Posts

Showing posts from June, 2021

मायाजाल व सांप्रत सावळा गोंधळ.

 १. ७. २१ गुरूवार जेष्ठ कृष्ण सप्तमी. माया नगरी.    आज पुन्हा ४ दिवसाची gap पडली, प्रिय वाचक हो, क्षमस्व. काय करू, ही मुंबईच नव्हे तर, ही पुरी दुनियाच खरेच, "माया" नगरी झालेय. तुम्हाला माहीत आहे, हा     " माया" शब्द अगदी पूर्णतः विरोधी अर्थाने वापरला जातो. बघा आता,      १. माया:- ममता- प्रेम. हा positive अर्थ.  आईची माया. बहिणीची माया वगैरे.     २.आदिमाया:-  मूळ देवी. पार्वतीला उद्देशून म्हटले जाते. म्हणजे देवत्व. बरोबर नं.     ३. माया:- जमवलेले डबोले. साठवलेले धन. आजकाल कोणी निवडून आले कि, पुढारी/ नेते मंडळी करोडोंनी इतकी "माया" जमवतात हो,  कि आपण कल्पनाच करू शकणार नाही. ही माया- लक्ष्मी. पण इथे  जरा negative अर्थी  वापरला जातो हा शब्द.      ४. मायाजाल:- भुलभुलैया या अर्थी ही माया शब्द योजला जातो. बघा, माया बाजार. माया नगरी.वगैरे. ते ढोंगी बाबा अन् बाया असे काही मायाजाल पसरतात कि, सामान्य माणूस त्या जाळ्यात फसतो व लुटला जातो.      ५. जादूचे प्रयोग:- रंगभूमीवर असे काही हातच...

टेहळणी बुरूजावरून भाग दुसरा.

Image
 माझे विचार बरेच जणांना आवडत आहेत व पटत आहेत. पाहून खू छान वाटतेय. बघा टेहळण. बुरूज आपल्यातही असतोच. आपली खाण्याची capacity माहित  असून ही आपण बुफेत काय करतो. अन् दुसर्‍या दिवशी आजारी पडतो. एकूण काय watch tower चा उपयोग करत नाही. व्हिडिओ चालू करण्यासाठी चित्रावर टच करा.

टेहळणी बुरूज गडावरील. तसेच आपल्या जीवनातील टेहळणी बुरूज-watch tower.

Image
 २७ जून २०२१. माझ्या या blog  संबंधी , प्रारंभापासून असलेले वाचक व त्यांच्या प्रतिक्रिया. तसे तर अनेक आहेत. पण आज ह्या lockdown च्या काळात available असलेले. हे तुम्हाला युट्यूबवर पाहिला मिळेल. लिंक देत आहे.नक्कीच मागे जाऊन वाचाल. व स्वतः वाचाल, येणार्‍या संकटापासून. बस मी ही ओके होऊन, उद्या येतेच भेटायला, as usual  मोठ लेख घेऊन.

आपली - माझ्या परिवाराची सुरक्षितता प्रथम.

 २६.६ .२१ .शनिवार. जेष्ठ कृ. द्वितिया .  माझ्या नियमित वाचक हो, आज क्षमस्व. सकाळपासून ताप असल्याचे व डॉ.नी.सर्व दृष्टीने सुरक्षिततेसाठी आराम करायला सांगितल्याने आज लेख नाही.पण संदेश देते. काही होत नाही, अशा समज करून,त्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करू नका. घरच्यांना विचार करा. त्यांच्यासाठी क्वार्टाईन रहा. बस. उद्या भेटतेच.

मुंबईनगरी बडी बाका. तुमचे भविष्य तुम्हीच शोधा.

 २५. ६ .२१ . गु्रूवार जेष्ठ कृष्णपक्ष. प्रतिपदा.    पुनवेचे पर्व काल झाला. वडाच्या फांद्याची कत्तल झाली. आज जिथे तिथे कचर्‍यात सुकलेल्या वडाच्या पानाचा ढीग दिसतोय. हे काय हो. जर व्रताचा  मतितार्थ, सुज्ञांनी समजून घेतला असता, आज तोच पर्णसंभाार आजही दिमाखाने वृक्षावर डोलला असता. असो.  आज मी मुंबईची ओळख करून देणार आहे. जे वाचक मुंबईकर आहेत, ते म्हणतीत, त्यात तुम्ही काय ओळख करून देणार, आम्ही तर इथेच राहतो नं!     इतिहासाशी बहुदा, सर्वांनी, शालेय जीवनानंतर काडीमोड घेतला असतो. कधी मुंबईचा इति+ हास जाणून घेतलात का? मुंबई ही सात बेटांचा समुह होता., हे शाळेत नकाशासह शिकलो आपण. पण ही अशी एकसंघ मुंबई कशी बनली. कोणी बनवली? माहित आहे का? अगदी आमच्या लहानपणी मालाड वगैरे-  बापरे किती लांब मानले जाई. ठाण्याला तर. एक गंमत सांगते. माझे वांद्रेला आजोळ.  कांतामावशीचे लग्न जमले. १९५५मध्ये. बाकी सगळे छान असून एवढे लांब कां जावयाचे, अरे देवा! असे तिच्या मनात आले.       तर सांगायचा मुद्दा  कि, हे सर्व आता मुंबईतच मानले जाते. मुंबई पसरत गेली....

आपले हित, आपल्या हातात. नाही कोणा नेत्याच्या हातात.

 २४. ६ .२१ गुरूवार जेष्ठ पोर्णिमा- वडपोर्णिमा.   काल मी फेसबुकवरील एका पोस्ट बद्दल लिहिले, तेव्हा deeply वाचणार्‍या वाचकांना वाटले असेल, मी spelling mistake केली. screen shot  च्या ऐवजी screem shot लिहिले. नाही हं. Actually मी मुद्दामच तसेच  लिहिलेय. सांगते का ते! ती पोस्ट इतकी DAUNTING भयावह आहे कि, तो नुसता screen shot नाही. त्या विरोधात  SCREAM  =आक्रोश करणे, जरूरी आहे. मग मी ते दोन्ही शब्द एकरूप केले. screen + scream = screem. अहो, शब्दांचे बादशहा, असा ज्या professionचा उल्लेख केला जातो., ती मंडळी भाषेला twist करून, जो english शब्द निरागस बालकासाठी योजला जातो naughty,  अापल्या भाषेतील अव्वल शिवीचा ( हरामखोर)  प्रतिशब्द आहे, असे ठाम सांगतात.   मग मी माझा आक्रोश का प्रगट करू नये. मी ती post इथे देणार आहे. पण आजच्या शुभदिनी नको.   असो. आता आपण आजच्या सणाचा विचार करू या. हो. हे वडपोर्णिमेचे व्रत असले तरी हा एक सण - सोहळाच आहे. आज हिंदु महिला उपास करतात व  वडाच्या झाडाची पूजा करतात. नुसतेच हात जोडून परत येत नाहीत, तर प्रदक्षिणा ...

आज तीन तिथीचा मजेशीर संगम

 २३. ६. २१ जेष्ठ शुक्लपक्ष. त्रिवेणी संगम+ तिथींचा. आज गंमत पाहिलीत, आज २३ जूनला सकाळी थोडा वेळ त्रयोदशी दिवसभर चतुर्दशी व उत्तररात्री , पहाट होण्याच्या थोडे, आधी ३.३२ला पौर्णिमा. ही तर निसर्गाची लिला. तिथी ठरतात चंद्राच्या भ्रमणावर तर तारीख date ठरते, सुर्याच्या भोवती पृथ्वी फिरताना, स्वतःशीच गिरकी घेते, त्यामुळे. मग असा काही चमत्कार होतो.            सोमवारी २१ जूनला मी एक उल्लेख केला होता, आठवतोय. जर नसेल वा कोणाचा त्या दिवशीचा लेख वाचावयाचा, राहिला असेल, तर कृपया तो वाचावा. लेखात मी एका सद्य प्रसंगावरून, व्यासमुनी व नारदमुनींची आठवण केली होती. दोघांना, अनुक्रमे आद्य वक्ता व आद्य किर्तनाकार का संबोधले जाते, माहीत आहे.             दोघेही ,I mean तिघेही विष्णु भक्त-नारदमुनी विष्णुभक्त सदैव, "नारायण नारायण" , हा जप. अन् विष्णु पुराण व स्वर्ग प्राप्तीसाठी  भक्तीचे विधी या बाबत लोकांच्यात जागृतीकारणे, सर्वत्र संचार करून, प्रचार करणे, म्हणजेच किर्तन करणे. म्हणून ते , " आद्यकिर्तनकार.  रामायण घडले.  तर ...

माझे लेखन✍ तुमचे वाचन📃 हेच आपले मिशन.

 २२. ६ .२१ जेष्ठ शुक्ल द्वादशी. मंगळवार.         काल सात  वारांची माहिती व आठवड्याची संकल्पना स्पष्ट झाली. पण आजच्या मंगळवारी,  नेमके भौमप्रदोष आलेय. नियमित वाचकांना भौमवार म्हणजेच मंगळवार, हे आठवत असेल. कोणी आजच नवीन असेल तर मागच्या रविवारपासूनचे blog वाचा. Then you will get the reference.          दोष चा अर्थ सांगायला नको. प्र म्हणजे दिर्घकालीन. आज सकाळी द्बादशी होती, तरी माध्यांनीच त्रयोदशी सुरू झाली. व शुक्ल व कृष्ण मंगळवारी - त्रयोदशी असली तर भौमप्रदोष योग म्हणतात.          ( Don"t worry येवढे झाले कि,  दुसरा मनोरंजक topic  घेणार आहे)           तर या बद्दल जाणकार होऊ या.           इथे प्रश्न अंधविश्वासाचा नाहीये. आत्मविश्वास वाढविण्याचा आहे.  पण प्रत्यक्ष घडते उलट. अशी व्रते करून आजची पिढी आत्मनिर्भर न बनता, उलट, या clutches च्या सहार्‍यावर विसंबून राहण्यास लागते. आपण व्रत करतोय नं, मग धडपड करायची काय गरज?  काही मंडळी तासन् तास प...

को जाग्रती, या सवालाला , "अहं " हा जबाब देण्यास पात्र व्हा.

 २१.६ .२१ . जेष्ठ शु.  एकादशी. सोमवार.   आपण गेल्या आठवड्यात सात वारांची नावे( पौरात्य- आपल्याकडील व पाश्चिमात्य) व त्यांचा सुर्यमालेतील ग्रहांची संबंध पाहिला , आता जरा वर्तमानकाळात येऊ या. या घडी आपल्या आजूबाजूला काय चाललेय, व त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ घातला आहे, ह्याचा विचार करणे, त्याप्रमाणे, ह्याबाबत आपण काय करू शकतो , ते बघणे जरूरी आहे. जर हातावर हात ठेऊन बसले, तर काय परिस्थिती होईल? यामुळे आपली पुढची पिढी कशी  गोत्यात येईल,  हे आपण बघणे, किती गरजेचे आहे, ह्याचा आपल्यातील ८०% ( वय वर्षे १८ ते ९०) विचारच करीत नाहीत. हाच आपला दुर्दैव विलास अाहे. आपल्यापुरतेच जगत्यात ही लोकं!     त्यामुळे होतेय काय कि, आपमतलबी लोकांना, सामाजिक व राजकिय क्षेत्रात,  सावळा गोंधळ सहज करणे, शक्य होय आहे.      कारण सामान्य जनता,  आता, " जनता जनताजनार्दन" राहिली नाही. तिला आसमंतात काही घडले, तरी देणेघेणे राहिले नाही. कोणी ही वक्ता, सभेत कशी ही भाषा वापरतो. टाळकरी, " टाळ्या पिटतात.  जोड्याने हाणू, ही वाक्यरचना, व्यासपीठावरील नव्ह...

आठवडा=फक्त सात दिवसाचा😁.

 २०.६ .२१ . रविवार जेष्ठ शु. दशमी.     गेल्या आठवड्यात, आपण सात वारांची मराठी नावे व पाश्चिमात्य वापरत  असलेली त्यांची नावे, ह्यांची तुलना केली व कमालीचे साधर्म्य जाणवले. हजारो वर्षापूर्वी हजारो योजने दूर वसलेले हे लोक, आकाशातील कित्येक अब्ज योजने दूर असलेल्या ग्रहावर आधारित  दिवसांचे  साम्य नामकरण करतात. हा खरेच चमत्कार आहे नं? तेव्हा या आपल्या पृथ्वीतलावरील सर्व पुर्वजांच्या ज्ञानावर, श्रध्दा ठेवायला काय हरकत आहे. तर माझ्या जिज्ञासू वाचकवृंदानो, या सर्वांना मनःपूर्वक वंदन करणार ना, माझ्या समवेत.      आता गंमत बघा, लेखाच्या सुरूवातीस, मी एक शब्द वापरला.- आठवडा- अहो, सात दिवसांचा हा समुह आठवडा(८) का बरे संबोधला जात असेल ? तोच तर प्रश्न मला ९.१० वर्षाची असताना पडला अन् मी सगळ्याचे डोके खाल्ले. माझी एक सवय होती, आजीचा ( सर्व तिला काकी म्हणत) पदर धरून,  देवळात प्रवचन- किर्तनाला जाणे. तेथे किर्तनाकारांनी , काही शंका असल्यास विचारा, सांगितले. विषयाशी काही संबंध नव्हता, पण मनात खदखदणारी शंका विचारलीच, "  आठवडा सात दिवसांचा असतो,मग तो सातव...

शनिवारची आगळी कहाणी- आजच्या परिस्थितीशी साम्य धर्म राखणारी😂

 १९. ६ .२१. जेष्ठ   शनिवार- मंदवार. नवमी.    सात वारांतील शेवटचा. याला पुराणात मंदवार म्हणत. मंद म्हणजे संथ. english मध्ये मंद = slow. अर्थ- गतीने जरा कमी. पण मराठीत slow= हळू संथ व मंद. पण प्रत्येक वेळी संथ व मंद शब्द नकारात्मक नसतो. गुणदर्शक असू शकतो. नाहीतर' "मंदा" हे नाव कोणी ठरवले असते का?      मंदाकिनी एक नदी आहे. जी संथ वहाते. तिला सहसा पूर येत नाही किंवा कधी कोणी,  प्रवाहात जोर नसल्याने वाहून जात नाही. आता शनिवारचा, पूर्वी उल्लेख मंदवार का करत, समजते. त्या शनि ग्रहाची कक्षेत गती इतर ग्रहांच्या मानात हळूहळू आहे. जेव्हा एखाद्या महान व विख्यात व्यक्तीचा पुत्र कामयाबीत कमी पडतो, *( see note written down), तेव्हा त्याला " सुर्यापोटी शनेश्वर!" म्हटले जाते. याचा प्रत्यय येतच आहे. पण आळीमिळी चूप, हे धोरण ठेवणे, शहाणपणाचे होय.       आता शनिची देवळे असतात. मालाडला, भाईंदरला व भायखळ्याला आहेत. पण ही त्याची भक्ति करायची नसते. तर शांति करायची असते. त्याला समोरून नमस्कार करू नये. कारण त्याची नजर आपल्यावर पडू नये,म्हणून काळजी घ्य...

गुरू व शुक्र- जीवनातील 🕯🕯🕯🕯🕯.

१८. ६ .२१ .शुक्रवार जेष्ठ शु.  अष्टमी दुर्गाष्टमी  आज आपण गुरुवार व शुक्रवार दोन्हीविषयी जाणून घेणार आहोत.  तसे पाहिले तर दोन्ही मार्गदर्शक. एकप्रकारे जीवनात, "प्राण" आणणारे.    गुरू ग्रह मालिकेतील पाचवा ग्रह. आकाराने सर्वात मोठा. लहानाला बोलतात, लघु व मोठ्या बोलतात, गुरू म्हणजे समर्पक नाव.    गुरू म्हणजे शिक्षक अध्यापक , हे तर सर्वांनाच माहीत  आहे, पण हा शब्द कसा तयार झाला, ते पुढील श्लोकावरून समजते.   गुकारास्त्वन्धकारस्तु रुकार स्तेज  उच्यते।   अन्धकार निरोधत्वात् गुरुरित्यभीधीयते। ।    अर्थ बघु या.   "गु" कार म्हणजे अंधार.                       " रु" कार म्हणजे तेज.               जो अज्ञानरूपी अंधाराचा निरोध करून, ज्ञानाचा प्रकाश-तेज देऊन आपल्याला, प्रज्ञावान बनवतो. तो  गुरू होय. गुरू ग्रहाला  इंग्रजीत jupiter म्हणतात. त्याचा ही अर्थ तेजःपुंज असा आहे. मला सांगा, संस्कृत व ग्रीक   जगाच्या पाठीवर, ...

माझे रसिक वाचक हो. एका अर्थी गुरूजन हो🙏.

 १७.६ २१. गुरूवार जेष्ठ. शु सप्तमी.  खरे तर आज गुरुवारची- गुरू ग्रहाची माहिती सांगायला हवी. पण मंगळवार- मंगळ ग्रह व बुधवार- बुध ग्रह यांची माहिती अपुरी राहिली आहे. ती पूर्णतः सांगणे, बरोबर वाटले, म्हणून  मागचाच विषय चालू ठेवला. मुख्य म्हणजे sorry परवा वाराच्या मूळ नावांत चूक झाली. मंगळवारचे नाव भौम्यवार तर चुकून धौम्य लिहिले गेले व बुधवारचे सौम्यवार होय. भौम्य म्हणजे सदैव भ्रमण वा भ्रमित करणारा. व सौम्य म्हणजे शांत करणारा. म्हटले तर दोन्ही विरोधार्थी. पण सलग्न. मंगळ नशीबाशी तर बुध प्रयत्नांशी संबंधित.     अाता येऊ या, कालच्या मुद्दाकडे.  दोन्ही उदाहरणात,  सिध्द होते, खालील म्हण.   एकूण काय तर, चणे आहेत तेथे दात नाहीत.व दात अाहेत तेथे चणे नाहीत.      यावर, छ. शंभुराजेंनी काय लिहून ठेवलेय, ते बघा.         छिन्द सोतं परक्कम कामे पनुद ब्राह्मण        संखारानं खयं ञतचवा अकतञ्ञू दि ब्राह्मण  ।।१।।            प्रत्यक्षात  ब्राह्मण वर्गाची व्याख्या अशी...

मंगळवार- भौमवार व बुधवार- सौम्यवार.

Image
 १६. ६ .२१ . मंगळवार व बुधवार या दोैन्हीची सांगड.  सांगड म्हणजे एकत्र विचार करून साम्य  दाखवणे किंवा दोन्हीतील संबंध स्पष्ट करणे. त्यासाठी जरा तुम्हाला माझ्या युट्यूबवरील, dharmshilsunita karnik या चॅनेलवरील दोन एपिसोड बघावे लागतील. मंगळ आहे.पण बुध नाही. असे असले, तर काय होईल. समजा, तुमच्याकडे सर्व electrical equipment  आहेत, पण वीज नाही किंवा वीज आहे. पण मिक्सर वाँशिंग मशीन नसेल तर, तसेच मंगळ ग्रहाची कृपा आहे, पण बुध्दी/ विद्याच नाही तर. तेव्हा बघा हे दोन्ही एपिसोड.       एक  गंभीर उदाहरण सांगते, या संबंधी. आमचे अंध विद्यार्थींचे. त्याकडे पुस्तक असतात, शिकण्याची इच्छा असते. पण दृष्टी अभावी वाचनासाठी, दुसर्‍यावर अवलंबून असतात , तर ज्यांना चांगले दिसते, पालक शिक्षण देऊ इच्छितात, त्यांना  टपोरीपणा पुढे वा सतरंज्या उचलण्या पुढे  काही सुचत नाही. बघा नक्की. लिहिण्यापेक्षा बघताना जास्त समजेल, मला काय सागायचेय ते. उद्या मंगळवार- भौम्यवार संबंधी सांगेन भौम्य म्हणजे मंगळ ग्रह  व बुध म्हणजे सौम्य वार  या बाबत आणखी मनोरंजक पण महत्वाच...

मंगळवार- भौमवार व बुधवार- सौम्यवार.

 16.6. 21.       एकूण काय तर, चणे आहेत तेथे दात नाहीत.व दात अाहेत तेथे चणे नाहीत.  या वर, छ. शंभुराजेंनी काय लिहून ठेवलेय, ते बघा.         छिन्द सोतं परक्कम कामे पनुद ब्राह्मण        संखारानं खयं ञतचवा अकतञ्ञू दि ब्राह्मण  ।।१।।       प्रत्यक्षात  ब्राह्मण वर्गाची व्याख्या अशी आहे.      अर्थ उद्या बघू.  ते दोन्ही एपिसोड जर लक्षपूर्वक बघितलेत, तर ह्याचा अर्थ पटकन चटकन कळेल. आजच्या  काळात, सबकुछ,  झटपट पहिजे ना? ज्ञान ही. हाजीर है।  या सरळ सोप्या रितीने, संस्कृत ग्रंथांची ओळख होईल.आजच्या भाषेत.        तर उद्या भेटणार नं? मी तय्यार होऊन वाट पाहते. ज्ञानाची ओंजळ भरून. गंमत म्हणजे हे मी तुम्हाला देणार आहे.पण माझी झोळी रिकामी न होता, भरभरून वाहतेच आहे, दौपदीच्या थाळी गत.

मंगळ ग्रह - मंगळवार- पत्रिकेतील मंगळ ग्रह.

 १५ .६ २१ . मंगळवार. जेष्ठ शु. पंचमी.       स्वागत आहे, जिज्ञासू  वाचक हो. दिवसेदिवस माझे, I mean आपले वाचक वर्ग वाढत आहेत. हे श्रेय फक्त माझे नाही हं. तुम्ही ही प्रशंसेला योग्य आहात.        माझे, हे स्वगत अापण गोड मानून वाचत आहात. तसेच चिंतन व मनन करत असणार, म्हणूनच  उत्सुकतेने वाचता. हे मला प्रेरणा देत आहे.       तर आज मंगळवार. जेष्ठ पंचमी सिधासाधा दिवस       हां. धार्मिकदृष्टा देवीचा  व गणपतीचा दिवस. पण असे आहे, सगळेच दिवस उपास ठेवण्याची रीत नाही. हां देवाकडे मागणे, rather साकडे घालण्यासाठी उपास धरला जातो. मी  ५. ७.११ . दिवस उपास करीन, तु मला अमूक एक दे.  गंमत म्हणजे या विद्येच्या देवतेकडे काय मागतात माहितेय? विशिष्ट मुलगी / नोकरी वगेरे. त्या गणेशाने काय विवाहसंस्था खोललेय कि, नोकरीची  agency उघडलेय. लंघन आणि उपास संपूर्ण वेगऴ्या बाबी आहेत. स्वतःची लायकी व योग्यता सिध्द करा. मग नोकरी व छोकरी चालत येईल.  मंगळवारी  दादरच्या सिध्दि विनायकांच्या देवळातील लांबलचक रांगा प...

जुने ज्ञान सोने असू शकते. JUST GO THROGH IT. MAY BE BENEFICIAL.

 १४ .६ .२१ सोमवार. जेष्ठ ४.     विनायकी चतुर्थी. परवा मी अमावस्येचा परिणाम, विशद(  समजावणे) करावयाचा प्रयास केला. काल ही परत त्याच मुद्दावर जोर दिला.  शिवाय आपले वार त्याची मूळ नावे सांगितली . त्याचा आपल्या  निरोगी व निरामय जीवनावर निश्चित प्रभाव पडत असतो.       वर्तमानकाल पाहताना, आपल्या आरोग्याचा विचार करणे, महत्वाचे आहे. त्यावर आपला व अापल्या ,  आपल्या मुलांचा भविष्यकाळ अवलंबून असतो. ध्रुमपान करणार्‍या वडिलांच्या व्यसनाची  त्यांना "ऐटी" वाटते. पण त्यांच्या निकट सहवासाने, मुलांच्या श्वसन संस्थेवर परिणाम होत असतो. तसेच सवयी ही उचलल्या जातात. असो. हे विशिष्ट लोकांच्या बाबतीतच घडते.     पण सर्वसामान्य यच्चयावत जनताच्या बाबतीत काय घडते, ते बघू.  वार व तिथीचा पचनसंस्थेवर होणार परिणाम  सांगायचा मी प्रयत्न करणार आहे.  त्यावर प्रयोग करून खात्री करू शकता.       आज सोमवार व विनायकी चतुर्थी ही दोन्ही उपवासांचे दिवस. अापल्या पूर्वजांनी विशिष्ट दिवसच का बरे , " लंगन" दिवस सांगितले असतील.  ...

पुनरावृती

 १३. ६ .२१ . रविवार जेष्ठ.   हो.आज जास्त लिहिणार नाही. कालचा लेख काही tech कारणाने उशीरा दिसू लागला. नेट किंवा गुगलचा problem झाला असावा. पण फार महत्वाच्या मुद्दावर लिहिले होते. अगदी,  "दिलसे"= ते कोणाचे वाचावयाचे राहिले असेल, तर तो लेख, ' कालचा पेपर= रद्दी होऊ नये. त्याचे मनोमन वाचन व्हावे, म्हणून आज ऐवढेच. तेच परत परत वाचले जावे, मनात ठसावे, ही मनीषा.

तिथी व वार यांचा आपल्या आरोग्यावर व पचनसंस्थेवर होणारा परिणाम.

 १२.६.२१ शनिवार.जेष्ठ. शु. द्वितिया.  काल मी म्हटले होते. आता आपण भविष्य काळाचा विचार व काळजी करू या. सध्या काही action करायला सांगत नाही. पण वाचन करताय तेच महत्वाचे आहे. त्यावर फक्त चिंतन करा. निदान पटतेय कि नाही, हे मनाशी स्पष्ट करा. तेच खूप उपयुक्त आहे. माझे विचार, बहुजनापर्यंत पोहोचत आहेत, हेच माझ्या दृष्टीने, चांगले आहे.    पुुढच्या भविष्य काळाच्या, हितासाठी, आता वर्तमानकाळात, आपल्या समाजाच्या हातून जे  बरे वाईट घडत आहे, त्याला ऐतिहासिक अनुभवांची जोड मिळणे, गरजेचे आहे. मग साहजिक. त्यासाठी, त्या घटनांची समूळ माहिती मिळवण्यास हवी, बरोबर नं?       आता दोन दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रात घडलेली घटना पाहू या. वरवर पाहता, ही सुधारणा, वा! छान!  वाटेल.        पण छ. शंभुराजांनी त्यांच्या ," बुधभूषण", या ग्रंथात जे लिहून ठेवले आहे, ते पाहू या. सध्या  श्लोक बाजूला ठेऊन , त्यांना जे सांगायचे आहे, तेच सविस्तर जाणून घेऊ या. ते लिहितात, जे आपले पूर्वासूरी सांगतात- जे ऋषी मुनी विद्वान तसेच कवी व साहित्यिक यांनी लिखित स्वरूपात आप...

११.६ .२१ . छत्रपती संभाजीमहारांजांची खरी ओळख व महती.

 ११. ६. २१. छत्रपती संभाजी महाराजांची खरी ओळख व महती, त्याकालीन तत्सम जनतेने व प्रजेने जाणून घेतली असती तर~ आता जर तर म्हणण्यात काही अर्थ नाही. पण या धुरंधर योध्याला, जनतेने साथ दिली असती, संताजीप्रमाणे  व कवि कलशा सारखे स्वदेशप्रेमी व स्वधर्मनिष्ठ   सगे सोयरे मिळाले असते, तर आपले आजचे जीवन किती समृध्द समाधानी असते व स्वधर्मात योग्य स्वतंत्र व स्वबल झालोअसतो.  जर कित्येक सरदारांनी स्वार्थी विचार न करता, या शिवशाहीत स्वतःला झोकून दिले असते तर ~~.  एखादे इवल्याशा वतनाचे धनी न होता, संपूर्ण मराठा राज्याचे अधिपति झाले असते.  आरती नंतर जी मंत्रपुष्पांजलि  म्हणता ना, त्याचा अर्थ माहित आहे का? ते स्वप्न तेव्हाच सफल झाले असते. निदान अाजतरी  जागे व्हा. जगजेत्ते होऊ शकणार्‍या आपल्या पंतप्रधानांना, मा.मोदींना साथ द्या. हिंदुत्व त्यांना कळलेय हो.  हां तर, आपण परत वळू या, बुधभूषणकडे. कित्येकजण नको त्या  पध्दतीने अस्मिता व स्वाभिमान यामागे लागत आहेत. पण तो आभास आहे. अाज आपल्याला मोगल व ब्रिटीश काळापासून, पाठ्यक्रमिक अभ्यासाला हिंदुत्वाबाबत शिकवण्...

छ.संभाजींचा बहुमोल व सर्वगुणी सल्ला.

 १० .६ .२१ . बुधभूषणमधील छ. संभाजीमहाराजांचा बहुमोल सल्ला.   काल आपण पाहिले जर आपल्याला, जीवनात काहीतरी चांगले करायचे असेल, तर मुख्य आपल्याला स्वतःला ओळखा. आपली योग्यता व क्षमता जाणून घ्या. मी नेहमी एक श्लोक सांगते.  "राम"चा  अर्थ क्षमता. त्याची खरी दखल घ्या.    मी काल जे लिहिले कि, बहुदा सर्व गुणार्थी असतात. विद्यार्थी/ ज्ञानार्थी कोणी नसतात. पदवीसाठी विशिष्ट प्रकारे अभ्यास करतात. पण सखोल अध्ययन करणे, होत नाही. पण आज मी खूप खूश आहे. का ते सांगते.     झाले काय, शंभुराजेंच्या या, "बुधभूषण" ग्रंथाची अापल्या वाचकांना करून द्यावयाची ठरवली. ती सर्व लहान मोठ्यांना फायद्याची होणार आहे. संस्कृतचा तितकासा अभ्यास नसल्याने , अडले कि, मी माझ्या दोन लहान मैत्रिणींना शंका विचारते. त्या दोघींचा संस्कृतचा गाढ अभ्यास आहे .हो. सुजाता संस्कृतच्या शिकवणी घेते. कित्येक कॉलेजची मुले तिच्याकडे शिकतात. अंजली इंजिनियर आहे.       शंभुराजेंनी प्रारंभी ईश स्तवन करताना गणेश, शिव शारदा या देवतांबरोबर गुरूंचे स्तवन केले. त्यात त्यांनी गुरू कसे असावेत. हे सां...

नकाराधिकार व आपण.

 ९ .६ .२१ . नकाराधिकार व आपण.        हा नकाराधिकार प्रत्येकाच्या आयुष्यात यश व समाधान या  बाबतीत फार महत्वाचा मुद्दा आहे. कित्येकदा, एखादी विशिष्ट गोष्ट, आपल्याला पटत नसते, करायची नसते, तरी आपण करतो. का तर, सर्व करतात, मग नाही कसे म्हणायचे, इतर शेजारी वा  मैत्रिणी वा कलिग्सची मुले करतात, म्हणून आपल्या मुलांना ही force केला जातो. especially  १० वी नंतर मुले सायन्सलाच जावी, असे पालकांना वाटते. मग त्यांची आवड असो वा नसो. शाळेत सायन्सचा अभ्यास प्रत्यक्षच करावा. इतर विषय महत्वाचे मानले जात नाहीत. ते काय मार्क मिळवण्यापुरते, हे असे मुलांच्या व पालकांच्या मनावर ठसवले जाते. आपल्या आवडी नुसार,शिकावे.  इतर सामाजिक दबावाला बळी पडू नये. नकाराधिकार वापरून आपल्या आवडीच्या क्षेत्रात जावे, ही यशाची किल्ली आहे. या किल्लीचा वापर योग्य पध्दतीने व योग्य वेळी करायला हवा. लोक काय म्हणतील, या फालतू कल्पनेपायी, आपल्या करियरला तिलांजलि देऊ नये.        हे मी नुसते लेक्चरबाजी म्हणून सांगत नाही. मला दोन मुले. मोठ्याला ड्रॉंईंग व भूमितीत  intetes...

अाजची गरज-मानसिक-सामाजिक- राजकिय.

 ८. ६ .२१ . आजची गरज - मानसिक - सामाजिक - राजकिय.    छ.संभाजी महाराजांनी त्या वयात- त्या काळात ही गरज समजून घेऊन, त्या वर उपाय लिहून ठेवला होता. हा त्यांचा बुधभुषण जर वाचला, त्यानुसार वर्तन केले तर आपण आदर्श नक्कीच ठरू व यशस्वी ही.  तुम्ही म्हणाल कि मग ते स्वतः का फितुरीचे बळी झाले? ते fully alert होते. पण राज्याच्या लालसेचे शिकार झाले हो. शत्रुच्या कारवाईबाबत सावध होते. पण त्यांच्या पिताश्रींचा मृत्यु, त्यांजपासून लपवून, तिर्‍हाईताच्या हातून अंतःसंस्कार करण्याइतपत मजल जाईल, अशी ते कल्पनाही करू शकले नाहीत.  मासाहेब सोयराबाईंंनी हे केले.पण मतलबी व स्वार्थी मंडळी, या स्वराज्यात होती , ती ही खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसपास कटकारस्थाने करतील, हा अंदाज ते बांधू शकले नाहीत. असो.       त्यांनी लिहिलेला श्लोक, आपण पाहू या.  निदान सावध होऊ या. ते या बुधभुषणाच्या, तिसर्‍या अध्यायात ११ व्या श्लोकात, काय लिहितात बघा.       ज्याला वैभव व यश मिळवायचे आहे, त्या माणसाने, पुढील सहा दोष   वर्ज्यच (स्वतः पुरतेच नव्हे तर) संपूर्ण...

छत्रपती शंभूराजे व त्यांची धर्मनिष्ठा. ह्याचे ज्ञान सर्वदूर व्हावे, यासाठीच हा अट्टाहास.

 ७.६ .२१ .छत्रपती शंभूराजे व त्यांची धर्मनिष्ठा. ह्याचे ज्ञान सर्वदूर द्यावे, यासाठीच हा अट्टाहास.  काल जे अभ्यासले, तेच वेगळ्या संदर्भाने पाहू या . पूर्वी ६ महिन्याआधी आपण  भक्तिच्या नवरस पध्दतीचा अभ्यास केला . त्या दासबोधातील" बीरभाटिव" या बाबत विस्ताराने, लिहिले होते. तोच उल्लेख परत करायचा आहे . कारण ही बाब महत्वाची अ‍ाहे. इतिहास घडविणार्‍या वीरांच्या शौर्याच्या कथा, किर्तनातून जनसामान्यांकडे पोहोचविण्याचे, किर्तनकारांचे, आद्य कर्तव्य आहे. धर्मरक्षणार्थ, ज्यांनी जीवाची पर्वा केली नाही. अशांची चरित्रे, सकलजनांपर्यंत पोहोचविण्याचे " हे" एक प्रबल साधन आहे. बीरबाटिव म्हणजे बीर= शौर्यवान. भाट= म्हणजे स्तुती करणारा. इव=  निर्मिती  देण्यासाठी, शौर्यरसाचा प्रसार व प्रचार होता.    समर्थ रामदासस्वामींनी, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे निर्माण होणे, आवश्यक मानले .  मोगलांचे लागूंलचालन चालले होते, त्याला प्रतिबंध करणे, गरजेचे होते. तसेच सातारच्या छ.शाहूंच्या काळात ही हेच कार्य परमहंस ब्रह्मेंद्रस्वामी यांनी केले.अन् त्यासाठी, किर्तनकारांनी,  हातात सू...

६ .६ २१ .सद्य स्थिति व शंभुराजांच्या, बुधभुषणमध्ये सांगितलेली परिजनांची कर्तव्ये.

 ६ .६ .२१ . सद्यस्थिति व शंभुराजांच्या, बुधभुषण मध्ये सांगितलेली परिजनांची कर्तव्ये.  काल आपण बघितले,   त्या काळी, कोणी एक , "खंडुजी आपले मराठी छत्रपतीं  संभाजीमहाराज, मोगल शाहजादा आझम व आसदखानच्या जाळ्यात, स्वकियांच्याच फितुरीने, फसल्याची खबर देण्यास,  बादशहाकडे धावला, अन् बिदागी घेऊन खुश झाला. असेच दुष्कृत्य करायला,  म्हणजेच सतरंज्या उचलायला, आज अनेक (?) वीर सज्ज असतात. पण खरे तर त्या अजाण मुलांचा काही अपराध नसतो. असलीच तर, योग्य मार्ग न सापडल्याने झालेली चूक असते.  कशी ती सांगते. त्यासाठी, २०.२१ वर्षे मागे जावे लागेल. तथाकथित सरकारने, अचानक शिक्षणविषयक निर्णय घेतला, निर्णय कसला, त्या काळातील विद्यार्थांना, अभ्यास करण्यापासून, दूरच केले, म्हणा नं. असे ठरले कि, १ ते ७ वी पर्यंत, शाळातून परीक्षा घेऊ नयेत. सर्वांना पास करायचे. या  महाराष्ट्र सरकारच्या सरकाराच्या ठरावाने, काय झाले कि, मुले अभ्यास करेनाशी झाली. basic  काळात पाढे - कविता- वाचन या कडे पार दुर्लक्ष झाले व पुढे  ८ वी ९ वी त  गणिते- जोडाक्षरे वाचन व लेखन जमेनासे झाले. ...

५ ६ .२१ .इतिहासातील सत्य व लटके दिखावे.

 ५.६ .२१ . इतिहासातील सत्य व लटके दिखावे.         हो, वाचक वर्ग हो, मी आता जे लिहीणार आहे, त्यातून खरे व खोटे  वेगळे करणार आहोत. कसे ते बघा.  शिवकाळात जे घडले ते सत्य मांडले आहे, पण त्याच बरोबर मिथ्य़ा( काल्पनिक कथा) पुढे आल्या. त्यामागे, सावत्र मातेचे, सोयराबाईंचे कटकारस्थान होते. स्वःपुत्राला राजा करावयाचे होते. ते एका विशिष्ट घटनेने सिध्द होते. जसे कैकयीचे कपट, भरताला अयोग्य भासले व त्यांने रामाच्या पादुका  ठेऊन, राज्य संभाळले. तोच कित्ता,छ. राजारामाचे गिरवला. ते सर्व आपण पाहाणार आहोतच. पण भविष्यकाळात ही, छ.शंभू राजेच्यावर आपल्याच महाराष्ट्र देशी अन्याय केला गेला.  त्यांच्या शौर्याच्या कथा  व त्यांच्या , औरंगजेबाने, केलेल्या क्रुर हालहालाच्या हत्येच्या, सत्य घटना, अभ्यासक्रमात नसो, पण निदान  दृश्य स्वरूपात, तरूण- पौढांना दाखवायला काय हरकत होती? पण नाही. विशिष्ट समाज दुखावला जाईल, म्हणून  कलेतुन ही दाखवले नाही. उलट स्वातंत्रोत्तर काळात एका प्रतिष्ठित  सिनेमंडळाकडून, दोन चित्रपट प्रदर्शित केले होते. या आपल्या मायभूमीत. ते ...

खरे शिक्षण व आजचे शिक्षण.

 ४ .६ .२१ . छत्रपती शाहूंच्या माता व पित्यांचे जीवन.           स्वागत आहे, तुम्हा चौकस वाचकांचे , या माझ्या Blog मध्ये. इतिहासाकडे बघण्याच्या, माझ्या दृष्टीकोनाकडे, तुम्ही  interest घेऊन व कुतुहलाने, ओढ घेत आहात, याचे समाधान वाटले.          इतिहास फक्त शालेय जीवनातच, लावलेल्या क्रमिक पुस्तकापुरताच नसतो, हो. काल मी सांगितले, त्याप्रमाणे, आपल्याला खरा इति+ हास  शिकवलाच नाही. तो आज ही  अभ्यासक्रमात नाही.  त्याऐवजी इंग्रजी माध्यम म्हणून, परदेशी लेखकांच्या, कादंबरीतील भाग, प्रायमरीत शिकवला जातो.          आता प्रथम आपण, आपल्या स्वधर्मरक्षणासाठी, म्हणजे आपल्यासाठी जो अनोखा त्याग- sacrifice   आपल्या छ. शिवरायांनी केला. त्याला शंभूराजेंनी अवघ्या ८ .९ व्या वर्षी साथ दिली, त्या घटनेचे अध्ययन करू या.  हो. अभ्यासच. सगळ्यांना, आग्राहून सुटका  ही कहाणी माहित आहेच. पण त्याकडे कहाणी म्हणूनच  पाहिलेत. मिठाईच्या पेटार्‍यातून,  दोघांनी बादशहाच्या हातावर तुरी  दिली. बस....

छत्रपती शाहूंची राजकिय कारकिर्द व त्याची पाळेमुळे.

 ३ .६ २१ .  छत्रपती शाहूंची राजकिय कारकिर्द व त्याची पाळेमुळे.  बालशाहूंचे जन्मापासूनचे जीवन युवराजांचे होते.पण ऐयाशी नव्हते. शिस्तप्रिय आई व स्वराज्यासाठी लढणारे पिता कि, ज्यांना बाह्य गनिमासोबत, स्वकिय फितुरी ला तोंड द्यावे लागत होते. तसे तर  युध्द परिस्थितिमुळे, पित्याचा  सहवास  मिळत नव्हता. पण त्यांची धर्मपरायण  वृती पराक्रम याची जाणिव होतच होती.      तेव्हा छ.शाहूराजे, अभ्यासावयाचे असले तर, त्यांना घडविणार्‍या मातापिताचे सहजीवन समजून घेणे, आवश्यक आहे. हो. छ.संभाजी राजेंची आपल्या, पत्नीला मृत्युनंतर ही साथ होती. कशी तर त्या कठीण काळात, त्या पतीच्या ( ८.९ व्या वर्षी विवाह- एकत्र शिक्षण  ग्रंथ व राजनीति तसेच युध्दकला)  या आठवणीवर, योग्य निर्णय घेऊ शकल्या. छ.संभाजीराजेंनी राज्याभिषेकाच्या दिवशीच राज्ञी येसुबाईंच्या नावे, " श्री सखी राज्ञी जयती " हा शिक्का करून सभेत,बहाल केला होता.  व मुलकी अधिकार दिले होते.         जरा आपण पुन्हा, अाजच्या काळात येऊ या. आज कित्येक कमवणार्‍या व उच्च अधिकारी पदावर अस...

शिक्षण काळानुसार व गरजेशी संबंधित असावे.

 २.६ .२१.   शाहूराजांच्या त्या छावणीतील आवश्यक व शक्य असलेले शिक्षण व आजचा काळ.     वाचक हो, हे वाचन फक्त ऐतिहासिक नसून, आज ही त्या पध्दतीचा वापर कसा करावा. या बाबत, मी आपल्याला काही tips देणार आहे.      प्रथमतः हे लक्षात ठेवायला हवे, जे शिकवायचे, ते मुक्त स्वरूपात देणे, महत्वाचे ठरते. राज्ञी येसुबाईंनी, बालराजेंना, हां, तुम्ही छत्रपतीच बनणार आहात, तेव्हा, सर्वप्रकारचे ज्ञान तुम्हाला मिळवणे, भाग आहे. असा जोर दिला नाही. उलट, आज, जी CHILD PSYOCOLOGY( बाल मानस शास्त्राचे खूळ, हे खूळच म्हणेन, माजले आहे. त्याने उलट मुलांवर जास्तीच pressurised केले जाते, ते हास्यास्पद आहे. मुळात आमच्या लहानपणी, ५वर्षानंतर शिक्षणाचा प्रारंभ होत असे. लेखणी हातात पकडण्यासाठी physically maturate झालेत का, ते बघितले जाई. मग निघाली, मॉंटेसरी -३र्‍या वर्षापासून- नंतर निघाले- preschool. मुलांचे लहानपण कोळपून जातेय, यामळे, हा कोणी विचार करायचा?       आमच्या वयाची मंडळी, म्हणतात, " आमच्या लहानपणी किती छान होते, शाळा सुटली कि free bird.      ...