Posts

Showing posts from September, 2023

आपल्याला पुढील पिढीसाठी आदर्श असावे लागेल. सर्वांर्थाने

 २९.९ .२०२३.  आपल्याला पुढील पिढीसाठी आदर्श असावे लागेल. सर्वांर्थाने.   सामाजिक व सायबरच्या बाबतीत.        माझ्या प्रिय आदर्श वाचक हो,  आपण तसे तर, आपल्यापरीने आदर्श असतो. पण त्यांच्या दृष्टीने विचार करून, त्यांच्या नजरियात आदर्श होण्याचा प्रयास करावा, हे उत्तम लक्षण. ते आता मी न लिहिता, समर्थरामदास स्वामी जे , श्रीरामाकडे मागणे, मागतात, तेच लिहिणार आहे. हे लिखाण इतके सोपे आहे कि,  मला समजून सांगण्याची गरज नाही. कारण आपण सुज्ञ व सुजाण आहात.              "उत्तम गुण मज दे रामा"        पावन भिक्षा दे रामा। दीनदयाळा दे रामा॥१॥        अभेदभक्ती दे रामा । अश्वारोहण दे रामा॥२॥        तद्रुपता मज दे रामा। आत्मनिवेदन दे रामा॥३॥      सज्जनसंगति दे रामा। अलिप्तपण मज दे रामा॥४॥      ब्रह्मानुभव मज दे रामा। अनन्य सेवा दे रामा॥५॥      कोमल वाचा दे रामा। विमल करणी दे रामा॥६॥      प्रसंगवोळखी दे रामा...

२७.९ .२०२३ . अज जरा भावी पूर्वजांना संदेश.

   सुस्वागतम्, वाचकमंडळी, आज मी तुम्हाला फक्त हाक दिली. काही मानाचा मायना लिहिला नाही. खरे तर आजचे शिर्षक पाहून, तुम्ही नाराज झाला असाल. पण त्यात काही अगम्य नाही. आपण विमा उतरवतो. nomination लिहितो. ते मान्य आहे ना? तेव्हा , " हे काय अशुभ असे म्हणतो का? नाही ना? मग तसेच हे.            समर्थरामदास स्वामींनी म्हटलेच आहे,             मरे एक त्याचा दुजा शोक वाहे,             अकस्मात तो ही पुढे जात आहे।        हे मनाचे श्लोक आपल्यासाठी ( मी वय ७२) आहेत. ते जेव्हा आपल्या पिढीपासून, शाळकरी मुले बोलतात. तेव्हा कोणाला खटकले नाही . खरे तर "दासबोध" त्यांच्यासाठी आहे. तसेच ही , कुसुमाग्रजांची कविता, आपल्यासाठी आहे. ती १०वीच्या मुलांना शिकवणे, अयोग्यच असो. पण या माझ्या , " क्लास" मधून अात्मसात करा.         समर्थांनी मनाच्या श्लोकांत, जेष्ठ नागरिकांना उपदेश केला आहे, तोच कुसुमाग्रजांनी' रूपकात्मक व मनोरंजनात्मक रित्या, त्यांच्या,         "पाचो...

आज परत पितृपक्ष म्हणजे महालयवर आचार्य शंकराचार्यांचे भाष्य.

 २६.९ .२०२३ . आज परत पितृपक्ष म्हणजे महालय विषयी भाष्य.         माझ्या प्रिय बुध्दिमत्ता वरिष्टम् अशा सुजाण वाचक हो,   मी परत हाच विषय घेतलाय , कारण आज मी माझे मत सांगणार नाही. तर श्रेष्ट हिंदु आचार्य शंकराचार्यांचा, शिष्य- साधक महापेरियर- यांच्याशी झालेला संवाद सांगणार आहे. मूळ संस्कृत मध्ये आहे.           साधक महापेरियर, आचार्यांना  ( अगदी आपल्या सर्वांच्या मनातील प्रश्न) विचारतात ," आचार्य गुरूवर्य, महालयात,पितृपक्षात, आपण कावऴ्याला जेवण ठेवतो ते का?आपले पूर्वज काय , या नीच घाणेरड्या व काळ्या कुळकुळीत पक्ष्याच्या रूपात येतात? ते मग एखाद्या उच्च समजल्या जाणार्‍या छान पक्ष्याच्याच स्वरूपात का येत नाहीत?           तेव्हा आचार्य शंकराचार्य मंदस्मित करीत म्हणतात, " आपण कावऴ्याला, तामिळमध्ये कऽ कऽ म्हणतो. संस्कृतातही काक म्हणतो. ते त्याच्या  ओरडण्याच्या सूरावरून. इतर कोणाही प्राणी पक्ष्याला असे त्याच्या बोलावरून नाव नाही. संस्कृत भाषा एकाक्षरी मूळ शब्दात आहे. "का" पथ चा अर्थ "माझे रक्षण...

-आपण सावध तर अवधान जागेवर.सणवार करान सजग ही रहा.

 २३.९ .२०२३ . आपण सावध तर अवधान जागेवर.  सण करा व सजग ही रहा.    ॐ गणेशाय नमः। सुस्वागतम् , रसिक व सुज्ञ वाचक हो, या, वाचा अन्  आणखीन् सुजाण बना. मी माझ्याकडून थोडे फार ज्ञान आपल्याला देऊ शकतेय. हे माझे भाग्य आहे. खरे तर, ही माझ्या पुर्वजांची देन आहे. especially , माझ्या आजीची ( सर्व तिला काकी म्हणत)       मी सदैव तिची शेपूट असे. तिचा पदर धरून देवळात जाई. त्याचा मला फायदा झाला. तेथील किर्तन व प्रवचन कानावर पडे. पण गंमत म्हणजे, ते सर्व आजही ७३व्या वर्षी ( माझ्या लक्षात राहिलेले) पण खरे तर शालेय व कॉलेज जीवनात, मी यथातथाच होते. तेव्हा ही स्मरण शक्ती??? 😉😊. असो. हीच ठेव या  electronic माध्यमातून, तुमच्याकडे pass on करतेय.       हं, तर आपण आपल्या सायबर दक्षतेकडे वळू या.  जरा परत मूळ विचारात लक्ष घालू. जर एखादे भांडे रिकामे असेल, तर त्यात काहीही भरून जाते. तसेच आपल्या मनाचे आहे. आपण रस्त्याने जाताना,  विचाराच्या नादात चालत असलो, तर अचानक पुढे आलेले, वाहन, धडक देते. आजकाल फुटपाथवर ही काही खरे नाही. तेथे ही दुचाक...

आपले पितर- कुळातीलच नव्हे, तर शास्त्रज्ञ- साहित्यिक- इतिहास घडवणारे- एकूणच.

 २२.९ .२०२३ आपले पितर - कुळातीलच नव्हे, तर शास्त्रज्ञ -  साहित्यिक - इतिहास घडवणारे -  एकूणच.  प्रिय वाचक हो, सुस्वागतम्. आज मला कळत नाही कि, मी माझ्या लेखनशैलीचा अभिमान करू कि, आपल्या उत्साही वाचनाचे कौतुक करू. आज गणेशोत्सव असून ही आपण माझ्या ब्लॉगला मोठ्या संख्येने भेट दिलीत. किती आनंद झालाय, कसे सांगू? खरे तर मी जे लिहीत आहे, ते जरा गंभीर असून ही , तुम्ही आस्थेने, यात भाग घेतात, हा तुमचा चोखंदळपणा आहे.   हां, ते मी काल म्हटल्या प्रमाणे, " ॐ" बद्दल सांगणार आहे.  ही आपल्या हजारो वर्षापूर्वीच्या, पूर्वजांनी, ऋषी. मुनींनी दिलेली, ठेव आहे. ती आपणाला जशी पिढ्यान् पिढ्यापासून मिळाली आहे, ती आपल्याला पुढच्या पिढीकडे सुपुर्द करावयाची आहे. आधीच्या पिढ्यांना हे सोपे गेलेय. कारण तेव्हा इतर आकर्षणे व प्रलोभने नव्हती.  मी ७३ वर्षाची आहे. तेव्हा सर्व आज्ञाधारक  असत.   " का" व " कशाला" हे सवाल मुलांच्या मनात ही नसायचे. खरे ना? पण आज चौकसपणा वाढलाय. खरे तर तोच स्थायीभाव झालाय.  "आमच्या पिढीत," हा  शब्दप्रयोग सदैव चालत आलाय. पण ह्याला या...

गणेशोत्सव चालू अाहे. पितृपक्ष येत आहे.त्याबद्दल थोडे पण आशयाने मोठ्ठे.

 २१.९ .२०२३. गणपती होत आहेत. पितृपक्ष येत आहेत. त्याबद्दल थोडे पण आशयाने मोठ्ठे.         प्रिय सुजाण व सक्षम वाचक हो, आपण सर्वजण  सणवार- प्रिय आहोत. पुर्वीच्या काळापासून एकप्रकारे एकत्रित येण्यासाठी, हे सण सामजिक रित्या रूढ झाले. धर्म आपल्याला एकजीव राखतो. आम्ही एक आहोत, ही मनोधारणा निर्माण होते. हां, गणपती पूर्वी फक्त घरोघरी आणत असत. पण एका कुळाच्या सर्वजणांना, त्यातुून एकीची भावना शिकवली जात असे. लोकमान्य टिळकांनी यातूनच समाजाला एकत्रित केले. हां, तर पुढचा विचार करू या. काल रस्त्यात येताना, एका पौढ महिलेला बोलॡताना ऐकले, गणपतीची गडबड झाली कि, पौर्णिमेलाच खरेदी उरकली पाहिजे. नंतर पितृपक्षात काही करता येणार नाही. काय बोलायचे? पितृपक्ष म्हणजे नकारात्मक दिवस अशी अंधश्रध्दा का निर्माण केली गेली व केव्हापासून. खरे तर वेद- पुराणात , या पंधरवड्याला निषिध्द मानले वा सांगितले नाही. खरे तर, "हे"  दिवस आपल्या पूर्वजांचा आशिर्वाद मिळवण्याचे आहेत. आपण त्यांना तृप्त करतो. त्यांची शांती नाय करत. आपली त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपण ताट ठेवतो. कधी लक्...

गणेश आपलीचिंता क्लेश दूर करतो. त्याला क्लेश देऊ नका.🙏

Image
 19.9.2023 आज गणेशचतुर्थी.          रसिक व सुजाण वाचक हो, आज आपण सर्व गणपती बाप्पाच्या आगमनाच्या सोहळ्यात मग्न आहोत. म्हणून मी जास्त वेळ न घेता , फक्त सर्वांना वाचनाऐवजी, ऐकवणार आहे. हो, ते दोन्ही अर्थी. श्रवण व चिंतन ही. हा चिंतामणि आपली चिंता दूर करून, सुख कर्ता व दुःखहर्ता होवो, हीच मनिषा. पण त्यासाठी एक पथ्य पाळणे, आवश्यक आहे. ऐका तर-+ हे सर्व श्रवण व मनन करा व आसपासच्या परिसरात, त्याप्रमाणेच गणेशोत्सव होत आहे ना? ही जबाबदारी उचला. त्यासाठी शेजारपाजारी हा आजचा ब्लॉग, एपिसोड १४ सहीत share करा. Insist them to subscribe  and meet me and read my blogs to be aware and regard our हिंदुत्व व आपले सणवार समजून घ्या. अन् गणपती बाप्पा मोरयाच्ता  जयजयकाराबरोबरच लोकमान्य टिळकांचा जयजयकार करा. त्यांच्या तत्वाचा सन्मान करा.  ते म्हणाले, होते. स्वतंत्रता हा माझा हक्क आहे व तो मिळवीनच. प्रारंभी विनंती करू गणपती,                                        ...

सद्य व सत्य धोरणामुळे, विद्यार्थ्यात होणारी फाळणी. हो, जशी स्वातंत्र्यानंतर, आपल्या देशाची झाली.

 १५.९ .२०२३ .  सद्य व सत्य धोरणामुळे, विद्यार्थ्यांच्या होणारी फाळणी.       प्रिय वाचकहो-    तुम्ही सुज्ञ व सुजाण अाहात.   आपल्याला अप्रिय वाटले,  तरी एकदम सत्य तेच मी बोलतेय. मला माहित आहे, आरक्षणा विरूध्द बोलणे वा लिहिणे - म्हणजे ~        पण आज शिक्षण क्षेत्रात सरकारी नोकरीत व अन्य कित्येक ठिकाणी, जवळ जवळ ६८% आरक्षण आहे. अन्य ३२%  फक्त open category ला बाकी आहे. मग हे ९२% च्या वरील मुले- मुलीही - म्हणजे आपल्या देशातील creamy layer परदेशाकडे वळते आहे. म्हणजे आपल्या सरकारने त्यांच्यावर जो खर्च केला असतो, त्याचा फायदा इतर देशांना होतोय. आजच्या सरकारच्या कृपेने,  इस्त्रो सारखे भरघोस यश आपल्याला मिळालेय. पण तेथे तर सर्व  शास्त्रज्ञ आपलेच आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? नासामध्ये आपले भारतिय ६०%  ते ७५% आहेत. तेच आपले creamy layers होय. जे शिकले, इथे, त्यांचे यश - credit  जातेय, अमेरिकेला.  हो, आणखीन् एक- point म्हणजे ज्यांना, reservation अंतर्गत free / minimum fee मध्ये म्हणजे, सरकारी खर्चान...

विद्यार्थी नव्हे, यर परिक्षार्थी तयार होताहेत. त्यांच्यात संघर्ष निर्मिती.

 १४. ९ .२०२३. विद्यार्थी नव्हे, परिक्षार्थी तयार होताहेत.       त्यांच्यात संघर्ष निर्मिती.            माझ्या सुजाण व जागृत वाचक हो,         कालचाच विषय आजही वेगळ्या angel मधून लिहिणार आहे.  या दोनच अभ्यासक्रमाबाबतच  विशद करणार आहे. माझे लेखन, " दिलसे"  वाचत आहात, यास्तव कौतुक करून, पुढचा विचार मांडत आहे.  आपल्या स्वतंत्र  भारत झाल्यापासूनच असलेल्या  राजकिय धोरणा मुळेच, आपण या मुलांच्या दरी निर्माण करीत आहोत. मेहनतीने अभ्यास करून admission घेतलेली मुले व  कमी मार्क मिळवून ही admission मिळाली मुले - साहजिक दोन गट पडणारच. तसेच शहरी जीवन जगलेली मुले व गावोगावातून आलेली मुले ह्यात ही दोन गट पडणारच. कारण जीवनशैली भिन्न. आता मी जे स्पष्ट व सत्यच  लिहिणार आहे, ते वाचून कृपया , " छी, बाबा, काहीतरीच लिहीता, असे म्हणू नका.  आजकालच्या  हॉस्टेल व कॉलेजेस  मधून " toilet" आधुनिक पध्दतीचे असतात. यानि की कमोड system. shower.. एकदम गावा-तालुक्यातून आलेली मुले, त्याच्याशी पटकन...

सायबर गुन्हे व आत्महत्या कारणे व इतरही

 12.9 .2023 . सायबर गुन्हे व आत्महत्या - कारणे- इतर ही, पण हे त्यातील मुख्य कारण.          सुज्ञ व जागृत वाचक हो, प्रथम मी आपली क्षमा मागते. कारण हो, प्रत्येक घटनेमागे, कारणमिमांसा असतेच. तर काय झालेय, काल माझी लिखाणाची भट्टी जमली नाही. मलाच ते जाणवत होते. जर आपण काही तणावाखाली असलो तर regular काम ही बरोबर साधत नाही. मान्य आहे नं? असो. आज मी आपल्याशी महत्वाचे हितगुज करणार आहे. या विषयाशी आपला काय संबंध, असे मानू नका.  भाकरी का करपली, ही समस्या सर्वांना परिचित आहेच.  आज मी एका मान्यवर वर्तमानपत्रातील    " मुंबई चौफेर" मधील तीन बातम्यांविषयी सांगणार आहे.  खरे सांगायचे, तर या पेपरमधील बातम्या व लेख, नेहमीच अभ्यासपूर्ण  लिहिलेले असतात. विशेषतः संपादकीय व बिटविन द लाईन्स.       १. तर यातील डॉक्टर माशेलकरांनी, जे म्हटलेय, ते फार महत्वाचे आहे. ते सांगतात," तरूण सुशिक्षित असण्यासह रोजगारक्षम असणे, महत्वाचे होय. जेव्हा मुलेमुली शिकतात, मोठ्या पदव्या पदरी बांधतात- हसू नका. तेव्हा त्यांचे commen sense कमी पडते. व ते , बेरोज...

आजव काल यातील फरक असावा ही अपेक्षा. पण ~

Image
 १०.९ .२०२३. आज व काल. यातील फरक.       दक्ष व जिज्ञासू वाचक हो, आपण हेच विचार करत असाल कि, मूळ विषय सायबर गुन्हे कोठे पोहोचलाय. अहो, कोणत्याही मोठ्ठ्या गुन्ह्यला बालस्वरूप असतेच. तेव्हाच ही विषवल्ली मुळापासून उपटावी नं? त्याचसाठीच पालकांनी स्वतः प्रथम सुसंस्कार करावयास पाहिजेत.  आपल्या मुलांना इतरांविषयी आदर ठेवण्यास व दाखवण्यास, "या"  पहिल्या  शिक्षकांनी शिकवले पाहिजे.          ते रस्त्यावर मारामारी करणारे कथित मवाली , जर वाडीतील, एका वयस्क महिलेला, ( जिला सर्व मान देतात), तिचा आदर ठेऊ शकतात, तर  हे त्या काळातील वळण आहे नं? या उलट अगदी वयस्कांची, नजर, आपल्या  आसपास वावरण्यार्‍या,  महिलांबाबत, घसरू कशी शकते, अथवा गर्दीत , मग ती गर्दी देवदर्शनासाठी का असेना,अं!         आज पुन्हा, मी माझी एक short film  तुमच्या पुढे ठेवणार आहे. ~ ह्या सर्व problems चेंगटपणा  solutions माझ्या ह्या एपिसोडमध्ये मिळेल. अहो, सुज्ञ वाचकहो. तेव्हा हे ऐकून हा एपिसोड pl share to yours dear and near p...

सामाजिक कार्याची चुकीची तर्‍हा.

  ८.९ २०२३ सामाजिक कार्याची चुकीची पध्दत. वाचक हो, तुमच्या वाढत्या संख्येमुळे, माझा हुरूप वाढत आहे. माझे लेखन आपल्याला भावते आहे, पटतेय, म्हणूनच तुम्ही माझ्या भेटीस येत आहात, हेच माझे यश आहे. आजचे शिर्षक वाचून गोंधळात पडू नका. त्याचे असे आहे. सर्व जण कार्य म्हणजे, अन्नदान मानतात. पण असे आहे, समोरच्यांची खरी गरज समजून घ्या व त्याप्रमाणे मदतीचा हात पुढे करा.सामाजिक कार्य हे कसे करायचे, आपल्या मनाने ठरवायचे नाही तर समोरच्यांची गरज व नड बघून करायचे. हो, गरज व नड ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. गरज सर्वांनाच असते, पण नड- म्हणजे ती पुरी करण्यास असमर्थता. अाता मी माझा एक अनुभव सांगणार आहे. मी एका प्रख्यात सामाजिक संस्थेच्या मार्फत, मी डहाणूला, अादिवासी पाड्यात जात असे. नेहमी महिन्याच्या एका रविवारी, ३डॉक्टर,३शिक्षक व आम्ही ३ कार्यकर्ते , आळीपाळीने मुंबईतील वेगवेगळ्या भागातून जात असू. एकदा दिवाळीैला, बस ठरवुून बरेच जण दिवाळीचा फराळ घेऊन गेलो होतो. चिवडा व लाडू. सर्व मुलांना गोळा करून प्रत्येकाला, अशी लाडू व चिवड्याची वेगवेगळी पॅकेट्स दिली. मोठ्याना ही. मुलांना तेथेच खायला सांगितले....

सभ्य मवाली व कथित मवाली सभ्य.

 ९.९ .२०२३ .  सभ्य मवाली व कथित मवाली सभ्य.          वाचक हो, आपण जेव्हा इतरांसाठी काही करतो, तेव्हा आपण ही काही शिकत असतो. आता बघा, या आदिवासींसाठी , आपण खूप काही करत आहोत, या समजातून घडलेली घटना वाचा.  तुम्ही म्हणाल, मूळ विषय सायबर क्राईमवरून हे काय? पण हेच सत्य आहे. मला मुळात अपराध व गुन्हा हे स्पष्ट करायचे आहे. काळ बदलला, वेगऴ्या प्रकारचे गुन्हे वाढले. पण पूर्वीच्या पध्दतीही चालूच आहेत.उलट सभ्यपणा गायब होतोय.          आपण सुशिक्षित व सुसंस्कृत हो ना? काल सांगितलेल्याच  ट्रीपमध्ये घडलेली घटना. सर्व जणांना जमवण्यात आम्ही  कार्यकर्ते व्यस्त होतो. तीन पाड्यावरील लोकांना एकत्र करावयाचे होते. त्यांना मी नीट बसवत होते. तेव्हा या दिवाळीच्या प्रसंगी प्रथमच आलेल्या महिला व पुरूषही, त्यांच्याशी संभाषण करीत होते. आधीच्या काही प्रसंगांमुळे, त्याकडे लक्ष पुरवणे, गरजेचे होते. हे अनुभवाने जाणवले होते. तेव्हाही  काही (सभ्य) व्यक्तींची नजर काही वेगळेच सांगत होती. असो. no comments. पण त्या महिला , आदिवासी बायकांना विचारत ह...

असेल इच्छा तर दिसेल, मार्ग

  ६.९ .२०२३ हिंमत है मर्दा, तो मर्द/ मर्दानी हो खुदा. माझ्या जागरूक व सुसंस्कृत वाचक जनहो, सर्व पिडितांसाठी, मनात “बंधुत्व” जागर करा. मुलांनो व मुलींनो – तरूण तरूणींनो, आपल्या बॉर्डरवरच जवान नाहीत, तर हम भी कुछ कम नही, हे दाखवून द्या. हो, जेष्ठ व श्रेष्ठ नागरिक हो, तुम्ही ही या अशा प्रसंगी सिध्द करून दाखवा कि, still we are young in our heart and in health. एक सांगू हे, पोरींच्या मागे लागणारे , “वीर” मनातून , ” डरपोक” असतात हो. म्हणून तर त्यांना हातात शस्त्र लागते. हे मी , लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, ह्या म्हणीप्रमाणे सांगत नाही. तर आता, माझा एक अनुभवच सांगते. मोठेपणा नाही, पण सत्य घटना आहे. मी एकदा नाशिकहून कळवणला जात होते. बस चुकली म्हणून स्वतंत्र रिक्षा केली मध्यंतरी रस्ता सामसूम, दुपारची रणरणीची वेळ. अचानक माझे लक्ष रस्त्याच्या कडेला गेले, मी हादरले. दोन मुले एका १३.१४ वर्षाच्या मुलीला~ मी रिक्षावाल्याला थांबायला सांगितले. तो तयार नव्हता. पण मी जोर लावला, त्याला म्हटले, तुम्ही पाहिजे, तर जाऊ शकता.मी उतरले व तेथे गेले. एकाची कॉलर पकडली व दुसर्‍याला खडसावले.”काय रे”...

योग्य माहिती व योग्य निर्णय केल्यास फसगत होत नाही.

  २.९ .२०२३. योग्य माहिती व नियोजन केल्यास फसगत होत नाही. काल आपण बघितले, फसवणूक करणारे चारी बाजूला असतात. खरे तर, ज्या बुध्दिवंत लोकांना, वेळेवर योग्य शिक्षण व सुसंस्कार दिले जात नाहीत, त्यांचे डोके असे चालते. रग्गड पैसा मिळवण्यासाठी, ते मग अहिंसात्मक गुन्हे करतात. म्हणून अशा पटरीवरून घसरलेल्या, पिढीला वेळीच सन्मार्ग दाखवण्याचे कार्य करू शकतो, आपण जेष्ठ व श्रेष्ठ नागरिक. महिला मंडळे व संध्याकाळी पार्कात बसून वेळ घालवणारे पुरूष एकत्रित येऊन, लहान, ५ ते १५ वर्षाच्या drop out मुलांना जमवून हे कार्य निश्चित करू शकतील. पण लक्षात कोण घेतो? घरीच बसून मालिकेतील परिवाराची चिंता करण्यापेक्षा, परिसरातील, even educated मुलांची, स्पर्धा खेळ घेऊन काहीजणांचे तरी एकत्रिकरण करू शकतात. त्यानिमित्ताने आपण ही ज्ञानी होऊ शकतो. आपण जर ज्ञानाच्या प्रकाशात राहिलो, तर आपली सावली आपला सदैव साथ देते. पण जर आपणच अज्ञानाच्या अंधारात गेलो, तर तीही आपली साथ सोडते. मी मालाडला एक संस्था चालवत असे. तेथील डोकेबाज महिलांनी, मुलामुलींना engage ठेवण्यासाठी एक कल्पना लढवली होती. आम्ही मी व माझी मैत्रिण पांढरपेशा जीवन ज...

सामाजिक कार्य, घरबसल्या, सोप्या रितीने करा हो.

  ५.९.२०२३ . सामाजिक कार्य, घरबसल्या करा हो. माझ्या सजग व सक्षम वाचक हो, दोन दिवसापूर्वीचा ३ ता.चा लेख वाचला वाचला असालच, तुम्ही. विचार केलात का, त्याप्रमाणे, now be active.म्हणजेच विचाराप्रमाणे आचार करा हो. तरच माझा ब्लॉग लिहीण्याचा हेतु सफल होईल. हो, घर बसल्या, कसे ते सांगते. सोपे आहे. आधी, मी आपली माफी मागते. २.३ दिवस tech कारणाने, लेख येऊ शकला नाही. असो. एक फायदा झाला असावा. कालचाच लेख परत वाचला असेल. जसे मुले अभ्यास करताना धडा परत परत वाचतात. मग डोक्यात, एकदम फिट बसतो. तर पुन्हा माझ्या त्या वर्गात जाऊ या. आम्ही नुकतेच मिशन सुरूवात केले होते. रस्त्यावर आरंभ करून, अचानक, रामलिला प्रचार समितीच्या कृपेने, त्यांच्या भव्य जागेत वर्ग सुरू झाला होता. प्रथम ५.७ मुलांनी सुरू होऊन मुले वाढत होती. एकदा अचानक एक मुलगी उठली व म्हणाली, ” मी रबर घेऊन येते. मी काही बोलायच्या आत पळाली. मी दाराकडे पाहिले, ती तेथून जिना चढून गेली. मी इतरांना विचारले, ही वर कोठे गेली? तर एकीने उत्तर दिले, ” तिची ( आईची) शेटाणी वर राहते नं!” अन् ती नवा कोरा मस्त रबर घेऊन आली. बघा, त्या बाईंनी जरा ही न विचार करता, क...

आत्मसंरक्षणावर बोलू काही. आपला मूळ विषय- सोशल मिडियाचे जाळे.

  १.९ .२०२३ आत्मसंरक्षणावरच बोलू काही. आपला मूळ विषय- सोशल मिडिया. माझ्या प्रिय सजग व सावधान असलेल्या वाचक स्वजन हो, शिर्षकावरून तुमच्या लक्षात आलेच असेल, मी जी ब्लॉगला सुरूवात केली, ती social media तील फसवणूक व फसगत यासाठी. काय, दोन्ही शब्द एकच आहेत, अं हं! दोन्ही एकसारखे दिसले तरी जरा फरक आहे. फसवणूक करणारा, अपराधी असतो व आपणांची होते, ती फसगत. ती ही का होते तर, समर्थ रामदास स्वामींच्या शब्दात, “जो दुसर्‍यावरी विसंबिला, त्याचा कार्यभाग बुडाला.” मला प्रत्येक वेळी त्यांचे संपूर्ण नाव लिहावे लागते, कारण फक्त समर्थ म्हटले कि, आम जनांना दुसरेच आठवतात. असो. मला कोणाच्या श्रध्देविषयी भाष्य करायचे नाही. पण त्यांनी तिनशे वर्षापूर्वी लिहिलेल्या दासबोधातील उपदेश आजच्या ह्या डिजिटल युगात ही FIT बसतो. बघा आता. आजच्या एका मान्यवर पेपरातील – तीन- बातम्या- ह्यात, समोरच्या अनोळखी माणसावर अनाठायी भरोसा ठेवणे, किती मुर्खपणाचे व भयानक ठरले. पहिली बातमी- एका घरात आई वडिल व ५ वर्षाची मुलगी रहात होते. तेथेच त्या माणसाचा एक मित्र त्यांच्या सोबत, त्याच घरात रहात होता. का, god knows. एक दिवस ती मुलगी चॉकल...

आत्मसंरक्षण स्वतःच करा. हाच नियम social media वरही लागू आहे.

  ३१.८ .२०२३. आत्मसंरक्षण स्वतःच करा.हसच मार्ग social media वरही लागू आहे. सुविचारी व सुजाण वाचकहो, या माझ्या BLOG मध्ये. आपले स्वागत आहे, काल आपण रक्षाबंधनाचे महत्व पाहिले. पण असे आहे कि, प्रत्येक वेळी व प्रत्येक जागी, प्रत्येकीचे बंधू physically कसे असू शकतील. अन् आज कालच्या जमान्यात महिला काय घरीच बसून असतात का? तेव्हा प्रत्येकीने, तसेच प्रत्येकाने , हो, संकटे काय फक्त मुलींनाच येतात? मुले ही तितकीच अडचणीत सापडू शकतात. तेव्हा हर एक व्यक्तीने आत्मनिर्भर होणे, गरजेचे आहे. प्रथमतः परिस्थितीची जाणिव नीट असणे, आवश्यक माना. कोठे कसे संकट येऊ शकेल, ह्याचा अंदाज घ्या. बहुधा overconfidence ,हेच संकटाला निमंत्रण असते.आता पुढील लेखन मन लावून वाचा. वरवर पाहता हे विषयांतर वाटेल. पण मी बरोबर track वर आहे. राजस्व म्हणजे राज्याची आय. येणारी funding. करस्वरूपी जमा होणारी संपत्ती. आता राम म्हणजे आपल्या मनात जमा होणारे, सुविचार ( फळ्यावरील वा शालेय जीवनात फक्त, वहीत लिहून रद्दीत गेलेल नव्हे, तर) जीवनात पदोपदी आचरणात आणलेले सुविचार व संस्कार.’रा’जस्व ‘म’नातील. . मूळात मानस शास्त्र हे, या “राम” संकल...

रक्षाबंधन- एक कर्तव्याचे बंधन.👍

Image
  30.8 .2023 रक्षाबंधन. वाचकहो, हो. आजचा आपला हिंदू धर्मातील महत्वाचा सण. हा काही फक्त आनंदी आनंद चोहोकडे , म्हणत ,” नाचगाणी व फटाके फोडण्याचा सण नाही. किंवा कोणातरी देवाने, राक्षसी वृत्तीच्या असूराला मारल्या बद्दल, लौकिकात, साजरा करण्याचा दिन नव्हे, तर कर्तव्याची जाणिव करून देणारा, संकटात असलेल्या किंवा, जेव्हा केव्हा अडचण येईल, तेव्हा, स्वतःच्या बहीणीला , “रक्षण” करीन, असा दिलासा देण्याचा मुहुर्त आहे. संरक्षणाची, मग कशापासून ही, हमी घेण्याचे वचन देण्याचा शुभदिन आहे. माझ्या सुज्ञ व जागृत वाचक हो, 🙏 हात जोडून एक विनंति आहे, आपल्या कार्यक्षेत्रात, तसेच नातलगात, मैत्रीच्या नात्यातच, नव्हे तर , परिसरातही, तसे कोठल्याही प्रसंगी, गरजेनुसार बंधुभाव जागर करा. मग तुम्ही फक्त पुरूषच नव्हे तर महिला ही अनोळखी, संकटात असलेल्यांसाठी रक्षक बना. बस् आज इतकेच आपल्यातील ,” राम” जागृत ठेवा. त्यासाठी माझी एक short film दाखवते, ती पहा. व ” वाईट स्पर्श- हँडस् अप” हो, माझ्या सुजाण वाचकहो, मला आठवतेय, मी नुकतीच ही short film तुम्हाला बघण्यास टाकली होती व तुम्ही ती बघितली असणारच .पण माझी कळकळीची विनंती अ...

चाणक्य नीतिचा व सध्या चालू असलेल्या सायबर गुन्ह्यांचा संबंध.

  २७.८.२०२३. चाणक्य नीतिचा व सध्या चालू असलेल्या सायबर गुन्ह्याचा दाट संबंध. माझ्या चाणाक्ष वाचक हो, विचार कराल व नीट वाचन कराल, तर तुमच्याच हे लक्षात येईल. सायबर गुन्हे, हे गुन्हेगारांच्या स्वार्थीपणामुळेच होत नसतात. तर सामान्यांच्या लालचेच्या व लोभाच्या वर्तनामुळे होतात. नाही पटत. बघा, पुढील प्राण्याला व पक्ष्याला, चाणक्यजी का गुरू मानतात, ते वाचा. मग म्हणाल, अरेच्चा! खरेच की. तर बघा. पुढील गुरू आहेत, कुत्रा व कावळा. हो, अगदी सत्य आहे.त्या आधी, आपण ज्या अप्रिय विषयावर चर्चा करीत होतो, त्याविषयी, थोडे पण योग्य भाष्य. जसे आपण या गाढव व कुत्रा यांच्या उल्लेख, निकामी जनांसाठी करतो. त्याच प्रमाणे, एक मोठ्ठी चूक करतो. त्या तसल्या अत्याचारांना वा बलात्कारांना, पाशवी किंवा पशुतुल्य वर्तन, संबोधतो. पण सत्य हे आहे कि, कोठचाही प्राणी पक्षी अशी जबरदस्ती करत नाहीत. आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. पण बळाचा उपयोग करीत नाहीत. त्यांच्यात नर – पुरूषी -अहंकार नसतोच. तो असतो, माणसांच्यात. तेव्हा , ” ह्या असल्या निर्दयी प्रकाराला, ” मानुषी” च म्हणायला पाहिजे. असो. बहुवाशी अल्पसंतुष्ट: सु निद्रो लघुचे...

आपले हित जपणे,म्हणजेच, आपली फसवणूक होऊ न देणे.

  २९. ८.२०२३ आपके हित जपणे, म्हणजेच, आपली फसवणू होऊ न देणे. माझ्या सजग वाचकहो, हे पटतेय ना, आपली कधी ही फसगत होऊ नये, हीच प्रत्येकाची इच्छा असते. मग आपण जागृत राहणे, आवश्यक आहे. तेच आचार्य चाणक्य आपल्याला पटवत आहेत. आठवतेय, लहानपणी, सर्वांनी आवडीने वाचलेल्या, ” पंचतंत्रातील कथा”. त्या लिहिल्यात, विष्णुशर्मांनी. म्हणजेच मुळचे आचार्य चाणक्य. प्रथमतः ते खूप गरीब होते. तेव्हा तेथील राजा अमरशक्ति यांचे तीन पुत्र खूप आळशी मूर्ख व स्वार्थी होते. त्यांनी जाहिर केले, जो कोणी माझ्या ऐयाशी राजपुत्रांना, लवकरात लवकर सुधारील व राज्यकारभारांत योग्य करील, त्याला मी अर्धे राज्य देईन. तेव्हा एक गरीब ब्राह्मण पुढे आला व म्हणाला, ” हे राजा, मला तुझे राज्य नको.फक्त तुझ्या पुत्रांना, मी योग्य शिक्षण देईन, ज्यायोगे आपल्या राज्याला, योग्य बलशाली व बुध्दीवान राजकर्ते लाभतील. तेच विष्णुशर्मा. म्हणजेच चाणक्य. अन् त्यांनी पंचतंत्र लिहिले. त्यातील एक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. या कथा लहानपणी वाचून विसरण्याच्या नाहीत हो. तर ही आपल्या सर्वांसाठी जन्मभराची पुंजी आहे. वाचाल तर वाचाल व आपल्या भारत वर्षाला लाभ...

विश्वाचे गुरू चाणक्य- विष्णुशर्मा. त्यांचे गुरू कोण माहित करू या.

  २६.८.२०२३. चाणक्य- विश्वाचे गुरू- त्यांचे गुरू कोण ओळखा बरे? तर वाचा. माझ्या प्रिय व सुज्ञ वाचक हो, काल आपण, इस्त्रोचे संस्थापक माननिय श्री. चिटणीस यांची ओळख करून घेतली. आज इस्त्रोने आपल्या भारताची मान उंचावली आहे. तुम्हाला माहित आहे का, नासा मध्येही आपले भारतिय शास्त्रज्ञच जास्त आहेत. आज आपल्या पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्यामुळे, इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी, अशी उंची गाठली आहे, कि हजारो वर्षापूर्वी, जसे विश्वभरातून, लोक येथे नालंदा व तक्षशिलात शिकण्यासाठी धाव घेत, तीच प्रथा पुन्हा सुरू होईल. म्हणून जरा तक्षशिलातील गुरू, चाणक्य ज्यांना , “गुरू” मानत त्यांची ओळख करून घेऊ. . ते संपूर्ण विश्वासाठी गुरूस्वरूप आहेत. त्यांनी -नीतिशास्त्र- राज्यशास्त्र- अर्थशास्त्र- समाजशास्त्र- मानसशास्त्र अशा अनेक विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत. पण ? त्यांनी काही मानवी गुरू केले नव्हते. 😀 तर त्यांचे गुरूस्वरूप होते ते,- प्राणी व पक्षी. नवल वाटले नं? हे सत्य आहे. पहिला गुरू-गर्दभ म्हणजे गाढव. हसू नका. नीट वाचा. मग त्याची महती कळेल. सुश्रान्तोsपि वहेद् भारं शितोष्ण च न पश्यति । सन्तुष्टश्वरते नित्यं त्रीणि श...

आज इस्त्रोच्या यशाबद्दल सर्व भारतियांना अभिमान आहे. त्याचे पहिले संस्थापक.

  प्रा.एकनाथ वसंत चिटणीस हे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या अहमदाबाद येथील अवकाश उपयोजन केंद्राचे, (स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर) माजी संचालक आहेत. कोल्हापूर येथे जन्मलेल्या प्रा.चिटणीस यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. प्रथम रसायनशास्त्र आणि नंतर भौतिकशास्त्र या विषयांत पदवी संपादन केलेल्या प्रा. चिटणीसांनी त्यानंतर रेडिओसंपर्क क्षेत्रातील पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण करून इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली. अहमदाबाद येथे डॉ. विक्रम साराभाईंनी स्थापन केलेल्या भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेत त्यांनी आपल्या संशोधनास प्रारंभ केला. प्रा. चिटणीस हे भारतीय अंतराळ कार्यक्रमात अगदी सुरुवातीपासून सहभागी होते. अग्निबाण प्रक्षेपण केंद्रासाठी केरळमधील थुंबा या जागेची आणि उपग्रह प्रक्षेपण केंद्रासाठी श्रीहरिकोटा या जागेची निवड करण्यामागे मुख्यत्वे प्रा. चिटणीस यांचे परिश्रम कारणीभूत आहेत. भारताच्या अंतराळ क्षेत्रात अत्यंत यशस्वी ठरलेल्या ‘इन्सॅट’ मालिकेतील उपग्रहांच्या आखणीतही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत...

आपण ही गस्त घालू या. गुन्हाची विषवल्ली गाडून टाकू या

  23.8.2923. माझ्या सुज्ञ व विचारवंत वाचक हो, काल आपण हे पाहिले कि, फसगत होते, ती परक्यावर विनाकारण व अतिरेकी विश्वास ठेवल्यामुळे. जर आपण सर्वसामान्य सावध व सजग राहिलो, तर ७५% गुन्हे होणारच नाही, विचार करा. मुली फसतात. पण फसवणारी मुले व पुरूष ह्यांना, त्यांच्या पालकांकडून, चांगले संस्कार मिळाले तर योग्य मार्गाला राहतील ना? रस्त्यात मुलींची छेड काढणार्‍यांना, आजूबाजूच्या PUBLIC चा धाक राहिला, तर नक्कीच फरक पडेल. पण लक्षात कोण घेते? तर माझी 🙏 जोडून विनंती आहे, अशा प्रसंगी, मला काय करायचेय, अशी वृत्ती ठेऊ नका. अहो, कुठेतरी कोणीतरी , तुमच्या मुली बहीणींना पत्नीला मदत करील हो. तर,प्रसंगी, तुम्ही ही, ” कोणीतरी व्हा”. अशा छोट्या छोट्या, घटनातूनच, त्या टारगटांची हिंमत वाढते. मग त्यांचे पाऊल पुढे पुढे सरकते. त्या वेळी त्यांचे “TARGET” कोणी ही – आपल्या पोरीबाळींपैकी ही असू शकेल. म्हणून सर्वांनी एकत्र विचार करून प्रत्येक प्रसंगी, वेळेवर , ही विषारी वल्ली उपटून टाकली पाहिजे. नंतर होणारे अत्याचार व बलात्कार थांबतील. तसेच ,” ती” मुले- मोठेपणी असला गुन्हा करणार नाहीत. त्याचे श्रेय तुम्हाला मिळू ...

ओळख व मैत्री कोणाशी असावी वा कोणाशी नसावी. व त्याची मर्यादा.

  २४.८.२०२३ ओळख व मैत्री कोणाशी असावी वा कोणाशी नसावी. वाचकमंडळी हो. मी आज याबाबतचा माझा दोन वर्षापूर्वीचा (२३.८ .२१) लेख- ब्लॉग तुमच्या समोर ठेवणार आहे. कृपया हा वाचून व आपल्या मुलांमुलीं व नातवंडाना वाचून दाखवावा. तरूण वाचक वर्गाने,आपल्या मित्र मैत्रिणीत यावर चर्चा करावी. ही कळकळीची विंनती. हे तुमच्या हितासाठीच आहे. मी आज एक गोष्ट सांगणार अाहे. सत्य घटना आहे. पण त्या आधी हे वाचा. असंगाचा संग धरणे। निरावलंबी वास करणे । निःशब्दासि अनुवादणे। कोणे परी । । हा आहे, दासबोधातला दशक ७ वा समास ७. नाव दिलेय , “साधनप्रतिष्ठा निरूपण. साधन म्हणजे आपल्या जीवनाचे व जिविकेचे साधन- उद्दिष्ट. तेच जर ठरवले नसेल, तर आला दिवस , गेला दिवस. असलेच निष्क्रिय जगणे. निरावलंबी वास व असंगाशी संग. तुम्ही crime patrol बघता का? नसेल तर बघा जरूर. त्यातील विभागांना नावे ही समर्पल दिलेत. ” सतर्क” सावधानता.- जागरूकता आणि ” दस्तक”- अर्थात् मी गेल्या आठवड्यात हे सांगितले होतेच. दस्तक म्हणजे दारावरची ठकठक. ती जाणून घ्या. दुर्लक्ष करू नका. त्या घटना जशा घडतात, त्या समजून घ्या व स्वतःच्या बाबतीत घडू नये, हा प्रयत्न करा. ...

ऐतिहासिक कुसंस्कार अर्थात् सत्य लपले हो. भाग दुसरा.

  अनेक वर्षे पिढ्या- पिढ्यांवर होणारा कुसंस्कार. भाग. २ . काल मी जे काही लिहिले, ते माझ्या वयाच्या मंडळींना, कदाचित आठवेल. कदाचित अशासाठी म्हणते, कारण त्या काळात बातम्या फक्त वर्तमानपत्रातूनच कळत असत. त्यामुळे, जी माणसे( बहुदा पुरूषच) हे जाणत असतील- जर राजकारणात interest घेऊन दिलसे वाचत असतील, तरच आठवण्याचा प्रश्न येईल. नाहीतर😇😀. पूर्वीच्या महिला घरकाम लोणची पापड यातच मग्र असत. आज ही काय तेच म्हणा, फक्त आजकालचा वर्ग, मालिका व त्यांच्या घरातील भानगडीत गुंतलेल्या असतात. अगदी कित्येकदा आपल्या सोबत बच्चे कंपनीवर हेच कुसंस्कार होत आहेत, ह्याची पर्वा न करता. असो. मूळ मुद्दा हा कि स्वातंत्र खरे कसे व कोणामुळे मिळाले आहे, ते माहित करून घ्या व त्याची , जाणिव,आपल्या मुलामुलींना अन् नातवंडांना करून द्या. त्यांचे भविष्य, अक्षरशः त्यांच्या हातात राहू द्या. हां तर, कालच्या पहिल्या दोन मुद्दांची आठवण करा. व पुढील मुद्दे मनःपूर्वक वाचा. नंतर झालेल्या फूटीचा, सविस्तर विचार व मनन केले, तर शिर्षकातील सत्य लक्षात येईल. तिसरा मुद्दा:- इंदिरा गाधीच्या, नेतृत्वाने खाली,१९७१ मध्ये, काही जण, मूळ कॉंग्रेस...

फसवणूक होणे, वाईटचपण हे का व कसे घडत, ते पाहू

  २२.८.२०२३. पुनःच हरि ॐ. फसवणूक होणे, हे वाईटच , पण हे का कसे घडते, ते पाहू सावधान व सजग होणे, आवश्यक आहे, हो वाचक हो, आज बरीच मोठी gap घेतली, त्याबद्दल क्षमस्व. काही tech व काही विशिष्ट बाबतीत माहीती मिळवण्यात गुंतले होते. असो. आता माझ्या जरा १५ दिवस अाधीच्या ब्लॉग संदर्भात लिहिणार आहे. त्याचे वाचन व मनन करणे, सर्वांच्या हिताचे आहे. फसवणूक होणे, हा प्रकार वाईटच~~ पण ह्या घटना का व कशा घडतात. ते पाहू. प्रथम, त्या विशिष्ट २.८.२३ ह्या ब्लॉगचा, एका भागाचा संदर्भ देते. महाराष्ट्र टाईम्सच्या ३१जुलैच्या रविवारच्याच पेपरमधील, पहिल्याच पानावरची, “देशभरातूम १३.१३ लाख मुली, बायका बेपत्ता.” विचार करा, ह्या इतक्या मोठ्या संख्येने बायका व मुली का व कशा फसत असतील व त्या फसवणार्‍या मंडळींना कसा काय आत्म(!) विश्वास असेल की , आम्ही “या”, विशिष्ट select केलेल्या मुली/ बायकांना, जाळ्यात ओढू शकू. तोही गुन्हेगारांचा, एक प्रकारचा, मानस शास्त्राचा अभ्यास, असणार. असतोच. ज्या मुली साध्या, नाकासमोर चालणार्‍या असतात किंवा एकदम अभ्यासू असतात. ज्यांना पुस्तकीच ज्ञान असते. मार्कांच्या मागे धावत असतात, असा मुली...

मनःपूर्वक भक्ती हीच खरी शक्ति

Image
  16.8. 2023 मनःपूर्वक भक्ती हीच शक्ति. वाचकहो, काल आपण सर्वांनी, आपल्या देशाचा , स्वतंत्रतादिन साजरा केला. आज कित्येक ठिकाणी, या दिनाचा उल्लेख, स्वातंत्र दिन असा केला जातो. पण या दोन्ही शब्दांच्या अर्थात, मोठा फरक आहे. मागच्या आठवड्यात, तो मी स्पष्ट केला होता. या विषयीची, माझी, short film आहे, तिची लिंक देते. ती बघा. असो. आज ही आपण कालच्या विषयावर विचार करणार आहोत. भक्तीभाव कसा असावा. मनात असणे महत्वाचे की जनात दाखवणे योग्य, ह्याचा प्रत्येक माझ्या सुजाण वाचकाने करावा, असे मला वाटते. कालचा लेख , हवे तर परत मनापासून वाचा. सर्वसाधारण बरेचसे लोक, retirement नंतर चारधाम यात्रा वगैरे, एखाद्या travelling agency द्वारे करतात. स्पष्ट बोलायचे झाले, तर ते commercial उरका पाडतात. त्यावेळी संपूर्ण प्रवासाचा एकूण काळ पाहता, त्या त्या देवासमोर किती % वेळ आपण असतो. खरे सांगू, आजकाल बाहेर पडल्यावर, आपले लक्ष, जास्ती करून, मोबाईल घेऊन फोटू I mean selfyकाढण्यात असते. त्या स्थळाची महती. मंदिरांची पुरातन स्थापत्य कला नजरेने बघून, मन तृप्त होण्याएवजी, मोबाईलमध्ये साठवण्यात असते. मग दाक्षिणात्य मंदिराची...