Posts

Showing posts from August, 2025

आदर्श असा लोकमान्यांच्या मनात असलेला गणेशोत्सव.

 आदर्श असा लोकमान्यांच्या मनात असलेला गणेशोत्सव.           माझ्या उत्सव प्रिय वाचक मंडळीनो, 20 तारखेचा लेख वाचलात नं, तर त्यावर मनन ही करा. आता आणखी, एका आदर्श, गणेश मंडळाची, ओळख करून देणार आहे. गंमत म्हणजे हे मंडळ ही तरुण मुले च चालवतात हं.          मी तेथेच कनाशीला असतानाची गोष्ट. मी याआधीच लिहिले होते. हे सर्व आश्रम, वि हिं प,, रा.से सं. जन संघ, जनकल्याण समिती व. क. आ., यातील महिला, सेवावर्ती होऊन  चालवतात.  त्यांना, सर्व, तरतूद, आपणच करायची, हे माहीत असते. मला हे नवीन होते. असो. तर आश्रमाच्या कोठीत, साधारण आठवड्यासाठी, शिधा शिल्लक होता. तेव्हा कळवणवरून, सौ. मंजुश्री मालखरे आल्या, मला, काही अडचण आहे का, विचारायला. मी खरे सांगितले. माझा नवखेपणा, त्यांच्या लक्षात आला. त्या बोलल्या, " काकू मी बघते व सांगते".          त्यांनी घरी जाऊन, आपल्या मुलाला, योगेशला सांगितले, तो कळवण गणेश मंडळाचा सदस्य होता. त्याने लगेच मिटिंग घेतली व ठराव मांडला. आणि त्या सर्वांनी, एकमुखाने निर्णय घेतला. वर्गणी मागतान...

आदर्श गणेशोत्सव कसा असतो

 आदर्श गणेशोत्सव कसा असतो.     माझ्या सर्वपरीने दक्ष असलेल्या वाचक मित्र मैत्रीणीनो, बहुदा अनेक लोक म्हणतील, आज असा आदर्श गणेश कार्यक्रम राबवणारी मंडळे आहेत कोठे? सर्व ठिकाणी डीजे व कर्कश आवाजातील, सिने गीते, बस.        पण मी अशा एक नाहीतर दोन गणेश मंडळाचा, अनुभव घेतलाय. झाले, असे कि, मी वनवासी कल्याण आश्रमाच्या, आदिवासी मुलींसाठी असलेल्या, शबरी माला, या कनाशी, जिल्हा कळवण येथील आश्रमात, "सेवावर्ती म्हणून जायचे ठरवले. माझे पूर्ण आयुष्य मुंबईत गेलेले. तेथे पोहोचले. माझा समज होता की, आपण मुलींची काळजी घ्यायची व त्यांच्या अभ्यासात मदत करायची, ही जबाबदारी. पण तेथे गेल्यावर कळले. की त्यासाठी लागणारी देणगी सुद्धा जमवायची. रा. से सं. जनकल्याण संघ, जनसंघ वगैरे च्या कार्यकर्त्यांच्या परिवारातून, सर्वत्र, अशा "सेवावर्ती " येतात. यांचाच बच्चा म्हणजे, भाजप. त्या एक एक वर्ष राहतात. बहुदा सर्व संस्था मधून paid सुपरव्हायझर, ठेवण्याची गरज भासतच नाही.असो. आपला मूळ मुद्दा गणेश मंडळ.         माझा  प्रॉब्लेम असा की, मी मुंबईची, इथे कनाशी (वणीच्या ...

आता गणेशोत्सव. तो साजरा करणे.

 आता गणेशोत्सव. तो साजरा करणे.     माझ्या धर्मप्रेमी वाचक हो,  गणेश मूर्ती घरी आणा वा सार्वजनिक रित्या स्थापना करा. त्यात, सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे आरती. ती खऱ्या श्रद्धेने म्हणणे - खरे तर आळवणीने बोलणे, आवश्यक आहे. या आरतीच्या शेवटी, आपण मं त्र पुष्पा अंजली म्हणतो मुद्दाम हा शब्द सुटा करून लिहिलाय. त्याचा अर्थ, मी सांगून, तुम्हाला -तुमच्या आत्म्याला, जागृत करणार आहे. त्यासाठी,खालील film बघा. हे तिघे, पेढे परशुराम, चिपळूण येथील गुरुजी आहेत. हा अर्थ ऐका व जेव्हा आरती नंतर म्हणाल तेव्हा या अर्थाने, गणपती बाप्पा कडे मागणी करा. 🙏🙏🙏🙏🙏.    ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

दहीहंडी - एक विचार करण्याची बाब.

Image
 .दहीहंडी- एक विचार करण्याची बाब. माझ्या जागृत वाचक हो, खरे सांगा,तुमच्या घरची कोणी मुले  दहीहंडीच्यामनोऱ्यावर चढतात का, असल्यास तुम्ही बिनधास्त असता,कीtension येते. त्या दिवशी किती मुले वरून पडून जखमी होतात. हे दुसऱ्या दिवशी पेपरात वाचायला मिळते. आता माझी ही short film बघा, माझ्या कडे कामाला येणाऱ्या, महिलेच्या बाबतीत घडलेली. हां, आम्ही, सर्वांनी तिला मदत केली म्हणजे फक्त पैसे पुरवले. पण पुढे आयुष्य भर, तो मुलगा लंगडत राहिला. कोण जबाबदार? मग मी काल लिहिले, ते बरोबर होते ना? आणि कित्येक वर्षे सत्तेवर राहिलेली मंडळी, त्यांना काही मदत, म्हणजे जाळी वगैरे, पुरवायची सोडून, कृष्णाष्टमीला, मटण व चिकन वाटत आहेत. या साठी, त्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. आणि फुकटे लाईनी लावून ते घेत आहेत. छी! छी!छी! का तर म्हणे आता सत्तेवर असलेल्याना, विरोधासाठी विरोध. आणि हे म्हणे राजकारणी, हं 😔😔😔        ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

उद्या कृष्ण जन्मअष्टमी व परवा दहीहंडी

  उद्या कृष्ण जन्म व परवा  दहीहंडी.        माझ्या धर्मप्रिय वाचक हो,       हे तर सर्वांना माहीतच आहे की,कान्हा जन्मला मथुरेत, कंसाच्या कारागृहात. मध्यरात्री. कंसाच्या हातून वाचविण्यासाठी वसुदेव गेले, त्याला घेऊन, गोकुळात.. तो वाढला, यशोदा नंदाच्या घरी. तेथे त्याकाळी उंच इमारती नव्हत्याच नं! होती, ती सर्व कुटी म्हणजे बैठी घरे. कंसाच्या जुलमी आदेशानुसार सर्व दूध व दूधजन्य पदार्थ, मथुरेकडे रवाना होत असे. मुलांना दूध मिळावे. म्हणून लहानग्या कान्हाने शक्कल लढवली. छताला लटकविलेल्या शिंकाळ्यातील, दूध वगैरे खाली आणण्यासाठी, गोपाळ जमवले व फक्त एखादे मूल रांगते होऊन, तो, त्याच्या, पाठीवर चढून वर टांगलेल्या, मडक्यातील, दूध वा दूधजन्य पदार्थ, खाली पाडून सर्वांना खाऊ घालत असे. पण आजकाल इथे मुंबईत, हा सण साजरा करण्यासाठी, पूर्वी  दोन तीन मजली बिल्डिंग वर दोर लावून हंडी बांधतात. आणि  मानवी मनोरे करून, दही हंडी फोडतात. आता तर सहा मजली इमारतीवर ही हंडी बांधली जाते. सध्या सर्वत्र उंच इमारती झाल्यात व गावोगावी, उंच हंडी बांधून, हजारो रुपये लावून, पैशा...

स्वातंत्र दिवस, दोन दिवसावर आला हो.

 माझ्या प्रिय देशभक्त वाचक मंडळी हो, आपला स्वतंत्रदिन, दोन दिवसावर आला, सर्व त्या साठी तय्यारीला लागलात ना? काय तयारी करताय हो, कपाट उकरून, सफेद साडी, सफेद झब्बा सलवार, मुलांचे सफेद शर्ट वा टी शर्ट शोधताय ना?                            मला लहानपणापासून प्रश्न पडतो. हा तर राष्ट्रीय सण आहे नं, मग आनंदाने साजरा करायचा, तर जिथे तिथे हे पांढरे वस्त्र परिधान केलेली मंडळी का फिरत आहेत. आपल्या हिंदू धर्मात सफेद वसने वीरक्तीचे लक्षण मानले आहे. माझी आजी- आम्ही अख्खी दुनिया तिला काकी म्हणत असे. तिला विसाव्या वर्षीच वैधव्य नशिबी आले. पदरी अडीच वर्षाची मुलगी व दहा महिन्याचा मुलगा. त्याकाळी, एकत्र कुटुंबात, तिला पांढरी साडी दिली. तोच मग तिचा पेहेराव बनला. दुःखी आयुष्याचे प्रतीक. मला लहानपणी काही प्रश्न पडला की तिलाच विचारायची सवय होती. पण त्या वयात ही, ही समज होती की, ही शंका, तिला विचारून, दुखवू नये.. त्यामुळे ही शंका अनुत्तरीत राहिली. त्या काळच्या सरकारने ठरवले व सर्वत्र झेंडा वंदनाला शाळा वगैरेतून सर्वांनी पांढरे वस्त्र घाल...
Image
 आता आलीय तीन दिवस, एकत्रित सुट्टी.      माझ्या जागृत वाचक वर्ग हो, तुम्ही कॉलेज ची मुले असाल तर तर स्वतः जागे व्हा. आणि पालक कंपनी, मुले कोठे मज्जा करायला जाणार आहेत, तिकडे लक्ष द्या. परवा 15 ऑगस्ट, आपला स्वातंत्र दिन आणि पाठोपाठ कृष्णअष्टमी व दहीकाला सगळेच मज्जा करण्यासाठी निघणार. लक्षात ठेवा. निसर्गाचे ही काही नियम असतात. त्याच प्रकारे समुद्र नदीचेही  ठरावीक नियम असतात.  तीन दिवस सुट्टी म्हणून सर्व पिकनिकला निघणार. बहुदा ओढ पाण्याचीच. थ्रील म्हणून समुद्रात घुसणार. पण हे लक्षात घ्या. शुक्रवारी अष्टमी आहे. भरती ओहोटीचे नियम असतात. दर पौर्णिमेला दुपारी व रात्री बरोबर 12 वाजता भरती असते. नंतर प्रत्येक तिथीला 40 मिनिटाने भरतीची वेळ पुढे सरकते. या क्रमाने अष्टमीला संध्याकाळी सहा वाजता भरती असते. त्या नंतर ओहोटी पर्यंत पाणी आपल्याला आत खेचते. आणि लोक हीच चूक करतात व पाणी कमी होतेय. आता जाऊ या आत, म्हणतात. मग दुर्घटना होतात..       Enjoy करताना विचार व सत्य न बघता, लोक धाव घेतात. ते कोळी सांगतातही वेळ बरोबर नाही,पण कोण लक्षात घेतो? तर पहा, या...

अगदी काही करता आले नाहीतरी, कोणाच्या धडपडीचे कौतुक करा

 अगदी काही करता आले नाहीतरी कोणाच्या धडपडीचे कौतुक करा.     माझ्या प्रिय वाचक हो, आज  आठ दिवस, मी तुम्हाला समाजासाठी काहीतरी कराच, असा उपदेश करतेय. पण निदान ते जमत नसेल, तर कोणाच्या धडपडीचे कौतुक करा त्यांना, प्रोत्साहित करा. त्याला काही खास प्रयत्न करावे लागत नाही. त्या साठी, मी सौ. योगिता नारकर यांनी, केलेले, एका पुस्तकाचे परीक्षण वाचवयास देत आहे. एका आईची, special child साठी, चिकाटी व हिंमत ठेवून, केलेले प्रयास, योगिता मॅम, सांगत आहे. असे कौतुक करा हो. बस, ही विनंती. पुस्तक परिक्षण - सौ. योगिता नारकर.     पुस्तक:- माय अमेझिंग चाईल्ड.            लेखिका:- मनीषा अगावणे.        आपल्या बौध्दिक अपंगत्वावर मात करून, यशाची अधिकाधिक शिखरे पार करणार्‍या, " सायली अगावणे कहाणी खरेच प्रेरणादायी आहे.        " अमेझिंग चाईल्ड, सायली, हे आत्मचरित्र, सौ. मनीषा नंदकिशोर अगावणे, यांच्या वैयक्तिक डायरीतून साकारले  आहे. शशिकला उपाध्ये यांनी या गोष्टीचे नेटके व ओघवते शब्दांकन करून ते पुस्तक रूपाने प्रसि...

आपली चूक कबूल करण्याची हिंमत

                                                    आपली चूक कबूल करण्याची हिंमत.         माझ्या प्रिय वाचक हो, अचानक मी, लेखनाचा, रोख बदलला, असे वाटले नं, नाही हं, बघा कालच्या लेखातील, त्या परिवाराचा किती मनाचा मोठेपणा आहे नं, विशेषतः त्या मुलाने आपली चूक स्वीकारली, स्वतःला सुधारले व त्याचे जीवन मार्गी लागले.      आपली चूक कबूल करून, सुधारणे. या साठी मोठठी हिंमत लागते.        झाले असे की. माझ्या मुलाला technical विषयात आवड असल्याने, त्याच्या मनाप्रमाणे दादरच्या डी सीलव्हा tech शाळेत, आठवी पासून घातले. नवीन शाळा, तीही दूर, जरा tention आले.   पण झाले असे की त्यांना इंग्रजी ला एक, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वर  धडा होता. अर्थात, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा, उल्लेख होता. "शेतकऱ्याचा आसूड".         एक दिवस, मी घरी आल्यावर बघितले, त्याने, त्या पुस...

मला मिळालेला सत्कार्याचा वारसा.

                                     मला मिळालेला सत्कार्याचा वारसा.         माझ्या सदैव साथ देणाऱ्या वाचक मंडळीनो,     माझा काल व परवाचा लेख वाचला असेल, तर संदर्भ नक्कीच लागेल. तसेच मी मागील आठवड्यात जो लेख लिहिला होता, भोचकपणा कराल तरच हातून कार्य घडेल. फक्त आपल्याच कुटूंबातील लोकांचा विचार व त्यासाठीच जगाल, तर तुमचाही सोलोमन ग्रँडीच होईल. मागे जाऊन शोधले तर, ह्याच नावाचे शीर्षक असलेला, लेख मिळेल. त्यासाठी चालू लेख बंद करून scroll केल्यावर सर्व लेख, अनुक्रमाने सापडतील. तर वारसा हा फक्त संपत्ती व प्रॉपर्टीचा नसतो. ह्या गोष्टी आनी जानी असतात. तर माझ्या आईचा, मला मिळालेला वारसा, वाचा. लाखोची संपत्ती, त्या पुढे, तुच्छ आहे.         माझी आई एका मान्यवर प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. माझी मुले ही त्याच शाळेत शिकत होती.  त्यामुळे मी शाळा सुटल्यावर,त्यांना घ्यावयास जात असे.  एक दिवस, मी गेले असताना, मिटिंग चालू असल्याने, मी थां...

आपण सर्व ही, आदर्श नागरिकत्व सहजी निभवू शकतो.

                                         आपण सर्व ही, आदर्श नागरिकत्व सहजी निभवू शकतो.       माझ्या सात्विक वाचक वृंद हो,  मला माहीत आहे, सर्वांना सत्कार्य करण्याची इच्छा असतेच. पण बरेचदा पुढे होण्याची हिंमत नसते. करू का नको, ह्याच विचारात, ती संधी निसटते. मग येतो मनात, after thought, अर्रर्र तेव्हा मागे पुढे करायला नको होते. असो. काल सांगितलेल्या घटनेत, नंतर जेव्हा त्या बाईंना सर्व समजले, तेव्हा त्यांना ही चुकी जाणवली. म्हणे, मीही पुढे तुमच्या बरोबर यावयास हवे होते वगैरे वगैरे.            नंतर जेव्हा मी वनवासी कल्याण आश्रमाच्या, कनाशी ( वणीच्या पुढे) आदिवासी मुलींच्या आश्रमात"सेवावर्ती" म्हणून एक वर्ष होते. तेव्हा कधी कधी मी घरी मुंबईला येत असे. नाशिक वरून, संध्याकाळी, पाच वाजता कनाशीसाठी बस असे. एकदा माझी ती बसं चुकली. मी एका रिक्षावाल्याला विचारले. तो म्हणाला, " येईन पण हजार भाडे घेईन. मी कबूल झाले. नाशिक ते कना...

खऱ्या नागरिकांचे कर्तव्य..

                                                                      खऱ्या नागरिकांचे कर्तव्य.           माझे लेखन आवडीने वाचणाऱ्या वाचक मित्र मैत्रिणींनो, काल मी तुम्हा सर्वांना, एक सल्ला दिला होता, तुम्ही म्हणाल, सांगणे सोपे आहे हो, प्रत्यक्षात करणे, risky पडू शकेल. पण, एका महान संतांनी म्हटले आहे,                 ' केल्याने होते आहे रे, केलेची पाहिजे. वाचन प्रिय जणांना नाव सांगणे, न लगे.       असो मी असले उद्योग केलेत, करते आणि पुढे ही करणार. मी वय 75.     हां तर एक दोन उदाहरणे सांगते. एकदा मी काही कामानिमित्त नाशिकला जात होते. सकाळी लवकर पोहोचायला हवे होते. म्हणून मनमाड पसेंजरने जाण्यासाठी व्हिटीला गेले.  रात्रीची वेळ होती. बरोबर एक परिचित महिला होत्या. गाडीला वेळ होता व नेमका ...

स्वतंत्र व स्वातंत्र कसे आपलेसे करावे.

 स्वतंत्र व स्वातंत्र                                    माझ्या स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या वाचक हो,             मी 2 तारखेच्या blog मध्ये या विषयावर लिहिले होते व त्याच सोबत माझा पूर्वीची, एक short film दाखवली होती. ती तुम्ही पाहिली असेलच, असे गृहीत धरून, मी, त्याच  वर भाष्य करणार आहे. माझा जातधर्म, या विषयी लिहिण्याचा हेतू नाही, पण आपल्या हिंदू धर्मातील, एका चांगल्या संस्कार विषयी लिहावयाचे, rather सर्वांना सांगावयाचे आहे.                           आज काल तरुणाईतलीच नव्हे सर्व वयातील व्यक्तींना, एक भूषण वाटते की आम्ही, आपल्या विशिष्ट तिथीला मासांहार करतो. असो. तसेच आपल्या कित्येक संस्कारात काही जणांना अर्थ नाही, असे वाटते.            त्यापैकी एक मुंज, उपनयन.  त्या विषयी, मी माहिती देणार आहे.                ...

स्वतंत्र आणि स्वातंत्र या सं कल्पनेतील फरक.

Image
 2ऑगस्ट 2025. स्वतंत्र व स्वातंत्र. या कल्पनेतील फरक.          माझ्या सुजाण वाचक हो, ह्या दोन्ही कल्पना फार भिन्न आहेत. स्वतंत्र म्हणजे स्वतः च्या बळावर, तंत्रावर काही ही करण्याची क्षमता. आणि स्वातंत्र म्हणजे आपल्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा - सवलत. यासाठी  ही माझी short film बघा ही मुळची 15 ऑगस्ट ला प्रदर्शीत केली होती. पण लोकमान्य टिळकांची संकल्पना यात स्पष्ट केली आहे. स्वतः च्या मनगटाच्या ताकदीवर, मनातील अपेक्षा पूर्ती करणे. तेव्हा हा हक्क मिळवायचा असेल, तर स्वतः ची क्षमता वाढवणे, जरुरी आहे. घोषणा करून, मागण्या करून मिळत नसते. तर लागा कामाला, शुभस्य शीघम.       ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ.

लोकमान्य टिळक पुण्य स्मरण

Image
    माझ्या प्रिय वाचक हो, आजच्या दिवसाचे महत्व सर्व भारतीय जाणतातच. पण आपण लोकमान्य टिळकांना, ओळखत असलो तरी, किती जणांनी, त्यांना, जाणले आहे बरे?  हां, सर्व जण शालेय जीवनात, त्यांचे स्मरण करीत होतो. पण आजही शालेय जीवन संपल्यानंतर, बहुतेक जण गोंधळात असतात. हा दिवस, त्यांची जयंती की पुण्यतिथी?       हो तुम्ही म्हणाल, आम्हाला त्यांची घोषणा आठवतेय, " स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे,  मी शेंगा खाल्या नाहीत, वगैरे वगैरे. फार तर त्यांनी, "गीतारहस्य" हा ग्रंथ लिहिलाय.   पण मी आज, तुम्हाला त्यांची व त्यांच्या कार्याची महती सांगणार आहे. त्यांनी, "केसरी" हे वर्तमानपत्र चालवले, त्यातीलच काही महत्वाचे लेख मी येथे देणार आहे. ते खालील पुस्तकातून घेत आहे. केसरी 16 जानेवारी 1883. पान 7 .         धर्मस्य तत्वम निहीतं गुहायाम ||   धर्मासारखा वादग्रस्त आणि नाजूक जगात दुसरा कोणताही विषय नसेल. जे धर्मनिष्ठ आहेत, त्यांना, त्यांचा धर्म जीवित्वापेक्षाही अधिक प्रिय असतो. अनेक महात्मानीं आपल्या धर्माच्या रक्षणासाठी किंवा त्याचा प्रचार होण्यासा...