नव्हे तर सजग आहात. धर्मजागृत आहात. छान वाटले. धर्मपरायण म्हणजे गंभीर boring life जगायचे, असे नाही, तर यात ही गंमत आहेच. तेव्हा आज इतिहासासोबत, वर्तमानावर ही नजर टाकू या. कारण आपण काही फक्त माहिती करून गपचिप बसणार नाहीत. तर सद्य परिस्थितीत त्याचा, आशय व उपाय बघणार आहोत. I mean follow करणार आहोत.    त्या खडतर परिस्थितीत, राज्ञी येसुबाईंनी, आपल्या पुत्रांवर, स्वधर्मप्रेम व स्वराज्यनिष्ठता बिंबवली. गुप्तता राखून, प्रशिक्षित केले. स्वतः व राजमाता सकवारबाईंची व्रत वैकल्ये संभाळली. त्यातून शके महिने व ऋतु व तिथी - सणवार  यांचे सखोल ज्ञान, बालशाहूंना करवले. भावी छत्रपती या नात्याने, असलेला धर्म= धृ धारयते  इति धर्म. म्हणजे आपली समाजाशी बांधिलकी व आपण जे काही आहोत, त्या प्रमाणे आपले कर्तव्य. राजा असो- अधिकारी असो.- सेवक असो वा बाल- तरूण- पौढ - वृध्द. सर्वांचे एक विशिष्ट कर्तृत्व   विधीलिखित असते. त्याप्रमाणे वर्तन.       आता थोडे म्हटले तर विषयां...