धर्मवीर छ. संभाजी राजेंच्या, मृत्यू नंतर, महाराणी येसूबाई यांच्या अचूक निर्णय.
माझ्या जिज्ञासू वाचक वृंद हो, आधी माफी मागते. आज मी बऱ्याच दिवसाने भेटत आहे. जरा दुसऱ्या लेखनात गुंतले होते. आणि नवनाथ यात्रा ही केली. त्यांच्या बद्दल लवकरच माहिती देईन तसे तर तुम्ही, त्यांच्यावरील मालिका पाहिली असेलच.असो. आज आपण महाराज्ञी येसूबाईं व बाल शिवाजी (शाहू) राजे व इतर राजपरिवाराच्या, मोगल अधिपत्याखालील व्यतित झालेल्या, तब्बल १९ वर्षाचा (१६८९ ते १७०८) या कालावधीचा आढावा घेणार आहोत. मी मुद्दाम अटक व कैद शब्द वापरले नाहीत. का तोच खुलासा करणार आहे. अगम्य व अजिंक्य असा रायगड, फितुरीमुळे, मोगलांचा अधीन होऊ घातला होता. आधीच स्वकियांच्या, खुद्द येसुबाईंच्या सख्या भावाच्या दगलबाजीमुळे छत्रपतींचा संभाजीराजेंचा मृत्यु झाला होता. सद्यकाळात आपले कोण - फितुर कोण कळेनासे झाले होते. येसुबाईंनी चाणक्यनीतिचे अध्ययन केले होते. त्याचा उपयोग केला. औरंगजेबाच्या सरदाराला, झुल्फिकारखानाला संदेश पाठवला, " आम्ही रायगड देऊन स्वत: स्वाधीन व्हायला तयार आहोत. पण एका अटीवर, आमच्या जीवाची व धर्मरक्षणाची हमी, त्याने घ्यावी. त्या आ...