शनिवार म्हणजेच satureday दोन्ही भाषेत या सहाव्या वाराला, एकाच ग्रहाचे नाव
शनिवार म्हणजेच Saturday. दोन्ही भाषेत एकाच ग्रहाचे नाव.
माझ्या सुजाण वाचकहो, आपणातील, कित्येकजण,
पाश्चिमात्य ज्ञानालाच मानतात. परंतू आपले पुर्वज ही तितकेच, rather, त्याही पेक्षा ज्ञानी होते. शनिला सुर्यपुत्र मानतात. एक म्हण आहे, " सुर्यापोटी शनेश्वर" तसे पाहता, सर्वच ग्रह सुर्यापासून निर्माण झालेत. पण ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ, एखाद्याचा मुलगा, कमी प्रतीचा ठरणे. त्या मुलाच्या बाबतीत, काही अनिष्ट वलये,असणे. आता बघा, शनिच्या भोवती तीन वलये आहेत. हे ज्ञान, आपल्याकडे, हजारो वर्षापासून होते.
तर वाचा, ह्या ग्रहाची अतिरिक्त माहिती.
शनिवार- मंदवार. नवमी.
सात वारांतील शेवटचा. याला पुराणात मंदवार म्हणत. मंद म्हणजे संथ. English मध्ये मंद = slow. अर्थ- गतीने जरा कमी. पण मराठीत slow= हळू संथ व मंद. पण प्रत्येक वेळी संथ व मंद शब्द नकारात्मक नसतो. गुणदर्शक असू शकतो. नाहीतर' "मंदा" हे नाव कोणी ठरवले असते का?
मंदाकिनी एक नदी आहे. जी संथ वहाते. तिला सहसा पूर येत नाही किंवा कधी कोणी, प्रवाहात जोर नसल्याने वाहून जात नाही. आता शनिवारचा, पूर्वी उल्लेख मंदवार का करत, समजते. त्या शनि ग्रहाची कक्षेत गती इतर ग्रहांच्या मानात हळूहळू आहे. जेव्हा एखाद्या महान व विख्यात व्यक्तीचा पुत्र कामयाबीत कमी पडतो, *( see note written down), तेव्हा त्याला " सुर्यापोटी शनेश्वर!" म्हटले जाते. याचा प्रत्यय येतच आहे. पण आळीमिळी चूप, हे धोरण ठेवणे, शहाणपणाचे होय.
आता शनिची देवळे असतात. मालाडला, भाईंदरला व भायखळ्याला आहेत. पण ही त्याची भक्ति करायची नसते. तर शांति करायची असते. त्याला समोरून नमस्कार करू नये. कारण त्याची नजर आपल्यावर पडू नये,म्हणून काळजी घ्यावयाची असते. एक प्रकारे हा ग्रह आपले नशीब - भाग्य फळफळून देत नाही, म्हणून वेगवान पवननपु्त्र हनुमानाची , या दिवशी भक्ति करावयाची असते.
हनुमान चालिसा वा मारूतीस्त्रोत्र म्हणून शनि बंधन दूर करता येते. शनिच्या नजरेमुळे, जी प्रगती खुंटली जाते, तिला रामभक्त हनुमानच, गति देऊ शकतो.
आता हे बघा, या शनीला व मारुतीलाच फक्त तेल घालतात. इतर देवांना नाही. का बरे? simple thing तेल हे वंगण असते. ज्याची हालचाल खुंटलेय, अशा यंत्राला वंगण घालतात, हो नं? तसेच गति वाढवायलाही हाच उपाय असतो.
या वारी व सोमवारी पचनसंस्था संथ/ मंद होत असते.त्यामुळे पचायला जड असलेले चणे हरभरे खाऊ नयेत, असे सांगतात. बघा प्रयोग करून.
आज दिवसा जऊळ( अंधार आला) तर आपण पटकन लाईट लावतो. पूर्वी ही सोय नव्हती. दिवसा, दिवे जाळणे,परवडण्यासारखे नव्हते. चूल ही, इतर दिवसांच्या मानाने, शनिवारी पेटायला वेळ घेई. करून बघा. शनिवारी देवासमोर, दिवा लावताना ,जास्त काड्या जळतात.
आता थोडे आजच्या काळात येऊ. ४.५ वर्षापूर्वी एक चळवळ झाली. शनिशनेश्वराच्या ठिकाणी, महिलांना प्रवेश नाही. कार्तिकेय, गणेशाच्या वडिल बंधुच्या मंदिरात ही मना अाहे. शनि व कार्तिकस्वामींना स्त्री सहवास नको आहे, तर जबरदस्ती का? जर यातील कोणी महिला, काही कारणाने विवाह करू इच्छित नसतील व जबरदस्ती झाली तर? असो. मूळ मुद्दा संपूर्ण जगतात, सर्व खंडात ग्रह व वार कसे नेमके क्रमवार ठरले व सात ग्रहावरूनच वार ठरले? तेव्हा संपर्काची साधने नसताना? या चमत्काराला अंधश्रध्दा म्हणाल का?😂 मग विश्वास ठेवा. आपल्या पूर्वजांच्या ज्ञानभंडारावर. अन् समृध्द व्हा.
खरे तर, आपल्या वा पाश्चिमात्य समजाप्रमाणे, सोमवार पहिला वार. तेथून सुरूवात करावयाची होती. पण गुरूंच्या मुद्दावरून, प्रारंभ केला, म्हणून क्रम बदलला नाही तरी , चौथ्या वारापासून सुरूवात झाली. असो. सर्व वार झाल्यावर, एक आणखीन् गंमत सांगेन. तर भेटत रहा व वाचत रहा. एक आणखीन् कार्य करा. हे ज्ञान, जास्तीत जास्त लोकांत वाटा. कसे ते वेगळे सांगणे,न लगे.
~~~~~***~~~.
Comments
Post a Comment