छत्रपती संभाजी महाराज व एकनिष्ट कवी कलश
१२.१२.२०२३ . छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश.
मम सजग व प्रज्ञावंत वाचक हो,
छत्रपती संभाजी महाराजांची खरी ओळख व महती, त्या काळी, तत्सम जनतेने व प्रजेने जाणून घेतली असती तर~~ आता जर तर म्हणण्यात काही अर्थ नाही. पण या धुरंधर योध्याला, सामान्य जनतेने साथ दिली व संताजी व कवि कलशा सारखे इतर ही स्वदेशप्रेमी व स्वधर्मनिष्ठ सगे सोयरे मिळाले असते, तर आपले आजचे जीवन किती समृध्द समाधानी असते व स्वधर्मात योग्य स्वतंत्र व स्वबल झालो असतो. जर कित्येक सरदारांनी स्वार्थी विचार न करता, या शिवशाहीत स्वतःला झोकून दिले असते तर ~, मोगलांकडून, एखादे इवल्याशा वतनाचे धनी होण्यासाठी मतलबी न होता, संपूर्ण मराठा राज्याचे अधिपति झाले असते. आरती नंतर जी मंत्रपुष्पांजलि म्हणता ना, त्याचा अर्थ माहित आहे का? ते स्वप्न तेव्हाच सफल झाले असते. निदान अाजतरी जागे व्हा. जगजेत्ते होऊ शकणार्या आपल्या पंतप्रधानांना, मा.मोदींना साथ द्या. हिंदुत्व त्यांना कळलेय हो.
हां तर, आपण परत वळू या, बुधभूषणकडे. कित्येकजण नको त्या पध्दतीने अस्मिता व स्वाभिमान यामागे लागत आहेत. पण तो आभास आहे. अाज आपल्याला मोगल व ब्रिटीश काळापासून, पाठ्यक्रमिक अभ्यासाला हिंदुत्वाबाबत शिकवण्यास मुभा नाही. इतर धर्मिय खुलेआम मदरसा च कॉंव्हेंटमधून धर्म विषयक पाठ शिकवू शकतात. असो.
शंभुराजांनाच जर दिर्घायुष्य लाभले( rather if he survived) असते, तर त्या काळात मुलीबाळी सुरक्षित राहिल्या असत्या. तो विचार न करता , ती पुरूष मंडळी, नात्याची ही तमा न बाळगता, पैसा वतन वतन करत बसली. मी सतत तेच कानीकपाळी सांगण्याचा प्रयत्न करतेय. दूरकी सोचो।
छत्रपती संभाजीराजेंनी, काल वाचलेला, " बुधभुषण", हा संस्कृत ग्रंथ, वयाच्या २०व्या वर्षी १६७७मध्ये लिहिला. त्या आधीही नखशिख सातशतक हे हिंदी ब्रजभाषी ग्रंथ लिहीलेत. तुम्ही म्हणाल, " हे कसे शक्य आहे?" हा प्रश्न ज्यांच्या मनात येत असेल, तर त्यांनी, शंभू राजांचे जीवन अभ्यासिलेच नाही, असे म्हणावे लागेल. ही भाषा ही, शंभुराजे, उत्कृष्ट जाणत होते. कशी बरे, जरा विचार करा. ठीक आहे. उद्या हे स्पष्ट करते. मुख्य मुद्दा हा कि, इतका प्रज्ञावान व दुरदर्शित्व असलेला, तसेच अंगी क्रियाशीलता असलेला हिंदुसम्राट, आपल्याला लाभला होता.
पण आपण कपाळकरंटे. बाकीची मंडळी त्यांना साथ देत होती. परंतु, घरातूनच त्यांना धोका झाला. आधी सावत्र माता सोयराबाई व नंतर तर फार भयंकर घडले. खरे तर मेव्हणे गणोजी शिर्के तर दुहेरी नात्याने बांधले होते. ते येसुबाईंचे बंधु व शिवाजी राजेंच्या थोरल्या मुलीचे,राजकुँवर चे पती. त्यांनीच वतन न मिळाल्याने, भगिनीचे, सौभाग्य, औरंगजेबाच्या स्वाधीन केले. नंतर ही त्यांचे हालहाल करून मारले, तेव्हा तेथेच मोगलांना मिळालेले, कित्येक सरदार हजर होते. पण ~ असो.
अाता नीट विचार करा, असे प्रतिभावान साहित्यिक शेैलीवान व धैर्यशाली साहसवान धर्मनिष्ठ प्रजाहितदक्ष छत्रपती संभाजी महाराज, आपल्याला दिर्घकाल प्रशासक म्हणून लाभले असते, तर आपण नक्कीच विश्वाचे राजे असतो
पण निव्वळ स्वहिताच्या लाभासाठी, जे घडले ते, योग्य होते का? विचार करा. चिंतन करा. मनन करा. अन् इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून सतर्क व सजग रहा. उद्या ह्या भुतकाळाचा व आपल्या हातात असलेल्या वर्तमानकाळाचा अाणि भविष्यकाळाचा विचार करू व त्याला अनुसरून विचारशैली व वर्तनशैली बनवू या. हो ना? चला तर, उद्या मार्ग शोधू या. काल मी शेवटी द्यावयाच्या चिन्हांचा उल्लेख केला. ती चिन्हे आज देत आहे. अर्थ लावा बरे.
Comments
Post a Comment