Posts

Showing posts from October, 2023

सायबर गुन्हगारांच्या विविध गुन्हेपध्दती

  प्रिय  वाचक मंडळी, आपण सावध रहावे, या साठी अनेक रित्या, मी सायबर गुन्हेगारांच्या नवनवीन कृप्त्या, तुमच्या समोर आणत आहे. ते सर्व बुध्दीमान आहेत. त्यांच्या प्रज्ञेला वेळीच मार्ग व योग्य यश न मिळाल्याने, ते वाकड्या मार्गाला, लिलया, आपलेसे करीत आहेत. अाजच्या technology ची समग्र माहीती करून घेऊन, त्यायोगे, स्वतःला intelligent समजणार्‍या, so called , बहुदा, जेष्ट व श्रेष्ट(?) नागरिकांना , " उल्लू" बनवत आहेत. शुक्र २७ ऑक्टो च्या महा. टाईम्स मधील ही बातमी बघा. आजकाल एक fad झालेय. , आम्ही काही पेपर घेत नाही. काय करायच्यात बातम्या.  पण जरा दुनियेची जाणिव होते.  असो.        " वृध्द दाम्पत्याची चार कोटीची फसवणूक."      थोडक्यात घडले असे कि, दक्षिण मुंबईतील, एका महिलेला, अनोळखी व्यक्तीने फोन केला व  मी पीएफ कार्यालयातून बोलतोय, सांगितले, खात्री न करताच, त्याच्या सुचना follow केल्या गेल्या.  तो म्हणे, तुमच्या पतीच्या, पूर्वीच्या मालकाने, PF a/c मध्ये चार लाख गुंतवले, असून २० वर्षाने, त्याचे १२ कोटी मिळणार आहेत.    पण त्याने ...

नाव:-ठगाशी असावे ठग. कोण फसवील मग.

 ठगाशी असावे ठग. कोण फसवील मग.         My dear followers,  we should understand the systems and technical modus operandies of culprits and be alert to save our properties.  हां, तर मी काल मी लिहिल्याप्रमाणे, काही  सावधगिरीच्या कल्पना सांगणार आहे.          १. जेव्हा तुम्ही बँकेत मोठ्ठी रक्कम काढायला किंवा लॉकरमधून दागिने काढायला जाल, तेव्हा बरोबर कोणालातरी ठेवा. पुरूषांनी कधीही ब्रिफकेस वापरू नये. वा महिलांनी पर्स घेऊ नये. तर गळ्यात खांद्यावरून दप्तर सारखी साधी बॅग वा शबनम न्यावी.ती साईडला न ठेवता समोर ठेवावी व त्यावर हात ठेवावा.          २. सोनाराकडे खरेदी केल्यावर लगेच बाहेर न पडता, आत येण्याची परवानगी मागून, ते दागिने, एखाद्या टिफिन बॉक्स मध्ये ठेवावे. दसरा दिवाळीच शुभ मुहुर्त न मानता एरवीच्या दिवशी खरेदी करावी. अहो, ही सुध्दा एक अंधश्रध्दाच आहे.           ३. शक्यतो आजच्या सोयीचा फायदा घेऊन on line payment करावे. म्हणजे जाताना risk राहणार नाही.      ...

चोरावर मोर. आपले मानसिक व सामाजिक स्वास्थ.

 २७.१० .२०२३. आपले मानसिक व सामाजिक स्वास्थ.  चोरावर मोर आपण ही होऊ शकतो       माझ्या प्रियतम सजग वाचक हो, कालच्या घटनेचा विचार केलात का? जरा कल्पना करा, आपण त्या जागी आहोत, तो प्रसंग आमने सामने बघत आहोत. समजा समोर दुकानात आहात. एक कार येऊन उभी राहते, तिच्यातून कोणी उतरायच्या आधी, समोर पैसे विखरून पडलेय. तर ते त्या चालकाचे असूच शकतील का?  म्हणजे त्या क्षणाला त्या कोणा तरूणाने, एका हाताने  पैसे खाली सोडले असतील व दुसर्‍या हाताने, " टकटक"  केले असेल. नेमकी  एखाद्या गाडीची चालकाची सिट कोठे येईल, आधी कळणे, शक्य नाही. म्हणजे ती कार थांबल्यावरच, हे केलेय. मग तीच कार का? त्यात मागच्या सीटवर जोखीमभरी बॅग आहे. हे , " रेकी" करूनच target ठरवले असेल नं? घरातच एक व्यक्तीने वाकून ओणवे व्हावे, दुसर्‍याने त्याच्यावरून टेबलावरील वस्तू उचलावी. 😆😬. मग ते टोळीचे लोक इतके चालाख व  quick active असावेत. पण आजवर कोणी तरी अशा प्रसंगी,"  हँ, माझे पैसे नाहीत, म्हणालेच असतील. अशांनी कृपया पुढे यावे व आपला प्रामाणिकपणा जाहीर करावा! कि सरसकट ह्यांची तमाम,...

१० लाखाची बॅग घेऊन चोर टोळी पसार.

 २६.१० .२०२३ . १० लाखाची बॅग घेऊन चोर टोळी पसार.    प्रिय हुशार व चलाख  वाचक हो,  आज मी तुम्हाला एक कोडे घालणार आहे. खरे तर मीच गोंधळात पडलेय. हे कसे शक्य आहे. जरा डोके चालवा व आज, मलाच  योग्य सल्ला द्या. आधी एक बातमी सांगते. सध्या, अशा  अनेक घटना घडल्यात, म्हणे. त्यामुळे, मुंबईत, टकटक टोळ्या सक्रिय झाल्यात असे ऐकतेय. मी घरातच असते. पण जे अाजकाल, कारने आपल्या सोबत मोठी रक्कम किंवा सोन्याचे दागिने घेऊन जातात, ते ही ह्या अशा बातम्या ऐकत वा वाचत असतील ना? तेव्हा मला कळत नाही, ही मंडळी, अशी , " जोखीमवाली बॅग",  मागच्या सीटवर, हाती लागेल, अशा  प्रकारे ठेवतातच का? ती रक्कम / दागिने, एखाद्या गळ्यातील बॅगेत ठेवून, स्वतःच्या खांद्यावर, का ठेवत नाहीत. अगदी शबनम पिशवी असली, तरी सुरक्षित राहील. असो. आता बातमी वाचा:-        एका हॉटेल व्यावसायिकाची बँकेत जमा करायची,   रू.१० लाखाची रक्कम , चालकासहीत एकजण  ( दोघे)   बँकेत निघाले. रक्कम ठेवलेली बॅग, मागील सीटवर ठेवली होती.🙄.वाटेत एका मॅकनिकला बोलावले व गॅरेज मध्ये जाण्यास न...

पुनश्चः सायबर गुन्यह्याकडे वळू. SUPPLY WHERE THERE IS DEMAND.

 २५.१० .२०२३ . पुनश्च: सायबर गुन्ह्याकडे वळू या. supply where demand is.       माझ्या जागृत वाचक हो, काल आपण जरा, एक नवीन अध्याय सुरू करावा, हा सुतोवाच मी केला होता. बहुतेक सर्वांना पटला असेल, पण, "नको बाबा उगीच" ही कल्पना पुढे पाऊल टाकायला, देत नसेल नं. ओके, पण अशा तर्‍हेने किती तरी अपराध व चुकीचा रस्ता, यावर अटकाव होऊ शकतो. असो. आता एक गंमत. म्हटले तर जबरदस्त फसवणूक. अगदी ३० लाखाची. तीही पुण्यनगरीतील एका वृध्दाची. बिचारा! मात्र असे म्हणू नका हं. एक खास बाब म्हणजे, SUPPLY WHERE THERE IS DEMAND         ही असली मागणी, कोणी सभ्य गृहस्थ करू शकणारच नाही. ही बाबच एक अपराधानेच अंगावर घेतली गेली आहे. ज्या वयात नातंवडांत रमायचे, जर  घरात नांतवडे नसतील, तर आजूबाजूच्या गरजू मुलांचे आजोबा व्हायचे, सोडून असली थेरे करणारा वृध्द अगतिक वगैरे असूच शकत नाही.  आता पुढे वाचा सत्य  घटना.😬.        बातमी:- पीडित वृध्द जुलै महिन्यात कोणाएका ज्योतीच्या मध्यस्थीने, एका कॉलगर्लला भेटला होता. त्यानंतर, त्याला ज्योतीचा फोन आला. प...

दसरा- सिमोल्लंघनाचा दिवस. विजय दिन.

 २४. १० .२०२३ .  दसरा - सिमोल्लंघनाचा दिवस.        माझ्या प्रिय वाचक हो, मी तर एका अर्थाने सीमोल्लंघन केलेच आहे. म्हणून तर या ब्लॉगद्वारे आपल्यापर्यंत येत आहे. चला,तुम्हीही खर्‍या अर्थाने सिमोल्लंघन करू शकाल का? मनात आणाल तर, नक्कीच कराल. त्यासाठी कोठेही जावयाची गरज नाही. घरबसल्या करू शकाल. नवल वाटले ना? हीच तर गोम आहे. फक्त तुम्हाला जरा चौकस होणे,आवश्यक आहे. अन् मी व माझा परिवारच ही कल्पना जराशी व्यापक बनवायला पाहिजे, बस. हो, आणि त्याशिवाय थोडे "भोचक" बनावयास पाहिजे. दचकलात नं? घाबरू नका. प्रत्येक वेळी भोचकपणा, म्हणजे, इतरांच्या बाबतीत, " नाक खुपसणे, वाईटच नसते, तर त्यातून सामाजिक कार्य घडत असते. नाकासमोर चालणारे "ते कसे बुवा?"  असे विचारतील. तर ऐका. जर शेजारी काहीतरी विचित्र घडत असेल, तर वेळीच , तिथे इतरांनी लक्ष घातलेच पाहिजे. तिला, तिचा नवरा मारतोय, मला काय करायचेय? एखाद्या मुला/ मुलीला काही कारणाने त्रास दिला जातोय, असे लक्षात आल्यावर, त्यात वेळीच हस्तक्षेप करणे, चांगले कार्य ठरते. एखादी मुलगी / मुलगा रस्ता भटकत असेल, तर तिच्या पालकांना सावध करणे,...

तिला असे अमर करू या

 २३. १० . २०२३. जिथे उलटी गंगा   वाहते, त्यांचे दुःख,  नेहमीच ," परदुःख शीतलच" असते. भाविका तुझ्यासाठी.      माझ्या वाचक हो, परवाचा लेख वाचलात नं? काय प्रतिक्रिया झाली हो, मनापासून सांगा, ज्यांनी तो वाचला नसेल, त्यांनी आवर्जून वाचावा, ही विनंती.  ते दिल्लीतील गरीब  परिवार , ह्या कायदेशीर कारवाईने किती दुखावले असतील. त्यांच्या मुलांना मारून खाल्ले गेले. ती  २००६ मध्ये १०. १२ असलेली आज १६.१८ वर्षाचे तरूण  असते. आपण म्हणतो, आईचे ह्रदय कितीही व कधी ही आपल्या बाळाला विसरू शकत नाही. भले त्याच्या शिवाय आणखी अपत्ये असली तरी मग त्या मातेच्या जागी   कोणी ही स्वतःला कल्पनेत ही बघू शकणार नाही. आज मी माझी एक मुलगी, भाविका ( हो, विद्यार्थिनी)  गमावली. फक्त १५ वर्षाची होती हो.  छोट्याशा तिला," श्रध्दांजली" असे म्हणणे, नशिबी आले. त्या दिल्लीच्या पालकांचे दुःख समजू शकते.  असे म्हणतात, प्रत्येक बाईच्या ह्रदयात,  एक, "आई"असते अन् ती दुसर्‍या  आईला समजून घेते. पण या माझ्या विश्वासाला आज तडा गेला. परवा लिहिलेल्या ," नि...

जेव्हा कोणालातरी आपली मुले, अन्यायाने गमवावी लागतात. त्यांना आजचा दिवस समर्पित.

 २१ .१० .२०२३. जेव्हा कोणाला तरी आपली मुले, अन्यायाने गमवावी लागतात. त्यांना आजचा दिवस समर्पित.         वाचक हो,  आज मी पूर्ण निराश आहे. म्हटले  दिल्लीची ही घटना. पण दिल्ली तो दूर है। म्हणून चालणार नाही हो.   घटना आहे २००६ मधली. दिल्लीतील नोईडा सेक्टर ३१ मधील निठारी गावची. झाले असे कि, तेथील डी- ५ कोठीच्या मागे वाहण्यार्‍या नालात,  अनेक मानवी सांगाडे दिसून आले, अन् धक्कादायक बाब, म्हणजे ते सर्व लहान मुलांचे होते.  जास्त नाही १७ वर्षापूर्वीची गोष्ट. सर्वांना आठवत असेल.  संपूर्ण देशात रागाची व शरमेची लाटच उसळली. तेव्हा उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे राज्य होते.ब मुलायमसिंग मुख्यमंत्री होते.             तेच्हा दिल्लीत १९ मुले बेपत्ता होती. पण सर्व गरिबांचीच असत. त्यामुळे, no comments .पण हे सांगाडे मिळाल्यावर, तपासाला वेग आला. त्या मुलांचा काय दोष होता, ती गरीब घरातील रस्त्यावर खेळणारी होती. पण या विचित्र अमानुष घटने नंतर  पोलिसांची पथके, गस्त घालू लागली. निष्पन्न निघाले, ते अति भयानक होते....

आपल्या जीवनात असलेल्या सुखांची नव्याने ओळख करा.

 २०. १०.२०२३ . आपल्या जीवनातील असलेल्या सुखांची नव्याने ओळख.  वाचक हो, लगेच , "काय  वेडी आहे ही लेखिका", अशी प्रतिक्रिया देऊ नका हो. आपल्या जीवनात असलेली सुखे आनंद आम्हाला माहित आहे, मग ही परकी बाई काय नव्याने ओळख करून देणार? असे वाटले नं? पण कित्येक बाबी - परक्या नजरेला झटकन लक्षात येतात. आठवतेय, मी दोन दिवसापूर्वी काय म्हटले होते, कित्येकदा क्रॉस करताना, त्या चालकाने  वेळीच ब्रेक दाबल्याने, आपला जीव वाचला असतो, हे वाच्यार्थाने घ्या व विचार करा. अनेक प्रसंग आठवतील, कोणीतरी आपले हित जपले असते. पण हे आनंदाचे व सुखाचे क्षण, अनेकांच्या लक्षात राहतच नाही. मिळालेले समाधान, आपणच अल्पकालिन ठरवतो व दुःखाचे व अपयशाचे  क्षण कवटाळून बसतो. परत परत आठवत बसतो. मग त्याचे रूपांतर, " वेळ आल्यावर बघून घेईन, मध्ये होते. "आपला तो बाळ्या " या उक्ती नुसार माझी ती भावना, अन् दुसर्‍याने, आपल्या वर्तनाच्या बाबतीत,  लक्षात ठेवल्यास, ," फालतू गोष्ट ती, त्याचे काय एवढे मनाला लावून ISSUE  करायचा?"  असे म्हणायचे.    आता जरा काल म्हटल्याने प्रमाणे, नटसम्राट चा योग्य (...

सुखी जीवनातील अडसर आत्मवंचना भाग दुसरा.

 १९.१० .२०२३ . सुखी जीवनातील अडसर -आत्म वंचना भाग २.        सुजाण वाचक वर्ग हो,आज माझाहा लेख छोटासाच असेल, पण दोनदा वाचा व चिंतन करा अन् चिंता मिटवा.  काल मी उल्लेख केला ते कुसुमाग्रजांचे  काव्य वाचा, समजायला सोपे व सुलभ आहे. पण उमजून आचरणात आणण्यास अवघड आहे. पण नामुमकीन नाही. पाचोळा आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा येवो शिंपीत जीवनासी निशा काळोखी दडवु द्या जगासी सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा मूक सारे हे साहतो बिचारा तरूवरची हसतात त्यास पाने हसे मुठभर ते गवतही मजेने वाटसरु वा तुडवीत त्यास जात परि पाचोळा दिसे नित्य शांत आणि अंती दिन एक त्या वनांत येइ धावत चौफेर क्षुब्ध वात दिसे पाचोळा घेरुनी तयाते नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे आणि जागा हो मोकळी तळाशी पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी.    कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर                     आता ह्याचा मतितार्थ पाहू.           ही कथा आहे, एका उजाड माळरानावरच्या...

सुखी जीवनातील मुख्य अडसर - अात्म वंचना.

 १८.१० .२०२३ .सुखी जीवनातील मुख्य अडसर-   अात्म वंचना.           माझ्या सुविचारी वाचक हो,  आज कित्येक वयस्क आपली, स्वतःचीच फसवणूक करताना दिसतात. समर्थरामदासाच्या शब्दात - पथ्य न पाळी, तो एक मुर्ख. पथ्य हे आरोग्याशी संबंधित असते. वैद्य सांगतात, ते न ऐकणारे, स्वतःच्याच स्वास्थाचा नाश ओढवून घेतात. त्यालाच आत्म वंचना म्हणतात. हो, आणखी पथ्य हे सामाजिक स्वरूपाचे ही असते. कसे ते सांगते. १९७० साली प्रथम, "नटसम्राट"  हे नाटक आले. या नाटकातून वि.वा. नां( कुसुमाग्रजांना) नेमका  काय संदेश द्यावयाचा होता, ते तेच जाणे. पण तेव्हापासून तमाम श्रोते, अप्पा बेलवलकर, या नटसम्राटांसाठी, भावूक झाले, ते आजतागायत. पण कोणीही त्या मुलांची ही  "काही" बाजू असेल, हा विचार केलाच नाही.  समजा, आपल्यातील वृध्द पालक, बाहेरून भजी वगैरे आणून कागदातच खाऊ लागले तर  घरातील मुलांची प्रतिक्रिया काय असेल?   तुम्ही त्या मुलांच्या जागी असतात तर~~  तुमची प्रतिक्रिया काय झाली असती? विचार करा बरे!   आता ही एक सत्य घटना सांगते. मी ऑफिसमधून ...

चांगल्या विचाराचा व आचाराचा प्रचार व प्रसार करा हो. त्यासाठीच ज्ञानी विदूरांचा प्रयास होता.

 १७.१० .२०२३.चांगल्या विचाराचा व आचाराचा प्रचार व प्रसार करा हो. त्यासाठीच विदूरांचा प्रयास होता. माझ्या प्रिय व मनःपूर्वक वाचन करणार्‍या सुसज्जन वाचक वर्ग,  ४.५ दिवसापूर्वी , आपला परिचय विदूर नीतिशी करवला,आठवतेय. ह्या त्यांच्या प्रयासात माझा खारूताईचा वाटा. ती नीति पुर्णतः आजच्या राजकर्त्यांना लागू होतेय. जेव्हा कोणा एका राजकर्त्याने, सजग व सुजाण रीतिने राज्यकारभार चालवला नाही, तेव्हा काय घडले, ते आपण सर्वांनी अनुभवलेच आहे. तेच विदूर आपल्या नीतितून सांगत आहेत. पांडूराजाच्या नंतर जेव्हा धृतराष्टांना (अंध असून ही) हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसवले, तेव्हाच अधोगतीचा मार्ग दिसला. स्वतः हे विदूर, दासीपुत्र  होते, तरी राजवंशाचाच अंश होते. ज्ञानी व विचारवंत व बुध्दीवान होते. त्यांचा जन्म ही काही अनैतिक संबंधातून नव्हे, तर नियोग पध्दतीला अनुसरून झाला होता. असो. तर त्यांनी जे लिहिले, ते  आज ही लागू पडले आहे. घडले आहे, हे सत्य आपण पाहिले. योग्य निवड व  घडण ही सुनियोजित राज्य कारभारास आवश्यक बाब आहे, हे पटले ना! तर  आता दुसर्‍या अध्यायातील २७, २८ व २९ हे श्लोक आपण प्रथ...

टेहळणी बुरूज भाग २.आपल्याला मिळत असलेली , "रसद"

 16.10.2023. टेहळणी बुरूज भाग २. आपल्याला मिळणार असलेली, "रसद".         मत्प्रिय वाचक जन हो, तुम्ही सजग व सतर्क आहातच. त्यामुळे ही, "रसद" नेमकी कोठची याबद्दल, सुसंगत तर्क करालच. रसद म्हणजे, पूर्वीच्या काळी अन्नधान्य व शस्त्रपुरवठा हा अर्थ होता. पण आज त्या शब्दाच्या अर्थाचे स्वरूप जास्त व्यापक झाले आहे.  छोट्या छोट्या प्रसंगी सहजगत्या मिळणार मदतीचा हात. तो बहुदा, आपल्या मानलेल्या, लोकांपासून मिळतो. पण ही एक give and take policy आहे. यातच शब्दशः आधी देणे असावे. आपण कोणासाठी," परक्या हं",  किती करतो, त्यावर, " तो" आपल्याला take ची संधी देत असतो. तो म्हणजे वरती बसलाय तो हो ईश्वर. कोणी कधीच इतरांना मदत करणे, मनातही आणत नसतील, पण "गरजेला कोणी येत नाही हो," अशा टाहो फोडत असतील, तर no comment.           आपण, या ब्लॉगमध्ये प्रामुख्याने, फसवणूक कशी होते, त्याची चर्चा केली. पण त्याच बरोबर मला, समजून घेऊन मदतीचा हात देणारे टिसी ही पाहिले.           तसेच नेहमी सतर्क - उघड्या डोळ्याने वावरावे, असे सांगताना,...

टेहळणी बुरुज आजचे व गस्त वर्तमान काळाची

 १४. १०. २०२३ .टेहळणी बुरूज आजचे. गस्त वर्तमान काळातली. सतर्क व सुज्ञ वाचकहो, मी काही इतिहासात शिरत नाहीये तर. आजच्या वर्तमान काळच्याच टेहळणी बुरूजांसंबंधी लिखाण करणार आहे.                     टेहळणी बुरूज.  आपल्या छ.शिवाजी राजेंच्याच हर एक गडावर, दुर्गावर चारी बाजूस " टेहळणी बूरूज" असत. ते सर्वांना माहित आहेतच. आज आपले ही प्रत्येकाचे गड व किल्ले व दुर्ग आहेत. आपण साधी माणसे, पण तरी ही असतात. काय म्हणता, काहीतरीच हं.         पण नीट विचार केल्यास मला काय म्हणायचे आहे' ते झटक्यात लक्षात येईल.         आपले गड किल्ले दुर्ग म्हणजे आपला परिवार आपले घर --त्यासाठी घेतलेले loan आपली मुले त्यांना द्यावयाच्या  सुविधा, सोसायटी. आपली नोकरी ह्याच प्रकारे, आपले संगोपन करणारे आपले पालक, आपले व या सर्वांचे अारोग्य अन् आसमंतातील, धोक्यापासून संरक्षण.  सर्व विश्वभर पसरलेले अापले  पुर्वज---This point is wanton & franetic  म्हणजे प्रचंड व गहन. तेव्हा स्वतंत्रपणे अभ्यासणे, जरू...

आपण भले तर दुनिया भली इति समग्र संत महात्मे.

 13.10.2023.  आपण भले तर दुनिया भली. इति- समग्र संत महात्मे.     मत्प्रिय रसज्ञ व मनस्वी वाचक हो, काल तुम्ही माझ्या सत्य प्रियतेचा नमुना पाहिलात. म्हणतात नं कि, स्वभावाला औषध नाही, तसल्यातलीच गत हो. मी असाच एक प्रसंग ओढवून घेतला,पण देवकृपेने, यावेळीही, एक भला टि.सी. भेटला. वाचा तर ही ह्या हरिश्चंद्राच्या भगिनीची कथा.         आता दुसरा प्रसंग. आम्ही मालाडहून भाईंदर ला शिफ्ट झालो. पण मी चालवत असलेली अंडर प्रिव्हिलेज मुलांची संस्था मालाडला होती. २६ जानेवारीचा दिवस. आधीच्या दिवशी रामलिला प्रचार समितीच्या चाचाजींनी मुलांसाठी खाऊ आणायला ‍१०००रू माझ्याकडे दिले होते. मी अंधेरी लोकलने जाणार होते. भाईंदरला,फर्स्टक्लासच्या डब्यात मी घाईने विचारले, अंधेरी , आतील बाईने हो म्हटले.actually मला विचारायचे होते, अंधेरी लोकल का?अन् त्याबाईंचा समज झाला की, ही गाडी  अंधेरीला जाते का? मी चढले. अन् काय गाडी बोरिवली हून थेट अंधेरी आली. उतरले व परत स्लोने वापस मालाडचे तिकिट काढण्यासाठी, पुलावर चढले, तर समोर टिसी माझ्या चेहर्‍यावरील भाव ओळखून  त्याने मला थांबवले....

विदूर नीतिच्या गंभीर विषयात पुनश्च मनोरंजन. पण म्हटले तर ह्याच विषयाशी संबंधितच.

 प्रिय सुजाण व सज्जन वाचक हो, जेव्हा एखादा अधिकारी वा राजा शिस्तप्रिय असतो. तेव्हाच, त्याने एखाद्या प्रजाननाची वा समोरील व्यक्तीची मजबुरी समजूनच, कायद्याची अंमलबजावणी करणे, योग्य व अावश्यक असते.  प्रत्येक वेळी नियमाचा बडगा दाखवणे, बरोबर नसते.  हा सुखद अनुभव मला आला. तोच मी तुम्हाला सांगणार आहे. तसे पाहिले तर मी अपराध केला, नव्हताच. पण जरा माझा मूर्खपणा नडणार होता. पण सामना झाला, विदूरांच्या भाषेत, आदर्श अधिकार्‍यांशी. त्याची ही कथा वाचा व विचार करा. आपणही कधी आपल्या अधिकाराचा सोटा न उगारता, इन्सानियत दाखवलीय का? म्हटले तर मुर्खपणा, नाहीतर सत्यवादीपणाचा कळस. तुम्हीच वाचून ठरवा. दोन्ही अनुभव रेल्वेतील टिसीसंबंधी आहेत. तर एकदा काय झाले, सकाळी ऑफिस मध्ये जाताना, घाईत पर्स बदलण्याच्या नादात, मी रेल्वेचा पास घरीच विसरले.  चर्चगेटला प्लॅटफार्म २ व  ३ च्यामध्ये गाडी थांबली, आम्हाला ऑफिसाठी, सबवेतून जावे लागते. मी  जाताना, समोर टिसी दत्त म्हणून उभा ठाकला. अन् मला आठवले, पास आधीच्याच पर्समध्ये राहिलाय. मग शोधण्याच्या भानगडीत न पडता, मी सरळ टिसी ला सांगितले, माझा पास ...

विदूर नीति जी आजही लागू होतेय.

 ११ .१० .२०२३ .विदूर नीति- आज ही लागू. आज एकदम आपण महाभारताच्या काळ अभ्यासणार आहोत. हो. पण तुम्हाला bore नाही करणार बरे का? उलट Its really interesting हं.  पण तरीसुध्दा आजच्या परिस्थितीशी संबंधीत मुद्दांना अनुसरूनच लिखाण. बहुजनांना विदूर माहित असायलाच हवेत. पण ALAS! असे अनेकजण असतील कि, विदूर कोण विचारतील. किवा कदाचित , " ते" कोणाचे कोण माहित असेल, पण त्यांची महती जाणत नसतील. म्हणून थोडी  introduction.😉😊.  कौरव पांडव  ओळखीचे असतीलच ना?  त्यांचे हे काका. धृतराष्ट व पांडूचे कनिष्ट बंधु.  पण जेष्ट व श्रेष्ट असे तत्ववेत्ता. दुदैवाने राजकारणाला बळी पडलेले "दासीपुत्र" या नावानेच त्या काळात ज्ञात झालेले प्रज्ञावान व  द्वेष्टे. त्यांचे लिखाण संस्कृत मध्ये आहे, हे मान्य, पण भाषांतर करून सुलभ करण्याचा माझा हा प्रयास , आपण याचे प्रयत्नात रूपांतर करावा व करणारच, अशी मनिषा बाळगते. वाचा मग--- तसेच उद्या यावर आधारित गुन्हांपासून स्वतः ला वाचण्यासाठी, त्यांचे मानस शास्त्र समजून घेऊ या. विदूरनीतिच्या आधारे. आज आपण विदूरनीतिच्या पहिल्या अध्यायाचा विचार करणार आहोत...

काम छोटेसे, पण आशयाने मोठे व खरेच समोरच्यांची गरज भागणारे.

 सुस्वागतम्, रसिक वाचक हो, आज मी तुम्हाला जे लिखाण करणार आहे. ते म्हटले तर मजेशीर आहे, पण   जेव्हा आपण ,काही सामाजिक कार्य करण्याचे ठरवू, तेव्हा ते आपल्या कल्पनेनुसार न करावे, तर त्या व्यक्तीच्या गरजेनुसारच करणे, आवश्यक व योग्य आहे, पटते ना?             हा,आज मी एक गंमतीशीर अनुभव सांगणार आहे. मी मानस शास्राची पदवीधर आहे व नंतर मी चाईल्ड वेल्फेअरचा कोर्स केला.  आम्हाला प्रक्टिकलमध्ये,  अनाथाश्रम व रिमांड होम मध्ये जावे लागे. तेथे मुलांचे खेळ घेणे, गोष्टी-गाणी सांगावयाच्या असत. एका वेळी ४ जणी जात असू. एकदा सायनच्या चिल्डन होममध्ये, मी जरा उशीरा पोहोचले.             सर्व मुले, इतर दिदींच्या सोबत खेळत होती. मी काय करू, विचार करताना, समोर एका हॉलमध्ये अगदी छोटी मुले( वय ६महिने ते ३वर्षे) होती. मी सहज त्यातील एकाला कडेवर घेऊन फिरवले. तो खुशीने हसून टाळ्या वाजवू लागला. त्याला ठेवले व दुसर्‍याला उचलले. तोही मजेत आला. परत फिरले , तर सर्वच १०.‍१२ मुले हात वर करून, माझ्याकडे बघू लागली. मग त्या आयाने, मला विचारून, ...

संविधानातील कलमांमुळे, होणारा अन्याय rather १२वीतील हुशार मुलांवर होणारा जुलुम

 ७.१० .२०२३ . संविधानातील कलमांमुळे, होणारा अन्याय हो, १२वीच्या हुशार मुलांवर होणारा जुलुम.       प्रिय वाचक मंडळी, आठवतोय आपला ‍ १५ सप्टेंबरचा ब्लॉग - मी लिहिले होते, या आरक्षणामुळे, विद्यार्थी मुलांच्यात फाळणी होतेय. आधी जिवश्च कंठश्च दोस्ती असलेले friends यामुळे एकमेकांपासून दुरावतात. कधी हा विचार कोणी केलाय का? कटू सत्य आहे हे. बघा कसे ते.      मी एक सत्य घटना सांगते. साधारणतः १९९२ वा १९९३ ची गोष्ट त्या काळातच १०वी व  १२वीत मेरीट लिस्ट निघत असे.  आमच्या बिल्डिंगमध्ये रहाणार्‍या डॉक्टरांची मुलगी , त्याकाळात १२वीत ९४.३ % मिळवून मेरिटमध्ये आली होती. पण झाले असे,          ओपन कॅटगरीत  ९५% ला   अॅडमिशन  थांबली. पण  रिझर्व मधील  एका मुलाला ६८% लाच प्रवेश मिळाली. वर त्याच्या वडिलांनी, आमच्या डॉक्टरांना डिवचले, " हे काय तुमच्या मुलीला प्रवेश नाय मिळाला? अरारा!" असो अशा वेळेस या तर्‍हेने admission मिळालेल्या दोस्ताचाही  राग केला जाऊ शकतो. व १५ तारखेच्या ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे, त्...

स्वतःची फसवणूक, आपणचकरत असतो. कशी ते बघा.

 ६.१० .२०२३  स्वतःची फसवणूक आपणच करत असतो. कशी ते बघा.        प्रिय सुज्ञ वाचक हो, काल आपण एक गोष्ट पाहिली. बर्‍याच वेळ आपणच आपली फसवणूक करीत असतो. आपल्याला वाटते, आपण अगदी साधे, नाकासमोर चालणारे, बाकीचे आपल्याला फसवण्यास टपलेत.   आपली कमाई, जमाईत रूपांतरित न करता आपणच, सढळ हाताने उधळतो. sorry हा शब्द खटकला नं, पण  काल वाचलेत नं?  आपला जन्म दिन साजरा करण्यासाठी, आपण पार्टी करतो. मग आलेले पाहुणे, रिकाम्या हाताने कसे जावयाचे, म्हणून gift घेऊन येतात. किंवा बुके( फुलांचा गुच्छ आणतात. म्हणजे आपण " बुफे" वर खर्च करतो. व आमंत्रित " बुके" वर खर्च करतात. दोन्ही पार्टींच्या खिशाला  unnecessary  छाट पडते.  का तर आपण कसे sophisticate आहोत, दाखवण्यासाठी. अन् एकाने बोलावले, म्हणून इतर ही झक्कत, पार्टी ठेवतात. ते ही वाढदिवसासाठी म्हणजे, वाढत्या वयात ठिक आहे हो. पण उतरत्या वयात काय, आपण आता bonus life जगत आहोत, त्याचे प्रदर्शन कशाला? कदाचित या वयात मोठी आजारपण येऊ शकतात, त्याची बेगमी करणे, आवश्यक नाही का? तसेच माझ्या तरूण मित्र मैत्रिणीनो...

सुखी राहण्यास, सुरक्षितमता हवी. त्यासाठी शांतता मिळणे, आजमितीस दुरापास्तच- अशक्य.

 ५.१० .२०२३ . सुखी राहण्यास, सुरक्षितता हवी. शांतता मिळणे, आज मितीस दुरापास्तच.        वाचक हो, खरे सांगा, शांतपणे वाचन छान वाटते कि, सतत काहीतरी ऐकणे, तेही मोठ्या आवाजात, हां, डोके उठते ना? आठवतेय, महिन्यापूर्वी, मी  लिहीले होते. आमच्या जवळील देवळातील कल्लोळाविषयी. देवभक्त असून ही त्या मोठ्ठ्या आवाजातील( लाऊडस्पिकर) बेसूर भजन ऐकताना, त्रास होत असे.  ते ही रात्री ११- ११.३० पर्यंत. आता गणेशोत्सवात तर कहरच झालाय. गणपती आणताना ढमटक ढम तेही डिजे ढोल सहीत. बापरे! ते ढोलकी अशी बडवतात कि, जणू कोणावरचा रागच काढताहेत. गंमत म्हणजे, विसर्जन शांततेने करण्याची प्रथा,पण तेही, जणू आनंदोत्सव असल्याप्रमाणे, ढोल बडवत केले जाते,काय बोलायचे??? आज महाराष्ट्र टाईम्समध्ये बातमी आलेय कि हा गोंगाट, शास्त्रिय भाषेत ८४.१ डेसिमलच्या वरती पोहोचलाय. खरे तर गणेशाची स्थापना पूर्वी घरोघरी होत असे. पूजन अर्चन आरती व मंत्रपुष्पांजलि हे श्रध्देने होई.          ब्रिटिशांच्या विरोधात जनजागरणाच्या हेतूने, लोकमान्य टिळकांनी, या सणाला सार्वजनिक स्वरूप दिले. त्यातून स्...

कोणत्याही गोष्टीला अतिरेक केव्हाही वाईटच व खतरनाकही.

 4.10.2023.  कोठच्याही गोष्टीचा अतिरेक, केव्हा ही वाईट व खतरनाकच.           My dear and now near, rather nearest viewers, welcome,सुस्वागतम्. हो आज अचानक इंग्लिश का बरे, प्रश्न पडला असेल न?  बस असेच. खरे तर कोठल्याही गोष्टीचा अतिरेक नसावा. ना अति खावे ना अति लंघन- diet करावा. तसेच भाषेचा अति स्वाभिमान नसावा किंवा मराठी वाचता येत नाही हो. अशी फुशारकी करावी. त्याने काही कोणी, खूप मोठ्ठे sophisticated, ठरत नाही. हां, हे खरे आहे कि, आता मात्र मी विषयांतर केलेय. झाले असे कि या ब्लॉगच्या निमित्ताने, कित्येक मराठी मुलेमुली, मराठी वाचता येत नाही,   हो असे म्हणताना दिसतात. पण इतर भाषिक मात्र कटाक्षाने,आपली मातृभाषा वाचायला, मुलांना भाग पाडतात. अमेरिका ऑस्टेलियात हा माझा ब्लॉग वाचला जातोय. पण~~ असो.  आपण, आपल्या मूळ विषयाकडे वळू या. अति तेथे माती. ही म्हण इथेही लागू पडतेय. बघा कशी ती. कालच मी morning walk बद्दल लिहिले. खरेच सकाळच्या फेरीने माणूस एकदम तंदुरूस्त होत असेल का?  न जाणार्‍या / जाणारे सगळ्या आजार पणात डूबुन जात आहेत का?  अ...

पुनश्चः , " आ बैक मुझे मार means danger is created by us- not come by outside😉😁😂.

 3.10.2023.  पुनश्च, " आ बैल मुझे मार". means danger is created by us - not come by outside.        माझ्या प्रिय व सतर्क वाचक हो,              आज मी तुमच्या सतर्कतेची परिक्षा बघणार आहे. आज मी नवीन न लिहिते  मार्च २०२० रोजी लिहिलेला ब्लॉग परत टाकत आहे. काहीजणांनी तो वाचला असेल.पण हा विषय सदैव लागू पडतोय. पुरातन काळापासून. इतर जगापेक्षा, आपल्या भारत देशात  कनकप्रेमाचा अतिरेक होतोय. पण त्या वेडापायी, आपण आपल्याच सुरक्षिततेला,  चूड लावतो.  पुढील पिढीतील, तरूण वाचक हो, म्हणजेच स्वतःच, स्वतः ला धोक्यात टाकतो. तर वाचा हा तीन- साडे तीन वर्षापूर्वी मी लिहिलेला लेख. सकाळची फेरी. मी हा विषय थोडक्यात, एक महिन्यापूर्वी हाताळला होता. आता जरा स्पष्ट करते. मुळात हा प्रकार सुरू झाला, साधारणपणे  १५ ते २० वर्षात. कसा व नेमका कधी राम जाणे. माफ कर देवा! तुला तरी हे कसे माहित  असणार. पण हे नक्की बहुदा वयस्क पुरूषांनी  सुरूवात केली असावी. घरी बसण्यापेक्षा  ~~. मग ओझोन सक्काळी मिळतो, म्हणून बायका ही निघाल्य...

तनमनधन ही तीन साधनेच आपल्या जिवित कार्याची कार्यक्षमता चालू ठेवतात.

 2.10 2023.       तनमनधन ही तीन साधनेच आपल्या जिवित कार्याची  कार्यक्षमता चालू ठेवतात.        प्रिय सतर्क व सुजाण  वाचक मंडळी, पितृपक्ष सुरू झाला. आपल्या सर्व विश्वातील पितरांना अभिवादन करून, मी माझे ठरवलेले - जिवित कार्य, या ब्लॉग द्वारे करीत आहे. मला प्रोत्साहन देणे,सर्वस्वी तुमच्या हातात आहे. अन् ते तुम्ही करीतच आहात. या शिर्षकातच, माझ्या पुढील लेखनाचा सुतोवाच केला आहे. आपण या तनमनधनाच्या साहाय्यानेच, त्यांचे संरक्षण केले, तर  आनंदी आयुष्य भोगू शकतो.  यात पहिले, " तन" दुसरे " मन" व शेवटी तिसरे   " धन" म्हटलेय. पण मी शेवटून सुरूवात केली. सर्व प्रथम , धनाचा विचार केलाय. आठवतेय नं, कमाई व जमाई, नंतर मनाचा म्हणजे मनःस्वास्थाचा विचार, श्रीरामाच्या दासांच्या म्हणजे आपल्या लेखी समर्थरामदासस्वामींच्या संत वाङमयाच्या अाधारे केला. आता आपल्या सर्वात लाडक्या तनाचा विचार करू या. खाणे पिणे हाच विचार करणारी व त्यासाठीच जगणारी मंडळी जगात जास्त दिसून येतात😁. त्याच्या आरामासाठी चोचल्यांसाठी व मुख्य म्हणजे आरोग्यासाठी तर सर्व धडपडता...

फसवणूकम मग ती कशी व कोठून ही असो. ती अटळ नसते.

 ३०. ९ .२०२३. फसवणूक मग ती कशी व कोठून ही असो. ती अटळ नसते.   माझ्या प्रिय सज्जन व आदर्श वाचक हो.  माझे लिखाण आपण मोठ्या संख्येने वाचत आहात, ही  जागृत सामाजिक जाणिवेचे प्रतिक आहे. त्याच बरोबर स्वतःच्या हितासाठी तरी ACTIVE  होत असाल, ही आशा. त्यासाठी समर्थरामदास स्वामी सतत झटत आले. त्यांचा मानस हेतू सर्वदूर पसरवण्याचा, हा माझा खारीचा प्रयास आहे. तो प्रयत्नात रूपांतर करणे, तुमच्या हातात आहे.     काल मी लिहिले, या त्यांच्या मागणीबाबत लिहायची गरज नाही. पण तरी मी लिहिणार आहे.  ते ही मागणी ,   " प्रथमपुरूषी एकवचनात"  लिहीत आहेत. कारण  हे बोलताना,  भक्तांना आत्मसात करण्यास सोपे जावे. स्वतःच बोलताना, ते मनात जास्त प्रभावाने ठसते.    बघा, ९व्या  कडव्यात ते म्हणतात, " हितकारक ते दे रामा! म्हणजे, जे मला - आम्हाला हिताचे अाहे, ते घडू दे रामा!  माणूस स्वतःचा फायदा बघतो व मागणे पुढे करतो. पण दिर्घकालात, जी योग्य आहे, कोणाचे नुकसान न करता घडेल तेच होवो.      अश्वारोहण दे रामा!  यात जे मागितलेय ते स...