Posts

Showing posts from December, 2023

म्हणी.आपल्या गुरू.आता आणखी म्हणी बघू काय शिकवत्यात बरे.

 २९.१२ .२०२३ .म्हणी. आपल्या गुरू. आता आणखी म्हणी बघू काय शिकवत्यात बरे.  १३.अति परिचयात् अवज्ञा –  कोणाच्या घरी जास्त जाऊ नये. तसेच इतरांच्या बाबीत, जास्त तोंड खूपसू नये वा उगीच सल्ला देऊ नये. जवळीकता  असली तरी मर्यादा राखून राहावे. म्हणजेच कोणाची privacy भंग झाल्यास अपमान होऊ शकतो .  १४.अति झाले अन् हसू आले – एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला , की ते हास्यास्पद ठरते.  ( एकूण कोठचीही limit cross  करू नये.)  १५ .अति झाले अन् आसू आले – एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला , की ती दुःखच  होऊ शकते.  १६.अंगावरचे लेणे , जन्मभर देणे –  दुसर्‍याचे दागिने बघून हव्यासापोटी, आपणही,दागिन्याकरिता कर्ज काढावयाचे अन् ते लेणे मिरवायचे  आणि ते रिण, जन्मभर फेडीत बसायचे .  १७.अंधारात केले , पण उजेडात आले – एखादी गोष्ट कितीही गुपचुप केली तरी ती काही दिवसांनी सर्वांना कळतेच.तेव्हा beware while active. १८. अंथरूण पाहून पाय पसरावे. आपली आर्थिक परिस्थिती पाहूनच खर्च करावे. १६ व्या म्हणी नुसार, इतरांना दाखवण्यासाठी खरेदी करू नये.  १९.  नाचता येईना, अ...

तसे पाहता, ग्रंथ हे आपले खरे गुरू होय. सर्व ग्रंथांचे सार म्हणजे पूर्वापार प्रचलित असलेल्या म्हणी.

 २८.१२.२०२३. तसे पाहता, ग्रंथ हे आपले खरे गुरू होय. सर्व ग्रथांचे सार म्हणजे पूर्वापार प्रचलित असलेल्या म्हणी.    मत्प्रिय वाचक मित्रमैत्रिणींनो, हो खरे आहे कि, सच्चा मैत्रीला वयाचे बंधन नसते. तर समविचारी व सम अाचारी मंडळींच्यात, मैत्रीचे धागे, सहजी, बांधले जातात. हां, तर काय सांगत होते. खरे ज्ञान मिळवण्यासाठी, मोठ्ठे ग्रंथ वाचन न करता ही, आपल्याला सहजी ज्ञान मिळवता येईल. फक्त लहानपणी, ज्या म्हणींचा अभ्यास केला, त्या, परत एकदा समजून व त्यातील, आशय उमजून घ्यावयाचा. बस.    १.चोराच्या मनात चांदणे. जेव्हा एखादा चोर, रात्री चौरकर्मासाठी बाहेर पडतो, त्याला जणू, सर्वत्र उजेड- चांदण्याचा प्रकाश आहे असे वाटते व तो लपतछपत वावरतो. त्याचप्रमाणे, वाईट वर्तन करणाऱ्याला, आपले कृत्य, इतरांना कळेल की काय अशी भीती वाटत असते. २.चोरावर मोर. एखादी व्यक्ति, कोणाची फसवणूक करणार असते व त्याबाबत बिनधास्त असते, तेव्हा तिचा इरादा नेमका ओळखून,  तिचा डाव तिच्यावरच उलटवणे.  ३ आधी पोटोबा मग विठोबा – प्रथम पोटाची सोय पाहणे , नंतर देवधर्म करणे . अन्वयार्थ- आधी स्वतःची सोय वा फायदा क...

ॐ गुरूदेव दत्त. दत्तमहाराजांचे आणखीन् ८ गुरू- १७ ते २४

 २७ .१२. २०२३. ॐ गुरूदेव दत्त. दत्तमहाराजांचे आणखीन् ८ गुरू- १७ ते २४.  माझ्या जिज्ञासू व सजग वाचकवृंद हो,  दोन दिवस आपण, गुरूंच्या गुरूंनी , ज्यांना गुरू मानले, त्यांच्या अनुभवावरून काय शिकायचे , ते जाणून घेतले. आता पुढील,  " गुरू"पासून त्यांना काय शिकवण मिळते,  ते पाहू.                 १७ नं.च्या गुरूंचे नाव व पेशा वाचून,तुम्हाला, धक्काच बसणार आहे. पण हे खरेच शिकण्यासारखे आहे. बघा. १७. पिंगला वेश्या. गुण: आशेचा त्याग.       पिंगळेच्या, बाबतीत झाले असे कि,  एके रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगला वेश्येकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य आले.  अन् तिने, "ते"   स्विकारले. पण जरा नाईलाजाने. जोपर्यंत -अंगी आशा प्रबल होती, तोपर्यंत तिला सुखाची निद्रा लागली नाही. पण जेव्हा , काही बिघडत नाही,उलट ते सर्व, गृहस्थ धर्माला जागत आहेत, अशी समजूत करवून घेतली. तेव्हा उलट तिला समाधान वाटले.   म्हणून स्व-आशेचा त्याग करण्याने, तिला चिरंतर सुख मिळाले. म्हणून स्वतःच्या फायद्यापेक्षा...

गुरूदेव दत्त. दत्तात्रयांचे पुढील ९ ते १६ क्रमाकांचे गुरू.

 २६.१२ .२०२३ . दत्तजयंती मार्गशीर्ष पौर्णिमा.        मम धर्मप्रिय वाचक मंडळी हो,  मी २२ तारखेस दत्तात्रयांच्या २४ गुरूची,आपल्याला ओळख करून देण्यास प्रारंभ केला. अन् ८ गुरूवर्याची महती लिहिली. पुढे लिहिले  कि,  तारीख २३व  २५ ला इतर १६ गुरूंची महती सांगेन. पण जरा बदल करावा लागला. माझा asstt. स्वप्निल शिंदे त्याच्या धर्मप्रिय मित्रांसोबत, विठुरायाच्या दर्शनास, पंढरपूरला  गेला होता. ही पुढची पिढी, देव दर्शनात मन घालते, हे खरेच कौतुकास्पद आहे. अन् इतरांसाठी अनुकरणिय आहे. फक्त problem हा आहे कि, तेथे अलोट गर्दी असते. ४.५ तास रांगेत उभे राहून, प्रत्यक्षात जेमतेम, एखादा मिनिटच दर्शन होते.         तर आज दत्तजंयतीच्या शुभदिनी, त्यांचे पुढील ८ गुरू  त्यांच्या सगुण महत्वासह समजून घेऊ या. ९. अजगर गुण: निर्भयता अजगराप्रमाणे भक्तांनी नशीबावर विश्वास ठेवून, जे काही थोड्या प्रमाणात वरदान मिळेल, ते  आपलेसे करून घ्यावे, व त्या समाधानाने, आत्मविश्वास वाढवावा. कधी कधी, काही मिळाले नाही, तरी स्वस्वरूपाची जाण करून घेऊन, स्वतः...

दत्तात्रयांचे २४ गुरू. मंगळवारी दत्त जयंती. मार्गशिर्ष पौर्णिमा. तेव्हा तीन दिवसांत, हे २४ गुरू जाणून.घेऊ या.

 दत्तात्रयांचे २४ गुरू. मंगळवारी दत्त जयंती.   मार्गशिर्ष पौर्णिमा.  माझ्या प्रिय अभ्यासू वाचक वृंद हो,  मी अचानक, वारांच्या माहिती वरून, गुरूंचे गुरू , दत्तगुरू यांच्या कडे वळलेय.  कारण मूळतः, मी योग्य गुरूच्या बद्दलच लिहित होते. चार दिवसांनी, मंगळवारी, " दत्तजयंती" आहे. आपले सर्वांचे , गुरूवर्य. पण वाचक हो, तुम्हाला, एक गंमत सांगते, आजच्या जमान्यात, कित्येकजण, अमूक एक, आमचे गुरू- एकमेव गुरू / गुरूमाता आहे, अशी गर्वोक्ती करतात,  पण मला सांगा, शाळेत, आपल्याला,  प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक असतात नं! हर एक विषयासाठी, त्या त्या विषयातील, " तज्ञ" मग ~~ तर आपल्याला माहित असायला हवे कि, श्रीकृष्णाने ३२ व दत्तात्रयांनी २४ गुरू केले आहेत. कोणीही सर्वगुणसंपन्न नसते. आपण, इतर योग्य त्या व्यक्ती कडून, चांगले ते ते गुण घ्यावयाचे असतात. हीच शिकवण, श्रीकृष्ण व श्रीदत्तात्रय, आपल्या भक्तांना देत असतात.    आता, दत्तात्रयांनी, हे खालील गुरू मानले आहेत.      १.पृथ्वी, २.वारा, ३.आकाश, ४.पाणी, ५.अग्नी, ६.चंद्र, ७.सूर्य. ८.कबूतर. ९.अजगर. ...

Sunday म्हणजेच रविवार. sun= रवि= सुर्य.

 २१ .१२ .२०२३.Sunday म्हणजेच रविवार. sun= रवि= सुर्य.      अाता बघा, रसिक वाचकहो, हा आपला सर्वांचा- लहानथोरांचा आवडता वार. एकदम पटले नं! हां तर याची माहिती वाचा. हा आठवड्यातील सर्वांत शेवटचा वार. आरामाचा वा पर्यटनाचा. तसे तर outing ला शनिवारीच - सुट्टी असल्यास, नाहीतर, रजा घेऊन, मंडळी बाहेर पडतात. पण असे आहे कि, आपल्यातील बहुतेक मंडळी, पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्यात, धन्यता मानतात. ख्रिसमस व new year म्हणजे पर्वणीव जणू. पण एका बाबतीत ( चांगल्या)  मात्र, no followers. मी सांगते, तेव्हा आपले लोक, नाराज होतात. पण रविवारी,आपल्या आजूबाजूला रहाणारे, ख्रिचन धर्मिय लोक, उशीरापर्यंत बिछान्यात लोळत पडलेले दिसतात का? ते सकाळी तयार होऊन चर्चला जातात. आपल्या पैकी कितीजण नियमित देवदर्शन करतात बरे! हां, विशिष्ट मंदिरातच तासन् तास रांगेत उभे राहून, भक्तीचे प्रदर्शन करतात. जवळच्या एखाद्या देवळात ~~~असो.      तर वाचा, या वारांची कहाणी. सुर्य- भास्कर-रवि- भानु- सविता.--. याला आदितवार ही म्हणतात.  पूर्वी माझी आजी, नेहमी,आदितवारी जाईन,आदितवारी आहे, असेच म्हणत असे...

शनिवार म्हणजेच satureday दोन्ही भाषेत या सहाव्या वाराला, एकाच ग्रहाचे नाव

 शनिवार म्हणजेच Saturday. दोन्ही भाषेत एकाच ग्रहाचे नाव.   माझ्या सुजाण वाचकहो,  आपणातील, कित्येकजण,   पाश्चिमात्य ज्ञानालाच मानतात. परंतू आपले पुर्वज ही तितकेच, rather, त्याही पेक्षा ज्ञानी होते. शनिला सुर्यपुत्र मानतात. एक म्हण आहे, " सुर्यापोटी शनेश्वर" तसे पाहता, सर्वच ग्रह सुर्यापासून निर्माण झालेत. पण ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ, एखाद्याचा मुलगा, कमी प्रतीचा ठरणे. त्या मुलाच्या बाबतीत, काही अनिष्ट वलये,असणे. आता बघा, शनिच्या भोवती तीन वलये आहेत. हे ज्ञान, आपल्याकडे, हजारो वर्षापासून होते.    तर वाचा, ह्या ग्रहाची अतिरिक्त माहिती.  शनिवार- मंदवार. नवमी.    सात वारांतील शेवटचा. याला पुराणात मंदवार म्हणत. मंद म्हणजे संथ. English मध्ये मंद = slow. अर्थ- गतीने जरा कमी. पण मराठीत slow= हळू संथ व मंद. पण प्रत्येक वेळी संथ व मंद शब्द नकारात्मक नसतो. गुणदर्शक असू शकतो. नाहीतर' "मंदा" हे नाव कोणी ठरवले असते का?      मंदाकिनी एक नदी आहे. जी संथ वहाते. तिला सहसा पूर येत नाही किंवा कधी कोणी,  प्रवाहात जोर नसल्याने वाहून जात नाही. आत...

शुक्रवार व शनिवार friday & sature day

 १९ .१२ .२०२३ . गुरूवारनंतर शुक्रवार व शनिवारच्या नावाची महतीही जाणून घेऊ या.   मत्प्रिय जिज्ञासू वाचक वृंद हो, गुरूवार ह्या  पाचव्या वाराची माहिती, बहुदा बर्‍याच वाचकांना नवीन असावी. नवल म्हणजे विभिन्न, अशा दूर देशीच्या, संस्कृतीत, वारांना नावे, समान अर्थी असणे,त्या काळातील, " अजुबाच" होय. तर अाता शुक्रवार व शनिवार. या शनिवारच्या नावात ही हेच आहे, बघा शनि व sature त्याच ग्रहाचे नाव. अाता वळू  या.  शुक्रवारकडे. आजचा दिवस. तुम्ही म्हणाल हा देवीचा वार. संपूर्ण भारतभर, हा शुक्रवार वेगवेगळ्या देवीच्या उपासनेचा मानला जातो. तिला प्रसन्न करण्याच्या अनेक पध्दती नेमून दिल्या आहेत. पण एक ध्यानात बाळगा. देवी मग कोठचीही असो. ती निर्मितीची प्रतिक असते.  आपले जन्मदाते मातापिता व आपल्याला घडवणारी संपूर्ण दुनिया तिचेच रूप आहे.  आता शुक्र ग्रहाचे नाव बघा. इंग्रजी नाव VENUS - goddess of love. प्रेमाची परिणती विवाहात होणे, अावश्यक व योग्य आहे नं? मग येतो पत्रिकेतील उल्लेख. त्याच्या/ तिच्या पत्रिकेत शुक्रबळ कमी पडतेय! मग ही काय भानगड आहे बरे.  दोन जीवांना एकत्र आणतो,...

गुरू= " गु" कार-- अंधकार. व " रू" कार = तेज- होकार- स्विकार

 १८ .१२.२०२३ . .  गुरू= "गु"कार-- अंधकार व रूकार= तेज- होकार- स्विकार.     माझ्या सुजाण व सुज्ञ वाचक मंडळीनो, काल मी काल लिहिले होते,या वायस पक्ष्याची, कावळ्याची योग्यता पाहू. परंतु, त्या आधी, " गुरू" ची महती व आपल्या जीवनातील,  महत्व पाहू. जसे इतर पक्ष्यांनी, त्या योग्य गुरूसमान, अशा त्यांच्याच, बरोबरीच्या, जाणकाराचे बोल, मान्य केले. तसे आपण ही, आपल्या "गुरू"विषयी ज्ञान घेऊ या.     गुरू ग्रह मालिकेतील पाचवा ग्रह. आकाराने सर्वात मोठा. लहानाला बोलतात, लघु व मोठ्याला बोलतात, गुरू म्हणजे समर्पक नाव.    गुरू म्हणजे शिक्षक अध्यापक , हे तर सर्वांनाच माहीत  आहे, पण हा शब्द कसा तयार झाला, ते पुढील श्लोकावरून समजते.   गुकारास्त्वन्धकारस्तु रुकार स्तेज  उच्यते।   अन्धकार निरोधत्वात् गुरुरित्यभीधीयते। ।    अर्थ बघु या.   "गु" कार म्हणजे अंधार.                       " रु" कार म्हणजे तेज.               जो अज्ञानरूपी अंधारा...

पक्ष्यांचा राजा भाग २. योग्य राजकर्त्याची निवड.

 १६.१२.२०२३ .  पक्ष्यांचा राजा भाग २.  योग्य राजकर्त्याची निवड.    मत्प्रिय सजग वाचकवृंद हो,      बघा हा पक्षी,कावळा किती अक्कलहुशारीने, इतर पक्ष्यांना योग्य दिशा दाखवतो.  उगीच नाही संस्कृतमध्ये त्याला, "वायस"  असे संबोधन आहे. वायस म्हणजे योग्य अयोग्याची पारख असलेला. आपण मात्र त्याला, त्याच्या रंगावरून, तुच्छ लेखतो. खरे तर तो आपल्यासाठी,सफाई कामगाराची भुमिका वठवतो. म्हणून तर त्याला चाणक्यांनी गुरू मानले आहे.  हंस- मराळास  ," नीर क्षीर विवेक बुध्दी म्हणतात. हे जर खरे असेल, तर ह्या कथेप्रमाणे, तो दूध- पाणी एकत्र असल्यास, त्यातील - दूध फक्त पितो व पाणी खाली शिल्लक ठेवतो. पण  या उलट, हा काक पक्षी सर्व ठिकाणची घाण आपण सेवतो. व स्वच्छता राखतो. असो. कालची कथा पुढे सांगते.      दुसरा भाग. सुतार पक्षी बसायला लाकडाचा ओंडका आणतो.               पोपट पानांची  शाल अ‍ाणतो.                   खंड्या फुले आणतो.         ...

सुयोग्य राजकर्त्याची निवड

 १५.१२ .२०२३. माझ्या सुजाण वाचक हो,           काल मी लिहिले होते. आपल्याला मत- दान करायचे नाही. तर मताधिकार बजावयाचा आहे. अहो, हा  मतदान शब्द, कोणी प्रचलित केला असेल, त्याल लोकशाही कळलीच नाही. हो, मी स्पष्टच लिहीत आहे. पण मला सांगा, आपण दान कोणाला करतो. आपल्यापेक्षा, ज्याच्याकडे, " काही कमतरता आहे, त्याला नं, मग इथे उत्कृष्ट दर्जाचा  राजकर्ता निवडायचा आहे, तो आपल्या सर्वांच्यापेक्षा, उच्च विचाराने व उच्च आचाराने युक्त हवा असेल, तो दान देण्या योग्य व आपण दानशूर त्याची गरज पूरी करणारे, हे समीकरण बरोबर आहे का?           आता मी तीच माझी आवडती, विष्णू शर्मांनी( चाणक्य), आळशी व  व्रात्य राजकुमारांना सागितलेली कथा, नाट्यरूपात खाली सांगत आहे. अहो, कावळ्याला कळते, ते आपणा  मानवांना का कळू नये बरे?            तर वाचा "पक्ष्यांचा राजा" शासनकर्ता.  पक्षी वर्ग नवीन राजाच्या शोधात.   सर्व पक्षी आपापला आवाज काढतात . तेथून घार उडत येते.        घार:-  काय रे, क...

मंत्रपुष्पांजलि- मार्फत, सर्वोत्तम राजाची मागणी

Image
 १४.१२ .२०२३ . मंत्रपुष्पांजलि- मार्फत, सर्वोत्तम राजाची मागणी   सुजाण नागरिक व सप्रज्ञ वाचकहो, शंभुराजेंनी, बुधभुषण, या ग्रंथात राजकर्त्याचे गुण लिहिले आहेत' त्याची झलक पाहिली. तसे  तर आपण नेहमीच, या योग्यतेचा राजा, परमेश्वराकडे मागत असतो.       आपण मारे ऐटीत सर्व पूजे नंतर मंत्रपुष्पांजली खुल्या आवाजात म्हणतो.  खरे तर जोराने(  बोंबाबोंम करीत). पण काय बोलतो,  कोणास ठाऊक. हे नकळताच, लहान मुलांप्रमाणे पाठ केलेले बोलतो. Play school मधील मुले जशी बोलतात, तसेच 🤗.   rain rain go away ही कविता, कोठच्याही season मध्ये बोलतात, तसे.  या मंत्रपुष्पांजलीतून, आपण चांगला शासनकर्ता मागतो. पण  आज  आपल्याला लोकशाहीमुळे CHOICE अाहे, तर   VOICE उठवा नं.  या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. सर्व जनता सदैव जागृत असावी. शासनकर्ताबाबत  अंधश्रध्दा न ठेवता, त्याच्या कर्तव्याबाबत सावध व तत्पर असावी. प्रजेच्या अपेक्षांचा राजांने आदर करावा. निस्वार्थ वृतीने राज्यकारभार करावा. त्यामुळे प्रजा सुख समाधान पावेल व राजकर्त्या...

शंभुराजांच्या, बुधभुषण या ग्रंथातील राज्यकर्ता कसा असावा, हा तपशील

 १३. १२.२०२३. शंभुराजांच्या बुधभुषण या ग्रंथातील, राजकर्ता कसा असावा, हा तपशील.     माझ्या सुज्ञानी वाचक हो, संभाजीराजेंनी आपल्या बुधभुषण या ग्रंथांत, राजा- राजकर्ता कसा असावा, ह्याचे वर्णन केले आहे.   आज माझी मोठी चूक मला नडली. मी संपूर्ण ब्लॉग लिहिला अन् माझ्या asstt ला पाठवताना select केल्यावर copy च्या ऐवजी चुकून cut press केले. अन् पुर्ण लिखाण परत लिहित आहे. खरे तर, अरे बाप रे म्हणून मी निराश झाले. मग विचार केला, अरेच्चा!  अाज अापल्याला सर्व सुविधा आहेत. चूक झाली तर   सुधारण्याचा मार्ग आहे. पण पूर्वी शाई- टाकाने लिहिताना, काय उपाय होता? बहुदा, पूर्ण पान बदलायला लागत असेल! मग त्यांनी ग्रंथ लिहिलेच नसते तर???  आपल्याला ज्ञान कसे मिळाले असते? सोचो, सोचो.      हां. काल,मी लिहिले होते, या ग्रंथा सोबत, शंभुराजांनी, दोन ग्रंथ - नखशिख व सात शतक, हे ब्रिजभाषेत ग्रंथ लिहिले आहेत. ज्यांना, हे कसे शक्य आहे, असा प्रश्न पडला असेल, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र, नीटपणे, अभ्यासिलेच नाही, असे म्हणावे लागे...

छत्रपती संभाजी महाराज व एकनिष्ट कवी कलश

 १२.१२.२०२३ .  छत्रपती संभाजी  महाराज व कवी कलश.   मम सजग व प्रज्ञावंत वाचक हो,          छत्रपती संभाजी महाराजांची खरी ओळख व महती,   त्या काळी, तत्सम जनतेने व प्रजेने जाणून घेतली असती तर~~ आता जर तर म्हणण्यात काही अर्थ नाही. पण या धुरंधर योध्याला, सामान्य जनतेने साथ दिली व संताजी व कवि कलशा सारखे इतर ही स्वदेशप्रेमी व स्वधर्मनिष्ठ   सगे सोयरे मिळाले असते, तर आपले आजचे जीवन किती समृध्द समाधानी असते व स्वधर्मात योग्य स्वतंत्र व स्वबल झालो असतो.  जर कित्येक सरदारांनी स्वार्थी विचार न करता, या शिवशाहीत स्वतःला झोकून दिले असते तर ~,  मोगलांकडून, एखादे इवल्याशा वतनाचे धनी होण्यासाठी मतलबी न होता, संपूर्ण मराठा राज्याचे अधिपति झाले असते.  आरती नंतर जी मंत्रपुष्पांजलि  म्हणता ना, त्याचा अर्थ माहित आहे का? ते स्वप्न तेव्हाच सफल झाले असते. निदान अाजतरी  जागे व्हा. जगजेत्ते होऊ शकणार्‍या आपल्या पंतप्रधानांना, मा.मोदींना साथ द्या. हिंदुत्व त्यांना कळलेय हो.  हां तर, आपण परत वळू या, बुधभूषणकडे. कित्येकजण न...

इतिहासात शिरलोच आहोत, तर आपल्या छत्रपती संभाजी राजेंची नव्याने ओळख करून घेऊ या.

 ११. १२ .२०२३. इतिहासात शिरलोच आहोत, तर आपल्या छत्रपती संभाजी राजेंची नव्याने ओळख करून घेऊ या.      माझ्या महाराष्ट्रप्रेमी व मराठीचे अभिमान बाळगणार्‍या वाचक वर्ग हो, मी आपल्या लाडक्या शंभुराजांची व त्यांनी लिहिलेल्या, संस्कृत ग्रंथाची माहिती व त्यांचे हे लिखाण, आपल्यासमोर मांडणार आहे. खरे सांगा कितीजणांना, या  शंभुराजा  लिखित  " बुधभुषण " ग्रंथाची माहिती आहे. हा, ३ वर्षापूर्वी, मी माझ्या ह्याच ब्लॉगमधून याविषयी व त्यातील विषयाबाबत लिहिले होते. पण आज, नवीन आलेल्या वाचकांसाठी-ही पुनरावृत्ती. त्यावेळच्या वाचकांना परत जागृत करावे, हा हेतू. पण आपले मराठ्यांचे दुदैव म्हणजे, ह्याचे हस्त लिखित( जे शंभुराजांनी स्वः हस्ते- लिहिले आहे, ते आहे, "" इटलीत""  ते आणावे,असे कोणा ही राजकारण्यांना वाटले नाही- वाटत नाही.😕🤔.  आता बुधभुषणातील समृध्द शैली अभ्यासू या.       ह्यात ते सूर्याचे स्तवन करत आहेत. बघा.   सिन्दूरस्पृह्या स्पृशन्ति किरणं कुम्भस्थमाधोरणा ।   भिल्ली पल्लवशंकया विचिनुते सान्द्रं द्रुमद्रा ।   कान्ताः कुंकमशंकया ...

नाव:-अाता जरा इतिहासा - सोबतच, आपल्या धर्मग्रंथातील, शास्त्रीय संशोधनात्मक सत्य पाहू.

Image
 9.12.2023. आता जरा इतिहासा सोबतच, आपल्या धर्मग्रंथातील, शास्त्रीय संशोधनात्मक सत्य पाहू.    माझ्या प्रिय व ज्ञान - शास्त्र - प्रिय वाचक मंडळींनो, आज मी तुमची ही जिज्ञासा पूरी करते. एकदम सोप्या व रंजक रितीने.      महाभारत कथा, सर्वांना माहितच असेल. त्यातील काही अति रंजित कल्पनेतील, शास्त्रीय सिधान्त दाखवते. काही दिवसापूर्वी, मी या ब्लॉगमधून एक मुलाखत दाखविली होती."शरशय्या" लेखक, श्री.प्रफुल्ल फडके. त्याचा दुसरा भाग देत आहे. कौरव व पांडव जन्म कथेचे, सत्य बघा. आजकालच्या, practical दृष्टीकोनातून ही perfect पटतेय बघा. संदर्भासाठी पहिला भाग ही देत आहे. शनिवार व रविवार मिळून परत परत बघा व इतरांना ही दाखवा. त्यासाठी अर्थात् share this to spread our हिंदुत्व. ही अंधश्रध्दा नव्हे, तर डोळस व दूर सत्य दर्शन. तिसर्‍या भागात, १०० कौरवांची नावे- श्री. फडके यांच्या सौजन्याने.

टेहळणी बुरूज. सांप्रत जे जे गरजेचे आहेत ते ते.

 ८.१२ .२०२३. टेहळणी बुरूज.          प्रिय वाचक मित्रमैत्रिणींनो, मी, हे जे शिर्षक दिले आहे. त्याविषयी जरा सविस्तर सांगावयाचे झाले, तर मी माझ्या या ब्लॉगच्या आरंभी २०२० साली लिहिले होते, त्याची पुनरावृती -( विचार व आचार करण्यासाठी) दोन महिन्यापूर्वी केली होती. जरा आपल्या स्मृतीला जोर द्या. असे अनेक प्रसंग आठवतील. ज्यात, आपण जरा लक्ष घातले असते, तर---- असे जाणवते कि, आपण परिस्थितीत नक्कीच बदल करू शकलो असतो.  अन् आपले कौतुक झाले असते. निदान स्वतःचा फायदा झाला असता. परत वाचा. व विचार करा. या प्रकारे, आपण बदललोत का? टेहळणी बुरूज आजचे. गस्त वर्तमान काळातली. सतर्क व सुज्ञ वाचकहो, मी काही इतिहासात शिरत नाहीये. आजच्या वर्तमान काळच्याच टेहळणी बुरूजांसंबंधी लिखाण करणार आहे.                     टेहळणी बुरूज.  आपल्या छ.शिवाजी राजेंच्याच हर एक गडावर, दुर्गावर चारी बाजूस " टेहळणी बूरूज" असत. ते सर्वांना माहित आहेतच. आज आपले ही प्रत्येकाचे गड व किल्ले व दुर्ग आहेत. आपण साधी माणसे, पण तरी ही असतात. काय म्हणता,...

इतरांनी निभावलेले, "पालकत्व" समजून स्विकारा.

 ७.१२ .२०२३ . इतरांनी निभावलेले, "पालकत्व" समजून स्विकारा.    माझ्या सुजाण व समंजस वाचक वृंद हो, स्वागतम्. काल मी, आपल्याला,  स्वःपालकत्वाची  मासले सांगितले, पण पूर्वी हे, असे  स्फूर्तीने,  घेतलेले, पालकत्व, स्विकारले जात असे. कारण त्यामागेच खरी खुरी माया असे. शिवाय त्या मुलांच्या पालकांनीही, दुसर्‍यांच्या बाबतीत,    "असे पालकत्व" निभावलेले असे. पण आजच्या, "मला काय करायचेय" या वृत्तीच्या मंडळींना, या दोन्ही बाजू समजणे व उमजणे, कठीणच. सांगायचे तात्पर्य हे कि,  मुलामुलींनी ही, त्यांच्या सांगण्याच्या पध्दती व शैलीची जाण ठेवून, आपले भले साधावे. त्यांचे सांगणे, आत्मसात करावे. हे असे साध्य होण्यासाठी, एकएकट्याने,समोरून एकएकट्या मुला वा मुलीला हटकण्यापेक्षा, वेगळीच कल्पना लढवता येईल. बघा. घरात बसून, एकटीने, फालतू मालिकेत, रमण्यापेक्षा,  ३.४ जणी एकत्र येवून, थोडे विचार करून, एखाद्या  घटनेचे, नाट्य रूपांतर करून, शाळा- कॉलेजेसमध्ये, परवानगी घेऊन,  सादरीकरण करावे. त्यातून, कित्येक मुलांचे, एकलकोंडेपण, शोधावे. त्यांच्यांशी संवाद साधाव...

पालकत्व हे फक्त जन्मदात्यांचीच जबाबदारी नसते. तर ती सभोवार असलेल्या व नातलगांकडे ही असते.

 ६.१२ .२०२३ .पालकत्व  हे फक्त जन्मदात्यांचेच नसते. तर सभोवार असलेल्या व नातलगांकडे ही असते.    मत्प्रिय वाचक वर्ग हो, आपणापेक्षा लहान (वयाने व  अधिकाराने) असणार्‍या समस्तांच्या, संस्काराची जबाबदारी, आपल्यावर असते. ती कशी निभवली जाते, त्यावर समाजात, आपल्याला मानाचे स्थान मिळते. साधे uncle and aunty म्हणवून, घेण्यात, ज्यांना कमीपणा वाटतो, त्यांना वयाने मिळणारा मान मात्र हवा असतो. मग ते शहाणपण शिकवण्यात, मात्र पुढाकार घेतात. असो.  " पालकत्व." जर लहान मुलांवर लक्ष ठेवायचे व वळण लावायचे तर हेतू चांगला असावा. आपल्याला, कथित त्रास होतो, या नाहक कल्पनेतून, राग काढू नये. आता मी माझेच, दोन अनुभव, लिहिणार आहे. असे निख्खळ, मार्गदर्शनानिमित्त.  रागवणे, निश्चित योग्यच. पण मुलांना सुधारण्याचा हेतु असावा. काळजी असावी. कळकळ असावी.   १आमचे एक नातलग. म्हटले तर जवळचे वा नाते शोध घेतल्यास, जरा लांबचे. श्री. सुधाकर सबनीस.-      माझी ताई ठाण्याला राहत होती. सचिवालयमध्ये कामाला, आम्ही दादर रहात असू. ती दादरला गाडी बदलत असे. माझी भाची (वय दिड ते दोन) आमच्या...

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा.

 ५.१२ .२०२३. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा.       माझ्या सुज्ञ व जाणत्या वाचक हो, कालच्या लेखात, मी हाच मुद्दा, विचाराधीन घेतला होता, आठवतेय ना? त्याच  बरोबर, या  संत तुकारामांच्या उक्तिची दुसरी बाजू मांडली होती.  वयस्क rather म्हातारपण आल्यावर,  ते संत, परत "लहानपण" मागत नाहीत, तर समोर जी लहान मुले आहेत, त्यांचे लहान वय समजून घ्या व ते जपा, असे ते सांगता आहेत. कालच्या प्रकरणात, त्या गृहस्थांना, जर आपले बाल्य आठवले असते, तर ते त्या मुलांच्या खेळात सामील, निदान आनंदात रमले असते.  असो. नंतर मी  मुलांच्या, घरातील problem चा उल्लेख केला होता.  आजकालचे पालकही, मुलांच्या आनंदात सामील होत नाहीत. महागड्या वस्तु आणतात. पण वेळ देणे, इल्ले! हां फक्त त्यांच्या, अभ्यासातच interested असतात.   O!  young parents & elder parents, please remember that, actually , when , you have laugh  with yours  kids' any jokes or school   friends'  knews which are important to them.  कधी खदखदून हसलात, ते आठवा...

जसे आपण तशीच आसपासची दुनियासुध्दा आपल्याच मनासारखी असली पाहिजे,हा दृष्टीकोन चुकीचा होय.

 4.12.2023  जसे आपण तशीच आसपासची दुनियासुध्दा आपल्या मनासारखीच असली पाहिजे, हा चुकीचा दृष्टीकोन.           माझ्या समानशील वाचक मंडळींनो, हां, वरच्या शिर्षकाला, धरून पाहता, मी हे गृहित धरत नाहीये कि, समस्त जनता,माझ्यासारखी असावी. पण संत तुकारामांनी लिहून ठेवलेय, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा."            म्हणजे लहानपण हा स्वतःला घडविण्याचा काळ. तो त्यांना मुक्तपणे जगून व भोगून द्या. कसा तर, जसे मुंगी एक एक कण वेचून, साखरेचा साठा ( त्यांच्या लेखी- महत्वाचा ठेवा) करते, तसेच सामान्यपणे, माणसांचा ,        " ठेवा" धनरूपी असतो. पण मुले निष्पाप व निर्दोष असतात. त्यांना तसेच ठेवणे, आपले पालकांचे व आजूबाजूच्या वयस्क मंडळींचे कर्तव्य असते. मुलांना  सामोरे जाताना  नेहमी आपले बालपण विसरू नये. ते अतिशिस्तबध्द असते तर~~ हा विचार करावा. जर आपल्यावर लहानपणी अन्याय झाला असेल, तर तेच दुष्कृत्य आपल्या हातून घडू नये, यासाठी दक्ष रहाणे, आवश्यक आहे. मोठी माणसे, त्यांच्या सायंसमयी, बागेत, सोसायटीच्या आवारात, स...

The human being us social animal. We always need company of same agers

 २.१२.२०२३ .The human being is a social animal. We always need, the company of, the same agers.       माझ्या सुजाण मित्रमंडळीनो, हे सत्य, तुम्ही जाणतातच व त्याप्रमाणेच जीवन जगता ना? मग माझ्या कालच्या मुद्दावर नीट व खोलवर विचार - विनियम करा हो. विनियम म्हणजे, विचाराची देवाण- घेवाण. तिच्यापासून, अभ्यासाच्या अतिरेकापायी, आपल्या मुलांना, वंचित करू नका हो! हां, तर कालचा मुद्दा, एका सत्य घटनेच्या आधारे, तुमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न, मी आधीच केला होता, आठवत असेल. नव्या वाचकांसाठी परत एकदा,  forward करते. ज्यांनी ४ महिन्या पूर्वी, ती फक्त बातमी म्हणून वाचली असेल व सोडून दिली असेल, त्यांनी वाचून, त्याचे चिंतन व  आकलन करा. ओळख व मैत्री कोणाशी असावी वा कोणाशी नसावी.        वाचकमंडळी हो. मी आज याबाबतचा माझा दोन वर्षापूर्वीचा (२३.८ .२१) लेख- ब्लॉग तुमच्या समोर ठेवणार आहे. कृपया हा वाचून व आपल्या मुलांमुलीं व नातवंडाना वाचून दाखवावा. तरूण वाचक वर्गाने,आपल्या मित्र मैत्रिणीत यावर चर्चा करावी. ही  कळकळीची विंनती. हे तुमच्या हितासाठीच आहे....

दोन्ही बाजुस,अति महत्वाकांक्षा असेल, तर विश्वास डळमळित होतो हो.

 १. १२.२०२३ . दोन्ही बाजूस,  अति महत्वाकांक्षा असेल,तर विश्वास डळमळीत होतो.    माझ्या सुज्ञ वाचक मंडळींनो, वरील दोन्ही भावना, प्रगतीसाठी आवश्यकच आहेत. पण त्यासाठी  या आशा व आकांक्षांवर जरा काबू ठेवणे, गरजेचे असते. आशा- आकांक्षा नक्कीच असाव्यात. पण त्य‍ानिमित्त, आपले वर्तन- वागणूक, मर्यादाशील असावी.  आकांक्षा बाळगाव्यात, पण त्यांच्या पूर्तीसाठी, दूरदर्शी सावधानता राखावी. योजना युक्तीने परिपूर्ण असाव्यात. फार मोठ्ठे गंभीर लिहिलेय नं? पण तेच आपल्या साध्या व सरळ वर्तनाने सुलभ व यशदायी होऊ शकतात. दोन समांतर जगणार्‍या व्यक्तींच्या अपेक्षा व आकांक्षा - चांगल्या असूनही- विरुध्द दिशेने जात असतील, तर संघर्ष अपरिहार्य होतो. मग समजूतीने मार्ग न काढल्यास, एकमेकांवरील विश्वासाला तडा जाऊ शकतो. आता या बाबत, एक म्हण perfect fit बसते, "घरोघरी मातीच्या चुली", अर्थात् सगळीकडे, या बाबत अतिरेक नाही होत... पण  काहीजण असे असतातच. मी कोठच्या गोष्टी बद्दल बोलतेय, चाणाक्ष वाचक अंदाज लावतीलच. पालक- बालक. अर्थात् अभ्यास मार्क- रँक.      काही पालक ८०ते ८५% मध्ये खुश ...