को जाग्रती, या सवालाला , "अहं " हा जबाब देण्यास पात्र व्हा.

 २१.६ .२१ . जेष्ठ शु.  एकादशी. सोमवार. 

 आपण गेल्या आठवड्यात सात वारांची नावे( पौरात्य- आपल्याकडील व पाश्चिमात्य) व त्यांचा सुर्यमालेतील ग्रहांची संबंध पाहिला , आता जरा वर्तमानकाळात येऊ या. या घडी आपल्या आजूबाजूला काय चाललेय, व त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ घातला आहे, ह्याचा विचार करणे, त्याप्रमाणे, ह्याबाबत आपण काय करू शकतो , ते बघणे जरूरी आहे. जर हातावर हात ठेऊन बसले, तर काय परिस्थिती होईल? यामुळे आपली पुढची पिढी कशी  गोत्यात येईल,  हे आपण बघणे, किती गरजेचे आहे, ह्याचा आपल्यातील ८०% ( वय वर्षे १८ ते ९०) विचारच करीत नाहीत. हाच आपला दुर्दैव विलास अाहे. आपल्यापुरतेच जगत्यात ही लोकं!

    त्यामुळे होतेय काय कि, आपमतलबी लोकांना, सामाजिक व राजकिय क्षेत्रात,  सावळा गोंधळ सहज करणे, शक्य होय आहे.

     कारण सामान्य जनता,  आता, " जनता जनताजनार्दन" राहिली नाही. तिला आसमंतात काही घडले, तरी देणेघेणे राहिले नाही. कोणी ही वक्ता, सभेत कशी ही भाषा वापरतो. टाळकरी, " टाळ्या पिटतात.  जोड्याने हाणू, ही वाक्यरचना, व्यासपीठावरील नव्हे, हा व्यासमुनी व नारदमुनींचा अवमान आहे. आपण नकाराधिकाराच घालवून बसलोय. संत तुकारामांनी सांगितलेला उपदेश, 

     " जे जे होईल ते ते पहावे,  चित्ती असू द्यावे समाधान",

     याचा हवा तो अर्थ काढून निष्क्रिय बनत आहोत, अापण नागरिक.समाधान म्हणजे काय हो. कोणी दुसर्‍याची नाहक निंदा करत असेल तर, मुकाट ऐकत राहणे, हे त्या संतांना अभिप्रेत नव्हते. याला प्रेतवत्  जगणे, म्हणतात. खरे तर आपण, सर्व नाही, तरी ८५% नागरिक  जागृत नागरिक राहीलो नाहीत.म्हणून नेते मंडळी, आपली किंमत ठेवत नाहीत. काही मनमानी  केली, तरी ही  जनता ठस की मस होणार नाही.  हे नागरिक नसून,फक्त, " प्रजा" राहीली आहे. हिंदुत्वाचा डिंडोरा पिटला कि झाले, त्याची  कास धरण्याची गरज नाही. म्हणजे काय कळले, हिंदूत्व आचरणात आणले नाही तरी चालतेय. जरा स्पष्ट विचारते, पुनःपुनः विचारणा करतेय,  फक्त मराठी मुलुखाचे रहिवासीच हिंदू आहेत का? मग खालच्या अंगाचे दाक्षिणात्य वा युपी बिहारचे भय्ये कोण आहेत? हिंदू आहेत नं? अन् मग रोहिंगे का दयेला पात्र ठरत आहेत? आज इतकेच.

     छोटा लेख मोठा आलेख. विचारवंत व्हा. आचरण प्रिय व्हा. निदान एक व्हा.बस.हीच कळकळीची  विनंती.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू