Posts

Showing posts from December, 2025

इतिहासातील सत्य व लटके (काल्पनिक) दिखावे

 इतिहासातील सत्य व लटके दिखावे.     हो, वाचक वर्ग हो, मी आता जे लिहीणार आहे, त्यातून खरे व खोटे  वेगळे करणार आहोत.  कसे ते बघा. आणि आणखी एक आज पासून, लेख मोठा व महत्व पूर्ण असेल आधी ही असे. पण मला वाटते, जसा कालचा पेपरात किती ही महत्वाची बातमी वा लेख असला, तरी तो रद्दीच्या गठ्ठात, पडतो.. तसे माझ्या लेखाचे होऊ नये असो.         तर वाचा बरे. शिवकाळात जे घडले ते सत्य मांडले आहे, पण त्याच बरोबर मिथ्य़ा( काल्पनिक कथा) पुढे आल्या. त्यामागे, सावत्र मातेचे, सोयराबाईंचे कटकारस्थान होते. स्वःपुत्राला राजा करावयाचे होते. ते एका विशिष्ट घटनेने सिध्द होते. जसे कैकयीचे कपट, भरताला अयोग्य भासले व त्याने रामाच्या पादुका  ठेऊन, राज्य संभाळले. तोच कित्ता छ. राजारामाने गिरवला. ते सर्व आपण पाहाणार आहोतच. पण भविष्यकाळात ही, छ.शंभू राजेच्यावर आपल्याच महाराष्ट्र देशी अन्याय केला गेला.  त्यांच्या शौर्याच्या कथा  व त्याचे, औरंगजेबाने, केलेल्या क्रुर हालहालाच्या हत्येच्या, सत्य घटना, अभ्यासक्रमात नसो, पण निदान  दृश्य स्वरूपात, तरूण- पौढांना दाखवायला ...

आजची मुंबई, नेमकी कोणी घडवली, बरे??

 आजची मुंबई, नेमकी कोणी घडविली? रसिक व अभ्यासू वाचकवर्ग हो, मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या नियमित वाचनाबद्दल. खास करून, मी नेहमीच थोडा गहन विषय घेऊन लिहिते तरी ही,तुम्ही उत्साहाने माहिती करून घेत आहात, याबाबत मी आभारी आहे. माझ्या प्रमाणेच तुम्हीही या मुंबईच्या विकासकांच्यात " रस" घेणार. Really admirable.       तसेच ह्या ब्रिटीशांचे या मुंबापुरीतील विकासाचे काम तितकेच admirable आहे नं? एरवी आपल्या थंड प्रदेशाचे हवामान सोडून, या चिखलमय भागात येऊन , संकटांना तोंड देत, इथे बदल घडवायचे, काही अडले होते का त्यांना? आज काही मंडळी, मुंबई आमची, फक्त आमचीच, असे नारे लावतात. पणत्यांनी, हेमाहित करून घेणे गरजेचे आहे. ही सात बेटाची होती  तिचे मुंबई शहरात, रूपांतर  केलेय, इंग्रज, पारशी, गुजराथी आणि मारवाडी लोकांनी.हा, जगनाथ शंकरशेट रामा कामथ इत्यादी सामील होते, मान्य.      बस जिद्द व चिकाटी- दुसरे काय?       वरळीचा बांध तयार करून ते थांबले नाहीत, तर मूळच्या खाड्या होत्या, तेथे तेथे नळ घालून तेथील पाणी समुद्रात सोडण्याच्या त्यांच्या कृप्तीला खर...

आजची गरज - मानसिक - सामाजिक - राजकीय

 आजची गरज - मानसिक - सामाजिक - राजकिय.    मम सुजाण व इतिहास प्रेमी वाचक हॊ, आपल्याला  शाळेत व कधी कधीच कॉलेज मध्ये, जो इतिहास शिकविला, त्याखेरीज आपण त्याविषयी काही वाचन करीत नाही. हे सत्य स्वीकारा.    आज मी तेच, तुम्हाला सांगणार आहे. जास्त नाही तरी, एवढे मनापासून वाचा. मग तुमची उत्सुकता तुम्हाला स्वस्थ बसून देणार नाही, बघा.       छ.संभाजी महाराजांनी त्या वयात- त्या काळात ही गरज समजून घेऊन, त्या वर उपाय लिहून ठेवला होता. हा त्यांचा बुधभुषण जर वाचला, त्यानुसार वर्तन केले तर आपण आदर्श नक्कीच ठरू व यशस्वी ही.  तुम्ही म्हणाल कि मग ते स्वतः का फितुरीचे बळी झाले? ते fully alert होते. पण राज्याच्या लालसेचे शिकार झाले हो. शत्रुच्या कारवाईबाबत सावध होते. पण त्यांच्या पिताश्रींचा मृत्यु, त्यांजपासून लपवून, तिर्‍हाईताच्या हातून अंतःसंस्कार करण्याइतपत मजल जाईल, अशी ते कल्पनाही करू शकले नाहीत.  मासाहेब सोयराबाईंंनी हे केले.पण मतलबी व स्वार्थी मंडळी, या स्वराज्यात होती , ती ही खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसपास कटकारस्थाने करतील, हा अंदाज ते ...

जीवनातील मार्गदर्शक -- कुसुमाग्रज - कविता " पाचोळा"

 जीवनातील मार्गदर्शक - कुसुमाग्रज. पाचोळा. कविता.  रसिक वाचक हॊ आज आपण कवि कुसुमाग्रजांची, "पाचोळा " कविता समजून घेणार आहोत.     आता मी, हे जे "आध्यत्मिक अधिष्ठान", सगळ्यांच्या जीवनात असतेच असते. हे सिध्द करणार आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी,"मनाचे श्लोक", या ग्रंथ द्वारे जे संगितले, तेच कुसुमाग्रज यांनी, या  " पाचोळा" कविततून सांगितले आहे. कदाचित, तुम्हाला, त्याची जाणिव नसेल. कसे ते सांगते.  मराठी लोकांमध्ये,  "कुसुमाग्रजांना न ओळखणारे, व्यक्ती विरळाच. पण,खरे तर, त्यांना, जाणणारे अजिबात नाहीत, हे सत्य बोलणे, मला आवडले असते.              कारण, आज कित्येक मंडळी शालेय जीवनात शिकलेले धडे, कविता, म्हणी, वाक्यप्रचार व खास शब्द विसरलेत. Rather, in those days and just   now also, most of the students, have not taken,, " THAT PORTION SERIOUSLY.. निबंध कविता--अर्थ  व रसग्रहण वगैरे, गाईडवरून. फक्त % वाढविण्यासाठी. असो.   तर आता सध्याच्या जीवनात, सोप्या रितीने, सुखी जीवनाचा मंत्र, मी ह्या ब्लॉक...

बातमी TV तली वा पेपरमधील असो ती खरी वा खोटी आहे, याची खात्री करा

 बातमी  TV तली वा पेपर मधील असो. ती खरी वा खोटी आहे, खात्री करा.  या, आलात, माझ्या मनस्वी वाचकहो. दिवसेदिवस आपले वाढता, वाचकवर्ग पाहून, माझा लिहिण्याचा उत्साह द्विगुणित होत आहे. कालचा विषय गंभीरच होता. तरी आपण माहित करून घेण्यात, उत्सुक आहात, हेच माझे यश आहे. अगदी खरे तर आपण जे काही करतो, त्याला इतरांकडून पावती मिळावी, ही कोणाचीही अपेक्षा असते. निरर्थक व निरपेक्ष काहीच घडत नसते. हो, मी ही मालाडला, underprivileged मुलांसाठी, १०वर्षे चालवलेल्या संस्थेतून व आदिवासी लोकांसाठी,  जे केले, ते ही काही अपेक्षेनेच केले. ती मुले चांगल्यापैकी शिकावीत व त्यांनी आपले जीवनमान वाढवावे, ही अपेक्षाच नं? असो.    काल मी एक विनंती केली होती. स्वतः, स्वतः ला, जाणून व उमजून घ्या. आपल्याला नेमके काय करायचेय ते, निश्चित करा. ध्येय ठरवा व त्यासाठी  योग्य दिशेने वाटचाल करा.        तसेच,एक तर कोठचीही बातमी ऐकून, हवेवर I mean एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देऊ नका. ती घटना नेमकी का व कशी घडली असेल, त्यावर विचार करा. ती , " खबर- breaking news होण्यासाठी, ...

आपण srv भारतीय ना? आणि हिंदू ही, हे नक्कीच नं???

 आपण सर्व भारतीयच नं आणि हिंदू ही हे, नक्कीच नं? मम विचारवंत वाचक हॊ,   आज उबाठा चे अजब गजब वक्तव्य फेसबुकवर वाचले. पूर्वीचे आहे का माहित नाही, पण सोशल मीडिया वर आहे, हे सत्य., आता जरा वर्तमानकाळात येऊ या. या घडी आपल्या आजूबाजूला काय चाललेय, व त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ घातला आहे, ह्याचा विचार करणे, त्याप्रमाणे, ह्याबाबत आपण काय करू शकतो , ते बघणे जरूरी आहे. जर हातावर हात ठेऊन बसले, तर काय परिस्थिती होईल? यामुळे आपली पुढची पिढी कशी  गोत्यात येईल,  हे आपण बघणे, किती गरजेचे आहे, ह्याचा आपल्यातील ८०% ( वय वर्षे १८ ते ९०) विचारच करीत नाहीत. हाच आपला दुर्दैव विलास आहे. आपल्यापुरतेच जगत्यात ही लोकं!     त्यामुळे होतेय काय कि, आपमतलबी लोकांना, सामाजिक व राजकिय क्षेत्रात,  सावळा गोंधळ सहज करणे, शक्य होय आहे.  आता मी सुरवातीला, जे लिहिलेय, त्याबाबतीत स्पष्टीकरण. एका ठिकाणी हे महाशय म्हणतात की कोणी तरी,मला विचारले, तुम्ही "गीता" वाचलीय का, मी सांगितले, मी ते ""कार्टून""पुस्तक वाचत नाही.. वर म्हणे, मला कोणी तरी""  कुराण"चे मराठी भाषांतर द...

नकाराधिकार व आपण.

 नकाराधिकार व आपण.         माझ्या प्रिय वाचक हो, एक मिनिट, मी track बदलला नाही. उलट आधी, दत्तगुरू यांच्या, negative गुरूं प्रमाणे च, हा नकाराधिकार आपल्या जीवनाला, track वर ठेवतो. चांगले व सुखी जीवन देतो.         हा नकाराधिकार प्रत्येकाच्या आयुष्यात यश व समाधान या  बाबतीत फार महत्वाचा मुद्दा आहे. कित्येकदा, एखादी विशिष्ट गोष्ट, आपल्याला पटत नसते, करायची नसते, तरी आपण करतो. का तर, सर्व करतात, मग नाही कसे म्हणायचे, इतर शेजारी वा  मैत्रिणी वा कलिग्सची मुले करतात, म्हणून आपल्या मुलांना ही force केला जातो. especially  १० वी नंतर मुले सायन्सलाच जावी, असे पालकांना वाटते. मग त्यांची आवड असो वा नसो. शाळेत सायन्सचा अभ्यास प्रत्यक्षच करावा. इतर विषय महत्वाचे मानले जात नाहीत. ते काय मार्क मिळवण्यापुरते, हे असे मुलांच्या व पालकांच्या मनावर ठसवले जाते. आपल्या आवडी नुसार,शिकावे.  इतर सामाजिक दबावाला बळी पडू नये. नकाराधिकार वापरून आपल्या आवडीच्या क्षेत्रात जावे, ही यशाची किल्ली आहे. या किल्लीचा वापर योग्य पध्दतीने व योग्य वेळी करायला ...

आपले गुरू कसे निवडाल.. इति रामदास स्वामी रामदास स्वामी भाग 2.

 आपले गुरू कसे निवडाल रामदास स्वामी  .भाग 2      मम सुजाण वाचक हो. काल दासबोधातील ओळी, मी लिहिल्यातत्या संदर्भा साठी पाहत रहा. म्हणजे हे समजायला सोपे जाईल                सभामोहन मुररे चेटकें।              साबरमंत्र कौटाले अनेके।    सभा, मोर्चे घेऊन तसेच आज media फेसबुकवरील लेखक असतात, काही विरोधी, अपयशी पक्षाच्या नेत्यांचे paid चेले, मग त्यांचा हाच उद्योग, यशस्वी नेत्यांना बदनाम करणे. तसेच  एक विशिष्ट नेता,अज्ञानी dropout मुलांना, चिरीमिरी देऊन, आपल्या कह्यात आणतो. आणि त्यांच्या हातून अपराध घडवतो. आणि नंतर ते बिघडल्यावर वाऱ्यावर सोडतोय. थोडे दिवसापूर्वीच, मराठी न बोलण्याऱ्याना व मोर्चाला (😄) जाण्यासाठी, सुट्टी न देणाऱ्या, मालकाला, थोबाडीत द्या, असा आदेश दिला, अन या मूर्ख गुरूचा,  शत मूर्खांनी त्यानुसार कृत्य केले. आणि स्वतः ची पोलीस चौकीत नोंद करवली. त्या आरेच्या मोर्चे कंपनी प्रमाणे, नोकरीं मिळवण्यासाठी वांदे करवून घेतलीय.नंतर "हे" नेते  कुगुरू हात झटकतात. ...

आपण दत्त गुरूंचे गुरू, आज पाहीले. आज आपला गुरू कसा असावा.. दासबोध. रामदास स्वामी.

 काल पर्यंत आपण दत्त दुरूचें गुरू पाहिले, आज आपला गुरू कसा असावा.-- दासबोध.     माझ्या सजग वाचक हो,    आपण बघतोय कि, गुरू नेमका कोठचा योग्य, पण समर्थ रामदास स्वामींनी , दासबोधात हेही सांगितलेय कि, गुरू कसा नसावा. बरेचदा कोठचीही गोष्ट कशी असावी, ह्याचे वर्णन करणे, विस्तृत होते तरीही काही बाबी राहून जातात. तेव्हा सोपा मार्ग म्हणजे, त्या कशा नसाव्यात, हे ठरवले कि, scope नेटका व नेमका होतो.           हेच रामदास स्वामींनी दाखवून दिले आहे. हे चांगल्या व भल्या माणसाचे गुणधर्म न सांगता, ते मूर्ख लक्षण- पढतमूर्ख- कुविद्या-बध्दलक्षण- चंचळ लक्षण- करंट लक्षण, यावर निरूपण करतात. हे करंट मराठी करंट आहे बरे, english current नव्हे हं.  तसेच त्यांनी दासबोधाच्या ५व्या दशकात  १ल्या समासात, गुरू निश्चित कसा करावा, हे सांगितलेय. अन्  दुसर्‍या समासात गुरू लक्षण सांगितली आहेत, अर्थात् यात गुरू कसा नसावा, हे स्पष्ट केले आहे.           त्या सोप्या शब्दातील ओळीच बघू या.          जे करामती ...

दत्तगुरू, ही ज्यांना, गुरू स्वरूप मानत ते बाकी 17 ते 24 गुरू

 डिसेंबर 2025  दत्तात्रय गुरूंचे गुरू त्यांचे कोण गुरू आहेत, ते आपण अभ्यासतआहोत.    माझ्या अभ्यासू व जिज्ञासू वाचक हो, स्वागत करते.       क्षमस्व. मध्ये दोन दिवस गुगलच्या server च्या problem मुळे blog टाकण्यात अडथळे आले व तुमच्यापर्यंत, मी पोहोचू शकले नाही. खरे तर फार महत्वाच्या विषयावर, आपण बोलत होतो, असो. तर..         दत्त गुरूंना वंद्य असलेले पुढील गुरू 17 ते 24.   दोन दिवस आपण, गुरूंच्या गुरूंनी , ज्यांना गुरू मानले, त्यांच्या अनुभवावरून काय शिकायचे , ते जाणून घेतले. आता पुढील,  " गुरू"पासून त्यांना काय शिकवण मिळते,  ते पाहू.             १७ नं.च्या गुरूंचे नाव व पेशा वाचून,तुम्हाला, धक्काच बसणार आहे. पण हे खरेच शिकण्यासारखे आहे. बघा.                 १७. पिंगला वेश्या. गुण: -आशेचा त्याग.       पिंगळेच्या, बाबतीत झाले असे कि,  एके रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगला वेश्येकडे न आल्यामुळे तिला अचानक वैरा...

श्री दत्तगुरू ही ज्यांना, "गुरू "" मानतात ते पुढील 9 ते 16 गुरू

 दत्तगुरू ही ज्यांना गुरू मानतात ते पुढील 9 ते 16 गुरू. धर्मप्रिय वाचक मंडळी हो,  मी 3 तारखेस दत्तात्रयांच्या २४ गुरूची,आपल्याला ओळख करून देण्यास प्रारंभ केला. अन् ८ गुरूवर्याची महती लिहिली.  पण नंतर, आधी चालू असलेला मुद्दा,पुढे लिहिला. (मंत्र+पुष्प+अंजलि)  आता परत त्यांच्या पुढील गुरूंची महती जाणून घेऊ कि,  तारीख २३व  २५ ला इतर १६ गुरूंची महती सांगेन. पण जरा बदल करावा लागला. मा        तर आज दत्तजंयतीच्या शुभदिनी, त्यांचे पुढील ८ गुरू  त्यांच्या सगुण महत्वासह समजून घेऊ या.         ९. अजगर गुण: निर्भयता अजगराप्रमाणे भक्तांनी नशीबावर विश्वास ठेवून, जे काही थोड्या प्रमाणात वरदान मिळेल, ते  आपलेसे करून घ्यावे, व त्या समाधानाने, आत्मविश्वास वाढवावा. कधी कधी, काही मिळाले नाही, तरी स्वस्वरूपाची जाण करून घेऊन, स्वतः चे समाधान करावे.  जसे अजगराला, नेहमीच भक्ष्य मिळत नाही. पण तरीही, आधी पोटात, गेलेले खाद्य, तो पुरवून खातो.        १०. समुद्र. गुण: परोपकारी. समुद्रात, भरती व ओहोटीचा क्रम चालूच अ...

मंत्र +पुष्प +अंजलि हा दत्त जयंती,म्हणून हा मागे ठेऊन दत गुरुंचे गुरू आधी लिहिलाय वाचक हो

 मं त्र+ पुष्प+ अंजलि. भाग तिसरा..       साम्राज्याची, अधिपती, सर्व जगात सार्वभौम व विश्वकीर्त व्हावा.    माझ्या जागृत वाचक हो, तुम्ही आधीचे दोन्ही भाग मन लावून वाचलेत, हे मी गृहीत धरते.   मला वाचक शेकडो मिळाले. पण झालेय असे की, पहिल्या भागात, मंत्र+पुष्प+ अंजलि च्या सुरुवातीला, मी मुद्दाम, एक चूक केली होती ज्ञानआणि असे ही सांगितले होते की, हा अर्थ वाचताना, आरतीचे पुस्तक समोर ठेवा. अर्थ जाणून घ्या. फक्त वाचू नका.  पण कोणीही, ही चूक माझ्या पदरी घातली नाही. असो. मीच सांगते.        ह्या प्रार्थने ची सुरुवात अशी आहे,   ॐ यज्ञन, यात ज्ञ वर मात्रा आहे. पण माझ्या font मधील कमतरतेमुळे,  problem झाला.  त्या मुळे मी गोंधळून ज्ञनेन, लिहिले.चूक भूल माफ करा.          तर आता लेख सुरू. यापुढे, आपण अशी मागणी करीत आहोत की, आमच्या राज्यात, जनतेला अधिकार मिळावेत. परंतु त्याच बरोबर प्रजेला, त्यांच्या कर्तव्याची जाणीव असावी. त्यांनी त्याचे पालन करावे. आमच्या साम्राज्यात, बरेच अधिकारी असावेत. सर्व अध...

दत्त जयंती (दत्तात्रयांचे २४ गुरू)

   दत्तात्रयांचे २४ गुरू. मंगळवारी दत्त जयंती.   मार्गशिर्ष पौर्णिमा.  माझ्या प्रिय अभ्यासू वाचक वृंद हो,  मी अचानक, वारांच्या माहिती वरून, गुरूंचे गुरू , दत्तगुरू यांच्या कडे वळलेय.  कारण मूळतः, मी योग्य गुरूच्या बद्दलच लिहित होते. चार दिवसांनी, मंगळवारी, " दत्तजयंती" आहे. आपले सर्वांचे , गुरूवर्य. पण वाचक हो, तुम्हाला, एक गंमत सांगते, आजच्या जमान्यात, कित्येकजण, अमूक एक, आमचे गुरू- एकमेव गुरू / गुरूमाता आहे, अशी गर्वोक्ती करतात,  पण मला सांगा, शाळेत, आपल्याला,  प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक असतात नं! हर एक विषयासाठी, त्या त्या विषयातील, " तज्ञ" मग ~~ तर आपल्याला माहित असायला हवे कि, श्रीकृष्णाने ३२ व दत्तात्रयांनी २४ गुरू केले आहेत. कोणीही सर्वगुणसंपन्न नसते. आपण, इतर योग्य त्या व्यक्ती कडून, चांगले ते ते गुण घ्यावयाचे असतात. हीच शिकवण, श्रीकृष्ण व श्रीदत्तात्रय, आपल्या भक्तांना देत असतात.    आता, दत्तात्रयांनी, हे खालील गुरू मानले आहेत.      १.पृथ्वी, २.वारा, ३.आकाश, ४.पाणी, ५.अग्नी, ६.चंद्र, ७.सूर्य. ८.कबूतर. ९...

मंत्र + पुष्प+ अंजलि. अर्थ. भाग दुसरा. कुबेराला विनवणी.

 मंत्र + पुष्प+ अंजलि.    अर्थ. भाग दुसरा. कुबेराला विनवणी            वाचक हो, आलात, फार बरे वाटले.  आरतीच्या नंतरचे,"देवे" म्हणता, त्याचा अर्थ समजून घेण्याची, तुमची उत्सुकता, खरेच, प्रशँसनीय आहे.    तर काल म्हटल्या प्रमाणे आपण, आज देवांचे खजिनदार, कुबेर महाराज, यांना, जी विनवणी करतो, ( प्रत्येक आरती नंतर) ती जाणून घेणार आहोत. अर्थाजन व त्याची जमाई, आपल्या दृष्टीने, महत्वाची आहे, ह्यात दुमत नाही नं, मगsss. आता आम्ही, या पुढे, मंत्र पुष्प  ओंजळीतून, कुबेराला  नमन करीत आहोत. तु आम्हा सर्वांची,. तु इच्छा पूर्ती करतोस. तु संपूर्ण विश्वाचा आधार आहेस. तुझ्या विना कार्य कसे सफल होईल, अर्थ (धन) सहाय्याशिवाय. अशा महान व उदार रायाला, देवांच्या खजिनदाराला, आम्ही," ॐ स्वस्ति", या मंत्राचा जप करून, मन:पूर्वक नमस्कार करतो. हे देवाधिदेवा, आम्हाला, असाच शासन कर्ता लाभो, की ज्याची, कार्य पद्धती कुबेराच्या, पसंतीस उतरेल व तो   या राजकर्त्यावर कृपा करील. त्या दृष्टीने असा शासन कर्ता, निवडण्याची, योग्य मती, तमाम प्रजेला दे. ...

मंत्र +पुष्प + अंजलि. अर्थ. आपली त्या परमेश्वराकडे, असलेली "असली " व योग्य मागणी

मंत्र + पुष्प+अंजलि. अर्थ. आपली त्या परमेश्वराकडे असलेली  "असली" आणि योग्य मागणी.         माझ्या ज्ञानार्जन इच्छुक वाचक जन हो, मी कित्येक दिवसापासून, याबद्दल तुमचे कुतूहल जागे केले होते. आज तो अर्थ सांगत आहे. ह्या विनवणीची पूर्तता, होण्यासाठी, आपल्याला ही काहीतरी करणे जरुरी आहे हं.        इथे मी फक्त अर्थ सांगेन. मुख्य श्लोक, तुम्ही जवळील "आरती" च्या पुस्तकात बघून, अर्थ समजून, घ्या बरे.       ॐ ज्ञनेन पासून अर्थ पुढील प्रमाणे आहे..             सर्व भूतलावरील, तसेच स्वर्ग निवासी देवांनी "यज" करून, परम अशा विश्वात्मक परमेश्वराचे पूजन केले, कारण यज्ञ हाच, "अशुभसूचक", गोष्टींचे बंधन करण्याचा, श्रेष्ठ मार्ग आहे. व साधन आहे. आपल्या वैदिक धर्मामध्ये, यज्ञाचे महत्व सर्वोच्च आहे. ह्या विधिने वातावरण प्रसन्न होते. .     ज्याप्रकारे,  "देवस्वरूप", हे स्वर्गात असते. त्या प्रमाणेच राजा - सम्राट पृथीतलावर सर्वश्रेष्ठ असतो. त्या साठी शासनकर्त्यानेसुद्धा, ही जबाबदारी समजून व जाणून  आपले कर...