Posts

Showing posts from February, 2024

सभ्यता व संस्कार कोठे मिळतेय का बाजारी?सुसंस्कार ही पालकांची जबाबदारी, होय.

 २९ .२ .२०२४ . सभ्यता कोठे मिळतेय का बाजारी? सुसंस्कार ही पालकांचीच जबाबदारी. होय.  व माझ्या सुसंस्कारी व समंजस वाचक हो,                 माझ्या लिखाणाला- माझ्या सामाजिक हाकेला, मनपूर्वक, प्रतिसाद देत आहात. मी आज फार पूर्वीचा लेख (२१.९ .२१ चा लेख पुनर्प्रसारीत करीत आहे. मी  काही बाबतीत, आदिवासींच्या श्रध्देचा, अनेक वेळा आदरयुक्त उल्लेख केला होता, आठवतोय. इथे शहरवासीय, स्वतःला सामाजिक रित्या सुशिक्षित मानतात. अन् या  डहाणूच्या आदिवासींना अडाणी. अर्थात् मदतीचा हात पुढे करतात.  आम्ही पूर्वी व.क.आ. च्या माध्यमातून, तेथे जात असू. मोजकेच खरे कार्यकर्ते. पण दिवाळीला खूप लोक येत खाऊ वाटपासाठी. तुम्हाला ऐकून माहित असेल,आदिवासी महिला फक्त साडी नेसतात. चोळी- पोलके  नसते. तर त्यावेळी  आमच्यापैकी एका महिलेने, त्यांच्यातील,बाळाला  अंगावर पाजत बसलेल्या आदिवासी बाईंला, याबाबत सल्ला दिला, त्या बोलल्या, " अग, पुरूष माणसे वाईट नजरेने बघतात." ती जरा नवलाने बघू लागली. अन् त्यांच्यातील, जवळच बसलेले, वयस्क गृहस्थ काय म्हणाले म...

गुन्हाची विषवल्ली आज विराट व उग्र स्वरूप धारण करतेय.

Image
 २८.२ २०२४.   गुन्हाची विषवल्ली आज विराट व उग्र स्वरूप धारण करतेय.         मम सतर्क व सजग वाचक हो, काल मी लिहिले होते. केसाचा गुंताडा आपणच करतो.  ही जी गुन्हाची विषवल्ली फोफावतेय. पण का व कशी बरे? आपली जनताच तिला खतपाणी घालतेय.  सर्व  जेष्ठ नागरिक retirement, नंतर मिळालेल्या धनाची, हव्यासापोटी डब्बल तिब्बल करण्यासाठी investment &share च्या मागे लागतात.  त्यासाठी online सल्ले मागतात. अरे बाबांनो, retire होण्या आधी ४.५ वर्षे या investment & shareability चा अभ्यास स्वतः करा.आपल्या मुलांची, काही स्वप्ने  वा योजना असतील , तर त्यात स्वतः ही भागीदार बनून, invest करा. धनासोबत तन मन ही लावा. उगीच time killing चा सवाल ही पैदा होणार नाही. आता बघा. ही बातमी- स्वतः व्यावसायिक असलेला फिर्यादी. त्याला म्हणे, share maket trading आमिष दाखवून तीन कोटी ७०लाखाला लुबाडले. हे म्हणजे, त्या victim चे , "आ बैल मुझे मार, सारखी गत आहे. अरे,  एवढ्या मोठ्ठ्या रकमेने, जो आपला व्यवसाय आहे, तो वाढवायचा नं?    एक सांगू, सकल नोकरदारा...

आपण ही गस्त घालू या. गुन्हाची विषवल्ली गाडून टाकू या.

 जे शिष्यांना शिस्त- वेळेवर मन लाऊन अभ्यास करणे व परिक्षेत,  ते सादर करणे, हे स्मरणशक्तीचे साधन समजाऊन सांगू शकत नाहीत, ते खरे गुरूच नव्हे. असले शिक्षक तर पैसा टाकला तर , पैशाला पासरी मिळतात. तेव्हा असल्या गुरूंपासून दूर राहावे, यातच आपले भले आहे. हा जो दासबोधातील बोध आहे, तो सर्वांना, सर्वकाळ व संपूर्ण आयुष्यभर लागू पडतो. हे चिरंतर सत्य जाणून घ्या व आत्मसात करा. ह व नुकसानीपासून, स्वतःला वाचवा. जें जें मन अंगिकारी ।           तें तें स्वयें मुक्त करी ।          तो गुरु नव्हे, भिकारी- ।           झडे आला ॥ २०॥         आता बघा, आपण जो गुरू म्हणून choose केला, तोच वेळकाळ न पाहता, मनमानी करत असेल. तर चेल्यांना काय आदर्श राहणार? चाणाक्ष. चातुर्य. तुर्यावस्था. चतुर.   हे चार शब्द आठवलेय, चतुर्थीवरून.    तर आपला मुद्दा आहे, गुरूंसंबंधी. या, " गुरू" शब्दाचा नेमका अर्थ आहे महान- मोठा. उलट शब्द आहे- लघु- लहान.  तसेच आपल्या नवग्रहात, जो आकाराने, मोठा आहे, तोच  "गु...

प्रेमाचा संकुचित अर्थ व मर्म. GF/BF. अन् तिपेडी वेणी (😀).

 २४.२ .२०२४ .  प्रेमाचा संकुचित अर्थ व मर्म.      माझ्या सजग व सुज्ञ वाचक मंडळींनो, तुम्ही सर्व वयांच्या गटातून आहात, हे मी जाणते. पण आपण समस्त सामाजिक रित्या एकमेकांत गुंतलेले असतो. कुमारवयीन मुलांचेच जीवन वेगळे, विचारात घेणे, अशक्य आहे. किंवा जेष्ठ नागरिक म्हणजे, काही वेगळा, गट नसतो. यातील महिलांना, ही उपमा नेमकी, समजेल, आपण तिपेढी वेणी घालतो, अंबाडा बांधतो वा केस मोकळे सोडतो. पण केसरचना ही सर्व केसांची मिळून असते. तशीच ही समाज रचना आहे. आपले केस काळे असतात. पाश्चात्यांचे सोनेरी तर निग्रोंचे अगदी कुरळे. पण ते एकमेकांशी सलग्न असतात. हे सगळे, गोंधळात टाकणारे लिखाण वाटले, तरी ह्यातच, आपल्या समाजाचा प्रतिबिंब आहे.       तर कालचा मुद्दा. girl friend- boy friend चे फॅड.            मित्रमैत्रिणी असाव्यात. पण त्या अर्थपूर्ण असाव्यात. एकमेकांना सहाय्य करण्यासाठी असाव्यात. अडचणीच्या वेळी हात देणार्‍या असाव्यात. मदत मिळेल, हा विश्वास असावा. नुसतेच गळ्यात हात घालून मैत्री होत नसते.            ...

आजची १८ ते २१ वयाची पिढी. rather त्यांच्या संबधित व्यक्ती- पालक व नातलग (आजी- आजोबा)

 २३.२.२०२४.  आजची १८ ते २१ वयाची पिढी. rather त्यांच्या संबंधित व्यक्ती पालक व नातलग ( आजी आजोबा).यांना लेख समर्पित.     मत्प्रिय वाचकहो, मी तरी तुम्हा सर्वांना प्रियतम मानते. समोरून काय भावना आहे, राम जाणे. मी सतत लिहिते, "राम" शब्दाचा अर्थ  आपली क्षमता. त्यावर भरोसा ठेऊन, आपल्याकडून काहीतरी चांगले घडेल, अशी अपेक्षा व आशा आहे. ह्या लेखांचे' नुसतेच कथा कांदबरीसारखे वाचन नको हो.      " राजस्व मनाचे"ची साठवणूक व्हावी. आज ३.४ दिवस मी मुद्दाम, typing mistake करत राहिले. पण कोणाच्या ध्यानात आले नाही कि कसे, राम जाणे😍😊.  असो.       मी,माझ्या विषयाकडे वळते.    १४ फेब्रुवारी - व्हँलेंटाईन डे. अाज हा प्रकार आपल्या देशात इतका बोकाळलाय. अहो, पाश्चिमात्यांचे अनुकरण करावयाचे, तर त्यांचे धार्मिक एकत्रिकरण, अंगिकारा.  नियमित चर्चमध्ये जाणे व लग्नाच्या वेळेस, शांतता बाळगणे. तेव्हा पाद्री जे सांगतात, ते सर्वजण,अगदी मुले ही गांभिर्याने ऐकतात.                हे मात्र माझ्याकडून विषयांतर झाल...

आता निवडणूजा जवळ आल्या. मतदान करायचेय. योग्य शासनकर्ता निवडायचाय

 २२. २ .२०२४ .आता निवडणूका जवळ आल्या. मतदान करायचेय. योग्य शासनकर्ता निवडायचाय.    समस्त भारतिय नागरिक हो, सध्या मी माझ्या प्रिय वाचकांशी बोलतेय. पण हे सकल मतदार संघाला उद्देशून आहे. आता बघा, स्व. राजीव गांधींच्या काळात, मतदारांचे वय २१ वरून १८ केले. पण आज शिक्षणपध्दतीचा विचार करता, १८वर्षाची मुलेमुली आपल्या पायावर उभे आहेत का? जे अजून स्वतः कुठले शिक्षण घ्यावयाचे वा काय व्यवसाय करावयाचा, हा व्यक्तीगत प्रश्न स्वतः सोडवू शकत नाहीत. पालक वर्ग हे ठरवतात. त्यांना, शास्ता कसा असावा, हे तरी आकलन होईल का?  जी आज वय वर्षे ७५ वरील आहेत, ते आजच्या राजकारणाशी कितपत जोडलेली आहेत? वर्तमान पत्रे वा मिडिया वार्ताहर खरोखर निःपक्षपाती बातम्या देतात का?   नुसते ओरड करतात - कोणाला ही जाब विचारतात- जणू शासनकर्त्यासाठी ते न्यायाधीशच बनतात. आता विशिष्ट राजकिय नेता, फक्त  तोडाफोडीची भाषा करतो, दुसरा नेता, कानफडात व जोड्यांनी मारण्याची भाषा करतो. एक लहानवयीन नेता ज्याच्या-त्याच्यावर टिका अस्त्र सोडताना दिसतो. असो.    सध्या आपण आपला मतदार संघाचा विचार करू या. त्यासाठ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान बाळगणारे, त्यांचा आदर्श मानतात का व पाळतात का! " कायर व कायल"

 २१.२ २०२४ . छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान बाळगणारे, त्य‍ांचा आदर्श मानतात का व पाळतात का! "कायर व कायल." माझ्या अादर्श नागरिक वाचक मित्रमैत्रिणीनो, हो,तुम्ही कितीही वयाचे असाल, पण माझ्या मताशी सहमत आहात, म्हणून , माझ्या हा ब्लॉगमधील लिखाण वाचत आहात. खरे तर काही अप विचारापासून, आपण दूर आहोत, मग आपल्यात मैत्रच आहे ना!       आता हे बघा-  कायर व  कायल हे दोन्ही हिंदी शब्द.           उच्चारात जबरदस्त साम्य अ‍ाहे.  पण अर्थात  मात्र अगदी विरोधाभास आहे.   तसे पाहिले तर कायर negetive भित्रेपणा. म्हणजे एखादी गोष्टीला घाबरणे. त्या परिस्थितीला तोंड देऊ शकणार नाही, असे जाणवणे व मानणे. ह्या शब्दाशी सर्वच लहान मोठे परिचित आहोत.        पण मध्यंतरी बातम्यातून , " कायल" हा नवीन शब्द ऐकला. बहुतेक लोकांना माहित नसावा. मलाही त्याचा अर्थ कळला नाही.         बातमी अशी कि, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री. ट्रँप " हमारे भारतीय जीवनशैली" के कायल हुये।  मला हा शब्द नवखा वाटला. कोणी का...

कालचे स्मरण कालगेला आज आला.अन् मग गत दिवसाचे विस्मरण.

 २०.२ .२०२४ . कालचे स्मरण. काल गेला,आज आला. अन् मग विस्मरण.    माझ्या सुजाण वाचक हो, असेच होणार का? काल जी जयंती साजरी केली, ती आज व दर रोज कोण बरे, आठवणार?  एवढी स्मरणशक्ती  असती तर  त्यांचे कार्य, ज्यांनी" रामराज्य आणलेय, त्यांची जाण कोण कोण ठेवतेय बरे? " राजकारण सोडा नाही सांगत, उलट त्यावर, जनतेची पकड भारी असावी. चांगले ते धरावे, निष्काळजीपण सोडावे. अन् ही साठी नंतर आराम व विमा हेच जीवन न करावे. "आ" काढून टाका व "राम" मनी धरा. राम म्हणजे, आपली आत्मक्षमता. हीच आपली मालमत्ता. तिचा योग्य रितीने विनियोग- वापर करा. हेच वाचक वृंदाकडे, आवाहन करतेय.आज इतकेच. पण मोलाचे बोल. हा वसा घ्या व सोलोमन ग्रँडी न बनता. शिवबा बना. आज इतकेच.पण अनमोल. {श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम श्रीराम}

आज शिवजयंती. फक्त त्यांची जयंती साजरी करू नका. तर त्यांचा आदर्श मनी बाळगा व आचरणात आणा.

 १९. २ .२०२४ .आज शिवजयंती. फक्त त्यांची जयंती साजरी करू नका. तर त्यांचा आदर्श मनी बाळगा व आचरणात आणा.      माझ्या प्रिय मराठमोळ्या वाचक मित्रमैत्रिणींनो,  आज शिवजयंती. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिवस. आपण सर्व मोठ्या अभिमानाने व आनंदाने साजरा करतो. जन्मदिवस हा, मग तो कोणाचा ही असो, तो खरे तर मातेचा स्मरण दिन असतो. तीच आपली जन्मदाती असते. जिजाबाईंनी तर अगदी कठीण परिस्थितीत, शिवरायांना जन्म दिला अन् तेव्हाच त्यांच्या हातूनच,जणू मराठेशाहीचे कार्य घडविण्याचा निश्चय केला व पार पाडला. परंतू आज ही त्यांचा आत्मा, तळमळीने विचारत आहे, " कित्येक वरीस, या भारतवर्षात, माझ्या सुपुत्राप्रमाणे, शिवबाप्रमाणे, शास्ता लाभला नव्हता. अन् आज लाभला आहे. तर बहुतेक, मराठा मावळे, त्याच्या सोबत का नाहीत.  श्रीरामाचा जयघोष करण्याऐवजी, हे काय चाललेय?    खरे तर, एखादी गोष्ट शिकणे व त्याचा पूर्णतः मनावर  संस्कार होणे, हे जीवनाचे सार्थक ठरते. पण  त्यासाठी - इच्छा- ईर्षा- जिद्द असावी लागते. तरच त्या  क्षेत्रात शिरकाव व सर्वस्वी  रुजणे होते. स्वःला त...

हिंदुत्व व आपण सामान्य, जे जीवन जगत आहात, ते कसे आहे,हे जाणून घ्या. आपल्यामागे स्मृति गंध ठेवा. पैसा आनी जानी है।

 १७. २ .२०२४ .         हिंदुत्व व आपण सामान्य, जे जीवन जगत आहात, ते कसे आहे, हे जाणून घ्या.आपल्या मागे स्मृति गंध  ठेवा. पैसा आनी जानी  है।          माझ्या हिंदुत्व अभिमानी बंधु भगिनींनो, काल मी लिहिले होते, मी एक कविता सांगेन. अहो, आपण सर्व, ह्याच कवितेतील, नायकाप्रमाणेच, " हुबेहूब जगत आहोत. हे सत्य आहे, पण कोणास वळत नाही. हे वाचल्यावर नाराज होण्यापेक्षा, जीवनवृत्तीत बदल घडवा.           ही  इंग्लिश कविता आठवा. आमच्या पिढीने तिचा ८ व्या इयत्तेत अभ्यास केला. प्रश्न- उत्तरे लिहिली.         soloman grandy                    Solomon Grundy,                   Born on a Monday,                    Christened on Tuesday,                   Married on Wednesday,           ...

आज मी जे लिहिणार आहे, ते ह्रदयावर कोरून ठेवा. त्यात तुमचेच भले आहे.

 १६.२ .२०२४.        आज मी जे लिहिणार आहे, ते ह्रदयावर कोरून ठेवा. तुमचेच त्यात भले आहे.         श्रीराम.         माझ्या प्रिय देशप्रेमी वाचक मंडळी हो.           जरा स्पष्ट rather परखड लिहिणार आहे. कृपया नाराज न होता, विचार करा. दोनदा वाचा. मग नक्की पटेल. आज राममंदिर निर्मिती झालीय.पण आमच्या पिढीपासून, कित्येकांना ,एक सवाल बोचतोय. एका महान नेत्याने,  हिंदू धर्म सोडून वेगळा धर्म स्विकारला. अन् एक समाज निर्माण केला. त्यांचे अनुयायी, फेसबुकवर, आम्ही सरस्वती देवी मानत नाही. आमची देवी खरी वेगळी आहे व तीच सत्य आहे, सांगतात. रामाने, सितेला सोडले, ह्याची टिका करतात. पण मग महात्मा बुध्दाने मात्र, सर्वसंग परित्याग केला, असे मानतात. पण त्यांचा पुत्र तान्हा होता, त्यामुळे, नंतर त्या राज्याला, शासनकर्ता कोण होता बरे? श्रीरामाने राज्यकर्त्याचे कर्तव्य श्रेष्ठ मानले. हां, आणखीन् एक आरोप ही मंडळी करतात. सीता रावणाकडे होती, म्हणून तिला अग्निपरीक्षा करावयास लागली. वाचक हो विचार करा.  व्याकरण तर तु...

स्वातंत्रवीर सावरकरांचीच- एज विचारधारा - माझा एक ब्लॉग- पुनःश्च हरी ॐ

 १५.२. २०२४. स्वातंत्रवीर सावरकरांचीच -  एक विचारधारा- माझा एक ब्लॉग. पुनःश्च हरी ॐ.           माझ्या सुज्ञ व सुजाण वाचक वर्ग हो,  आज लग्नसराई जोरदार चालू आहे. लग्न म्हणजे, दोन घराणी, एकरूप होणे. ते दोघे जीव - पवित्र बंधनात- एकत्र येणे. त्यासाठी तसेच वातावरण असावे नं? पण आज त्याचा कित्येकदा, "पोरखेळ" चाललेला दिसून येतो. कसा  ते परत वाचा. सावरकरांनी ही अशा अनावश्यक खर्चाला प्रतिबंध केला होता. स्वतः च्या घरच्या विवाह समारंभातून याला आळा घातला होता.  तेव्हा ,माझा या बाबतचा लेख पुनर्वाचनसाठी rather - अमलात आणण्यासाठी देत आहे. बघा. विचार आचार बदला हो.        १फेब्रुवारीचाच आहे. पण अापल्या समाजाला परत परत hammer करणे,गरजेचे आहे.           मत्प्रिय पालक वर्ग हो, काल ब्लॉग लिहिला नाही, का असे वाटते बरे? लिखाणास सुरूवात केली अन् खालून दणादण डिजे व नवरदेव घोड्यावरून जाताना दिसले.  अरे लग्न करा नं, पण इतरांना  आवाजाचा त्रास कशाला?  लग्न म्हणजे काही शौर्य नाही कि, त्याचा दिखावा करून pu...

आपली ओळख करून घ्या. स्वतंत्र व्हा.सावरकरांनी, " स्वातंत्र्याबरोबर स्वतंत्रतेवर भर दिला आहे.

Image
 १४.२ .२०२४ .  आपली ओळख करून घ्या. स्वतंत्र व्हा. सावरकर‍ांनी, " स्वातंत्र्याबरोबर स्वतंत्रतेवर भर दिला आहे.     हो, मत्प्रिय सुज्ञान वाचक मंडळीनो, मी या दोन्ही शब्दातील अंतर कित्येकदा सांगितले आहे. आपल्या देशाचे स्वातंत्र आपण मिळवायचेच, हा सावरकर बंधूचा निर्धार, त्यांच्या अलौकिक त्यागाची महती, मी सांगणार आहेच.पण त्य‍ांचे एक सांगणे होते, स्वातंत्र टिकवायचे, तर "स्वतंत्र" व्हा. आज आपले पंतप्रधान ही हेच सांगत आहेत." आत्मनिर्भर व्हा. आजच्या पिढीच्या कळणार्‍या भाषेत बोलायचे, तर Self dependability  हवी. तीच, या त्रिबंधूच्या- तिघांच्या पत्नींनी, आयुष्यभर दाखवली.   काल मी तुम्हाला ही त्यांच्या बद्दलची पुस्तके विकत घेऊन वाचा,असे सांगितले. त्यात एक महत्वाचे पुस्तक म्हणजे       डॉ. शुभा साठे, ह्य‍ांचे, " त्या तिघी" . त्या तिघांना ,या यज्ञकुंडात साथ देणार्‍या तिघी जावा.  सौ. यशोदा गणेश( बाबाराव) स‍ावरकर, सौ.यमुना विनायक सावरकर व सौ. शांताबाई नारायण( डॉ) सावरकर. यांची देशनिष्ठा. ही गाथा लिहिताना, ह्या शुभा अक्षरशः त्या काळात, त्यांचे जीवन जगल्य...

सावरकर मूर्तिंना जन्म देणार्‍या मातेचे,आपल्याअंतःचक्षूंनी दर्शन घ्या.

Image
 १३. २ .२०२४.  सावरकर त्रिमूर्तिंना जन्म देणार्‍या मातेचे आपल्या अंतःचक्षूंनी दर्शन घ्या.    माझ्या भारतप्रेमी नागरिक वाचक हो, आपल्या सर्व भारतिय बांधवांनी, एकदा तरी, भगूर या स्वातंत्रवीर सावरकरांच्या जन्मगावी जायलाच पाहिजे. खरे तर अंदमानला भेट द्यावी. पण प्रत्येकाला , ते शक्य नसणार. आर्थिक व शारिरीक कारणास्तव.  काल मी लिहिले होते. त्या तीन सुपुत्रांना जन्म देणार्‍या जगन्मातेचे दर्शन घेतले. हो, तुम्ही म्हणाल, सध्य परिस्थितीत सावरकर बंधू ही स्वर्गवासी असताना, त्यांची आई~~ कसे शक्य आहे?  पण ते सहजशक्य आहे. आपल्या मनःचक्षूच्या सहाय्याने हे दर्शन घडू शकते. त्या वाड्यात, मन एकाग्र केल्यावर समस्त सावरकर परिवाराचे ," दर्शन" घडते.     या बाबत, एक दाखला देते. माझा एक अंध विद्यार्थी, एकनाथ, बाह्य रितीने पदवी घेत होता. जोगेश्वरीच्या blind workshop  मध्ये मी त्याचा अभ्यास घेण्यास जात असे.  परिक्षा झाल्यावर, मी जात नसे. तर तो फोन करून म्हणे, मॅडम तुमचे , " दर्शन" कधी होणार? इतर मुले हसत. तर तो सांगे, " आपल्यासाठी, मॅडमचा आवाजच, " दर्शन" आहे. तसे...

समाजकारण व समजकारण. धर्मवीर छ.संभाजी महाराज व हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्रवीर सावरकर.

 ११. २ .२०२४ . समाजकारण व समजकारण. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजव हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्रवीर सावरकर.    माझ्या नियमित वाचक मंडळींनो, काल लेख नव्हता. कारण मी, आपल्या स्वातंत्रवीर सावरकर ह्यांच्या जन्मगावी गेले होते. येथील, एका खंडोबाच्या मंदिरी, त्यांची कुलदेवी विराजमान आहे. तिच्या व त्या भारताच्या तिन्ही सुपुत्रांना जन्म देणार्‍या जगन्मातेच्या दर्शनास गेले होते.  कारण  ती माता आपणा सर्वांना पुजनिय आहे.     हो, कालच्या लेखात मी शेवटी जो शब्द  वापरला, समजकारण, तो माझा स्वःनिर्मित आहे. हिंदुह्रदयसम्राट वीर सावरकरांनी, अनेक शब्द निर्मित केले. इंग्लिश व उर्दु शब्दांना मराठी शब्द दिले. मी त्यांच्या foot prints वर चालण्याचा खारीचा प्रयास करतेय. समाजा कारणे केलेले, अन् समज देणार्‍या कारणे  केलेले कार्य. हा फेब्रुवारी महिना, आपल्या धर्मवीर (खर्‍या) छत्रपती संभाजी महाराज व हिंदुह्रदयसम्राट (खर्‍या) स्वातंत्रवीर सावरकर ह्यांच्या बलिदानाची गाथा वेळ. तर ऐका,     माझे त्या वाड्यातील बोल.

हे खरे समाजकारण. ज्यांना साधे जीवन व शिक्षण हे अधिकार समाजाने दिले नाहीत. त्या समाजासाठी त्यांची कळकळ.

 ९.२ .२०२४.           हे खरे समाजकारण.  ज्यांना  साधे जीवन व शिक्षण हे अधिकार दिले नाहीत. त्यांनी दाखवलेली कळकळ.    माझ्या लिखाणाचे मनःपूर्वक वाचन करणार्‍या व बहूदा, त्या  foot prints- follow करणार्‍या मम प्रिय वाचकहो,  कालचे मदतीचा हात देणार्‍या great person चे उदाहरण वाचलेत नं? आता त्याच समाजाचा , " ही महानता" बघा. अलौकिक कार्य आहे नं? मग आपण का मागे? तर वाचा व  वाचवा.       कारण ज्यांना, समाजाने rather  स्वतःच्या परिवाराने सुखी जीवनाचा व साधे शिक्षण घेण्याचा अधिकार दिला नाही, त्या समाजासाठी त्यांची. कळकळ.            तसाच दुसरा प्रसंग. मी १९९८ मध्ये काही हेतु ठरवून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली.  नंतर मी दहिसर पुलाखालील सिटी मिशन या अनाथ आश्रमात मुलांना शिकवायला जाणे, सुरू  केले. मी पश्चिमेला राहते व हा आश्रम पुला खाली पूर्वेला होता. अन् मला लाईन ओलांडायची भीति वाटते. म्हणून मी, पुला खालील बस स्टॉपवर उतरून मागे रेल्वे ब्रीजने पूर्वेला जात असे व पुन्हा चालत उलटी...

आज एक व्हिडिओ पाहिला व एक आठवण जागृत झाली. वाचा तर त्या महान व्यक्तीची निरपेक्ष कृती

Image
 ८.२ .२०२४ .आज  एक व्हिडिओ पाहीला व एक आठवण जागृत झाली. वाचा तर त्या महान व्यक्तीची निरपेक्ष कृती.     वाचक हो, आज खास मायना नाही लिहिलाय. कारण त्या आठवणीने मन भरून येते.      वाचा तर. माझ्या पुनर्जन्माची कहाणी. स्वतःचे जीवन धोक्यात घालून, माझा जीव वाचवण्यार्‍या, त्या अज्ञात जीवाला शतशः प्रणाम.      हा अनुभव मी प्रथमच लिहावयास पाहिजे होता. पण मला कोणी , " किन्नरांची चेष्टा वा  राग केलेला , पहिल्यापासून आवडत नाही. जसे आपण, इतर अपंगांना मानतो, तसेच एक प्रकारे तेही दुदैवी होत. हल्ली भाजप सरकारच्या कृपेने या सर्वांंना ,     " दिव्यांग" म्हणतात. अन् आज आपण सर्व, रवि. जाधव दिग्दर्शित व, " सुश्मिता सेन" ने, आपल्या अद्वितिय अभिनयाने, सर्वांपुढे आणलेली , गौरी सावंतच्या जीवनावरील " टाली" ही मालिका पाहीली असेलच.             तर झाले असे,         आम्ही माहिमवरून मालाडला शिप्ट झालो, तेव्हा मला ट्रेनचा प्रवास जमेना. एकदा भयंकर प्रसंग ओढवला. गाडीत चढताना, गर्दीत, धक्काबुक्कीत, मी पडले...

नाव:-नेकी कर दर्या.में डाल। कोणीतरी आपले FOOT PRINTS FOLLOW करतीलच.

 ७.२ . २०२४. नेकी कर और दर्यामें डाल। दिलासा दिलात   अाता विसरा..  माझ्या सुस्वभावी वाचक मित्र मैत्रिणीनो,  मी दोन दिवसापूर्वी "मैत्र" या शब्दावर भाष्य, सरळ शब्दात मत सांगितले होते. तसेच "स्वभाव" ही  कसा समजून घ्यावा, या बाबत, सूचना केल्या होत्या. आता आपण करीत असलेल्या,  चांगल्या कर्माबाबत विचार करू. काल मी जी घटना सांगितली. त्या बाबत, एक अनाहूत सूचना, जी मला मिळाली , " अहो, तुम्ही इतकी फोनाफोनी केलीत, जर समोरच्यांनी, दुर्लक्ष केले असते तर, किंवा तुम्हाला काय करायचेय? असा सवाल पुढे आला असता, तरऽ ऽ ऽ     त्या पालकांना,तुम्ही केलेला,  ""  उद्योग"" कळला तरी का? काय म्हणायचे - ह्या कर्माला. प्रत्येक वेळी काही छोटेसे काम केले तर लगेच CREDIT मिळवायला, आपण काय राजकारणी आहोत का?      आपण अाहोत, एकमेकांसाठी , " समाजकारणी - give & take policy. बस.      आता या बाबतीतील, एक मजेशीर घटना सांगते. ही गंमत घडली, साधारणतः २० वर्षापूर्वी.   मुंबईच्या ट्रेन मधील मरणाची गर्दी, तुम्हा सर्वांनी, अनुभवली असेलच. ती वेळ...

कोणाचे जर सांत्वन फक्त प्रत्यच करता येते,असे नव्हे.दिलसे करू शकतो .त्यांना SOLACE देऊ शकतो.

 6.2.2024.   कोणाचे जर सांत्वन  फक्त प्रत्यक्षच  देता येते,असे नव्हे. दिलसे करू शकतो.       वाचक मंडळी हो, आज मी फक्त हाक दिली आहे साद देणे, तुमच्या हातात आहे. आज माझा लेख खूप छोटासा पण आशयपूर्ण आहे. मी आज जे केले व त्यासाठी ज्यांनी साथ दिली ,त्यांचे शतशः आभार. रविवारी आमच्या सोसायटीतील, एक मुलगा, बाईक अपघातात गेला. सर्व सांत्वनासाठी गेले.मी बाहेर गावी असल्याने जाऊ शकले नाही. पण आमच्या समोरच एक शंकराचे मंदिर आहे. तेथे दोन दिवस, लग्नाचे वरवधू येत आहेत. पण कसे बँड ताशे ढोल गाणी डिजे वाजवत येतात. मुळात देवदर्शन घेणे, सात्विक असावे. असो. पण आज मला जाणवले, त्या मुलाच्या पालकांसाठी, निदान ४.५ दिवस येथे शांतता असावी. म्हणून सेक्रेटरी व इतरांना सुचविले.त्यांनी लगेच मंदिरात विनंती केली. त्य‍ांनी लगेच अमलात आणली. हीच त्या १६.१७ वर्षाच्या मुलाला, आमच्या सर्वांकडून मूक श्रध्दांजली.  तुम्ही पण असे करू शकता. समोरची मंडळी , " ऐकणारच नाहीत,कशाला सांगायला जा, असा पूर्व ग्रह न ठेवता, पुढे व्हा.   तसेच नोव्हे.२००८ मध्ये , जे बॉम्बस्फोटाचे कांड झाले, त...

अापणच स्वतःशी मैत्र साधावे, हेच खरे. पण त्या साठी, स्वः चा भाव जाणावा.

 ५.२ .२०२४ .आपणच स्वतःशी मैत्र साधावे, हेच खरे. पण त्यासाठी, स्वःभाव जाणावा.       मत्प्रिय वाचक मंडळींना, माझे अभिवादन. खरे तर, माझे वाचक, नक्कीच माझ्यापेक्षा वयाने लहान असणार. एखादाच ७३+ असेल. पण काल आपण पाहिले, कित्येकदा आपणच , आपल्या वित्त संपत्तीचे वैरी होतो. पण हेच आज मी विशद- तपशिलासह लिहिणार आहे. यात पहिली गोष्ट करावयाची, ती म्हणजे स्वतःची ओळख. काय म्हणता? ह्यँ! कोणाला,  आपल्याबद्दल, माहीती नसणार का? हो, हे सत्य आहे. आता  बघा, आपलेच शरीर.पण त्यात काय Fault आहे, ते आपल्याला डॉक्टरांकडू समजून घ्यावयास, भाग पडते. आपल्या ला जेव्हा एखाद्या कठीण व बिकट प्रसंगाला तोंड द्यावे लागले, तर बहुतेक मंडळी गोंधळतात. इथे उच्च शिक्षण आर्थिक सुबत्ता कामी येत नाही, तर डोकेबाजपणा व चलाखी कामी येते. बघाच. मी माझ्या जीवनातील प्रसंग सांगते.       तसे तर "हे" मी २सप्टेंबर  २३ला, वेगळ्या संदर्भात लिहिले होते.         पण आता, परिस्थिती व अनुभव माणसाला, कशी  सहज तोंड द्यावयास शिकवते,  बघा.        एकदा काय झा...

शिक्षण संपले, नोकरीशोध. लगेच लगीन. हे ही पाकांचे कर्तव्य नं? hmm. नंतर संसाराची अगीन गाडी.

 १.२ .२०२४. शिक्षण संपले, नोकरी शोध.  लगेच लगीन. हे ही पालकांचे कर्तव्य नं? hmm. नंतर संसाराची अगीन गाडी.     मत्प्रिय पालक वर्ग हो, काल ब्लॉग लिहिला नाही, का असे वाटते बरे? लिखाणास सुरूवात केली अन् खालून दणादण डिजे व नवरदेव घोड्यावरून जाताना दिसले.  अरे लग्न करा नं, पण इतरांना  आवाजाचा त्रास कशाला?  लग्न म्हणजे काही शौर्य नाही कि, त्याचा दिखावा करून public ला दुखवा~~!   मुलाला नोकरी लागता लागताच लग्नाची घाई का करता हो? त्याच्या कमाईतून, जरा जमाई होऊन द्या नं! मुलींच्या पालकांची, आजकाल, वरपांगी हुंड्यातून सुटका झाली असली तरी एका दिवसासाठी मेंदी मेक-अप हेअर स्टाईल अन् शालूच्या वरताण ड्रेसेस दागिने( जे नंतर कधी वापरले जात नाहीत) हा खर्च - मुलीची हौस म्हणून आईवडिलांवर - मुलीच टाकतात. हा विचित्र हुंड्याचा प्रकार, कायदा काय डोके फोडणार या पुढे! विचार करा. पुर्वी एखाद्या वरपक्षाने, मुलाचा शिक्षणाचा खर्च, हुंडा रूपाने वसूल करावयाचा ठरवला, तर तो खलनायक ठरत असे. पण आजकाल हा खलनायकाचा ( याचे स्त्रीलिंग-  वादातीत ठरेल) role  मुले व मुलीच निभाव...