Posts

Showing posts from July, 2021

स्वातंत्र्याची महती सांगणारे लोकमान्य व त्यांची पुण्यतिथी - नेमके ह्याच महिन्यात देशाला मिळाले स्वातंत्र.

 ३१ ७ . २१. शनिवार. आषाढ कृ. अष्टमी.   चला. जुलै संपला. म्हणजे २०२१ अर्ध्यापेक्षा जास्त सरले. उद्या ऑगस्ट सुरू.  दोन मोठ्या घटना घडल्यात, या महिन्यात , हे महत्वाचे आहे. एक १५ ऑगस्ट- आपला स्वातंत्र्यता दिन. पण त्या अाधी, ज्यांनी देशाला स्वातंत्र्याची महती सांगणार्‍या लोकमान्य टिळकांचा १ ऑगस्ट१९२० रोजी मृत्यु झाला. वयाच्या ६४ व्या वर्षी. त्यांची पुण्य तिथी.   त्यांची महती ऐकून नव्हे तर जाणून व ती अमलात आणण्याची कोशीश करू या. निदान त्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवामागील त्यांचा हेतू जाणणे, हा उद्देश बाळगू या.   त्यांना त्या धार्मिक सणाला सार्वजनिक स्वरूप देऊन, त्या आड, इंग्रजांच्या विरोधात मोहिम उघडायची होती. व्यक्तिस्वतंत्रतेचे व स्वातंत्र्याचे महत्व भारतिय जनतेला पटवायचे होते. त्या कार्यक्रमातून भजन गायन भाषण. किर्तन प्रवचन यातून ( वरवर धार्मिक मेळ्यातून) हे साध्य होत होते., तेच मी आज या blog writting  मधून करण्याचा प्रयास करत आहे. तेव्हा 🙏 जोडून ही विनंती कि, कालचे दोन्ही एपिसोड परत परत बघा. आपण या हेतूचे काय ,  "" वाटोळे """ केलेय, याचा विचार करा...

गुरूंचे संस्कार - वागणूक विषयक व आपले सणवार- त्यांचे योग्य रितीने उत्सव. वाचा व ऐका.

Image
 ३०. ७.२१ . शुक्रवार. आषाढ कृ. सप्तमी.      गुगलवर एक बातमी वाचली. एका राजकिय नेत्यावर,दुःखाचा डोंगर कोसळला. वाचून मनात काय अाले बरे? मला तर खरेच धक्का बसला, वाटले कोणीतरी घरचे, तसे त्या परिवारातील, सर्वच वयाने लहानच. पण पूर्ण बातमी वाचली तर, त्यांचा पाळीव कुत्रा गेला. ही त्यांच्यासाठी, दुःखाची बाबच .पण जनतेला, असा" धक्का" देणे, कितपत योग्य आहे? असो. आमचा पण , "केव्हिन"ने ही ( कुत्रा)  माझ्या वडिलांच्या मृत्यु नंतर लगेच प्राण सोडले. पण ते दुःख फक्त आमचेच होय.      आपण जीवनात कशाला व केव्हा व किती महत्व देतो, हे विचार करण्यासारखे आहे.      कालपर्यंत आपण गुरू( शिक्षक) व  शिष्य( विद्यार्थी) संबंध कसे असावेत. हे बघितले. ते आपल्यावर संस्कार करतात. आपला धर्म= वागणूक कशी असावी, ते शिकवतात. इथे शिक्षक म्हणजे शालेय व कॉलेज जीवनातीलच गुरू, मला अभिप्रेत नाहीत. तर All persons, who are effictive for our good life.       मी परवा एका व्यक्तीचे, धर्म पालन करण्याबाबत कौतुक केले. जरा आता आपण आत्मकेंद्रीत होऊन, आपल्या बाबत आत्...

जेव्हा एखादा अपराध घडतो, तेव्हा आपण, अजाणतेपणे, कसे त्यात सामील होतो.

 २९.७ .२१ . गुरूवार. आषाढ . कृ. षष्ठी.    माझ्या नव्या नव्या विषयावरील माहिती मिळवण्यास उत्सुक वाचक हो.  काल मी आपल्याला माझ्या अनोख्या गुरूंबद्दल सांगितले. खरेच प्रत्येकांच्या आयुष्यात असे अनेक गुरू. असतात. बहुतेकजण, अ‍ामचे , अमूक तमूक बाबा/ बाबी ( sorry) गुरू आहेत, म्हणतात. त्यांची पुस्तके वाचून/  सभेत जाऊन आम्हाला , " शांति" मिळते.  शांति म्हणजे राग येत नाही. अाता बघा . ही गांधीगिरी, निष्क्रिय व भावना शून्य बनवते. उद्या ह्या एका गालावर कोणी मारले तर , दुसर्‍या गाल पुढे करा. या,  ह्या, "त्या महात्म्यांच्या सल्ला मागील सत्य जाणून घेऊ या.  This I am repeating again and again. कोणातरी एकाच व्यक्तीला गुरू मानणे, काही  बरोबर नाही. स्वतः दत्तगुरूंचे ३६ व कृष्णाचे २४ गुरू होते. मी एक वर्षापूर्वी, त्यांची नावे सांगितली होती.  तर पुन्हा वळू या. कालच्या लेखाकडे. मी प्रारंभी च दोन उल्लेख केले होते. त्यातील दुसरा , " दुधाच्या पिशव्या"  बद्दल, मी आज लिहिणार आहे. गुरू तोच- तो  म्हातारा डबेबाटलीवाला. झाले असे, त्यानंतर काही वर्षे गेली. आम्ह...

माझा लहानपणीचा गुरू स्वतः निरक्षर असलेला. डबे बाटलीवाला, please don't laugh at me. Laugh with me.😁.

 २८.७ २१. बुधवार. आषाढ कृ.पंचमी. डबेबाटलीवाला गुरू. दुधाच्या पिशव्या.    ही पहिली लाईन पाहून, तुम्ही सर्व गोंधळात पडला असाल नं? आपण " गुरू" कसा असावा व कसा नसावा, ह्या बाबत, विचार करीत होतो. हो. त्याच बाबतीत, हे लिखाण  आहे. रामदासस्वामी सांगतात कि आपला गुरू नीच यातिचा  नसावा. म्हणजे खालच्या दर्जाचा/ पेशाचा नसावा. पण आमच्या बाबतीत, ती एक गंमतच झाली, आमच्या लहानपणी. मी दादरला खांडके चाळीत ( नं.५) राहत होते. तिसर्‍या मजल्यावर. एकूण ९ बिर्‍हाडे.  तर आमच्या चाळीत, एक डबेबाटलीवाला आठवड्यातूण २.३ वेळा येत असे.  दिसायला ओबड धोबड काळा , अगदी कोळशा सारखा. आणि तोंड उघडले कि, समोरचा, एक दात सोनेरी. सर्व मुले जाम घाबरायची त्याला. वरतून थोडा पोक काढून पाठीवर कळकट पोते. पण आमची सर्व पालक मंडळी त्याच्यावर खूश होती. का माहित आहे? स्वतः अंगठा बहाद्दर  असलेला हा प्राणी,  काय करायचा माहितेय?  आमच्या मजल्यावर तरी, त्याचा रूबाब असायचा.  खालून त्याची आरोळी आली, "  डबे बाटलीय",  की आम्ही सर्व शाळकरी मुले, पाटी वा पुस्तक/वही घेऊन, गॅलरीत लाईनीत, अ...

गुरूवर्य मानिले जयाला, तोचि संधीसाधू निघाला, तर~~.

 २७.७ .२१ मंगळवार. आषाढ कृ.अंगारकी संकष्टी चतुर्थी.       चाणाक्ष. चातुर्य. तुर्यावस्था. चतुर.   हे चार शब्द आठवलेय, चतुर्थीवरून.    तर आपला मुद्दा आहे, गुरूंसंबंधी. या, " गुरू" शब्दाचा नेमका अर्थ आहे महान- मोठा. उलट शब्द आहे- लघु- लहान.  तसेच आपल्या नवग्रहात, जो आकाराने, मोठा आहे, तोच  "गुरू" असा संबोधला जातो. आपल्याला शिकवणारा शिक्षक, नेहमी महानच असावा,हे पटते नं? तो कोणत्याही अर्थी नीच-  कमी बुध्दीचा वा कमी नीतिचा नसावा. मागच्या आठवड्यातच बातमी ऐकली, कोणा शिक्षकाने,   "मार्क" वाढवून देण्याच्या बोलीवर , एका मुलीकडे अश्लील मागणी केली. 'असली मंडळी ' गुरू होण्याच्या लायकीची आहेत का? तिने कणखर राहून , पालकांना सांगितले व पालकांचेही कौतुक कि, त्यांनी हिंमत राखून पोलोसांत तक्रार नोदविली. आता केस होईल. कदाचित हा bail वर बाहेर येईल. एखादा क्लास उघडील आणि इतर पालक विचार न करता, तेथे admission घेतील. आपली न्याय व्यवस्था जरा  लांबड लावणारी आहे, हे कटू सत्य आहे. अशा गुन्ह्याला, रामदासस्वामींनी काय सजा सांगितली आहे, या ग्रंथात म...

आजचे शिक्षण आणि त्याला नेमका लागू पडणारा, समर्थ रामदास स्वांमीच्या दासबोधातील संकल्पना.

 २६. ७. २१ . सोमवार. आषाढ कृ. द्वितिया   काल आपण समर्थांनी सांगितलेली, गुरूची व्याख्या विचारात घेतली. मी तुम्हाला स्वयं वाचनाचा सल्ला दिला. पण मला मान्य आहे. ती भाषा तितकीशी कळायला सुलभ नाही. मला संत वाङमयाचा परिचय असल्याने ती सोप्पी वाटली. पण  कित्येक वाचकांना, ती ३०० .३५० वर्षापूर्वीची प्रचलित भाषा आकलनास अवघड वाटणार,निश्चित. मला ही जाणिव होती. मग तुम्ही म्हणाल, मग असेच का सोडले बरे,  समजाऊन न सांगता? मला हेच तुम्हाला पटवायचे आहे कि, जर लेखक वा वक्ता जेव्हा काही सांगू इच्छितो. तेव्हा समोरील विद्यार्थ्यांना कळेल अशी भाषा हवी. एक मिनिट, मी स्वतः शिक्षक म्हणवून आपल्या, सर्वांना विद्यार्थी म्हटले, म्हणून रागवू वा नाराज होऊ नका.  बघा, इंग्रजीत ही pupil  व student दोन अलग शब्द आहेत, तसेच आपण शाळा कॉलेज मधील मुलांना , " परिक्षार्थी" म्हणू या.पण तुम्ही मात्र, " विद्या+अर्थी = ज्ञानार्थी" आहात. अन् मी फक्त delivery lady आहे. पण मी त्या संतांची प्राकृत भाषा, आजच्या , " चालू" भाषेत या blog मध्ये प्रवर्तित करून, ते ज्ञान, तुम्हा सर्वांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करी...

गुरू कसा असावा, यापेक्षा कसा नसावा, इति समर्थ रामदास स्वामी (दासबोध).

 २५.७ .२१ . रविवार. आषाढ कृ. द्वितिया.         आपण बघतोय कि, गुरू नेमका कोठचा योग्य, पण समर्थ रामदास स्वामींनी , दासबोधात हेही सांगितलेय कि, गुरू कसा नसावा. बरेचदा कोठचीही गोष्ट कशी असावी, ह्याचे वर्णन करणे, विस्तृत होते तरीही काही बाबी राहून जातात. तेव्हा सोपा मार्ग म्हणजे, त्या कशा नसाव्यात, हे ठरवले कि, scope नेटका व नेमका होतो.           हेच रामदास स्वामींनी दाखवून दिले अाहे.  चांगल्या व भल्या माणसाचे गुणधर्म न सांगता, ते मूर्ख लक्षण- पढतमूर्ख- कुविद्या-  बध्दलक्षण- चंचळ लक्षण- करंटलक्षण यावर निरूपण करतात. हे करंट मराठी करंट आहे बरे, english current नव्हे हं.  तसेच त्यांनी दासबोधाच्या ५व्या दशकात  १ल्या समासात, गुरू निश्चित कसा करावा, हे सांगितलेय. अन्  दुसर्‍या समासात गुरू लक्षण सांगितली आहेत, अर्थात् यात गुरू कसा नसावा, हे स्पष्ट केले आहे.           त्या सोप्या शब्दातील ओळीच बघु या.          जे करामती दाखविती।          ...

गुरू हे समक्ष च असतात. फक्त त्यांची ओळख पटणे, महत्वाचे होय.

 २४.७ .२१ . आषाढ कृष्ण प्रतिपदा.  गुरूपौर्णिमा झाली. संपले आपले कर्तव्य. असे नसते, हो, वाचकांनो. उलट आजपासून, आपल्याला संत वाङमय आपल्यासाठी, सर्व लहानथोरांसाठी आहे, ह्याची जाणिव झाली आहे. तेव्हा ह्या साहित्याचा मागोवा घेणे,हाच खरा आनंद मार्ग अाहे. हे सत्य समजले आहे. संताचे ग्रंथ वाचणे, हे म्हातारपणीचे काम - आपण नंतर बघून घेऊ. असे म्हणू नका. आपण बर्‍याचवेळी  पूजा अर्चा याचे एक तर स्तोम माजवतो. नाहीतर आपले धर्मकर्म पाळण्याचा संकोच करतो.  याबाबत मी एक दाखला देणार आहे. खरेच हे कौतुकास्पद आहे. मी या फेब्रुवारीत, माझ्या भाच्याच्या, दिपेशच्या लग्नाला गेले होते. तेथे त्याच्या मित्राची आई, गुलशन खोजा आली होती. बाहेरगावी असल्याने, दोन दिवस एकत्र होतो. मैत्री झाली. लग्नाचे रिशेप्शन सुरू झाले. आम्ही एकत्र बसलो होतो. त्यांची नमाजची वेळ झाली. अन् तिने शांतपणे बसल्या जागीच अगदी हळू नमाज सुरू केला.  तिचे पुर्ण झाल्यावर, ती माझ्याहून लहान असून, मी तिला हात जोडले. याला म्हणतात, - नेम.   आपल्यातील ९०% लोकांनी, काय केले असते, JUST IMAGINE. Don't be angry with me.  ...

जैसे को तैसा मिला तो ही जिंदगी में मजा रहेगा।

 २३.७ .२१ . शुक्रवार. आषाढी चतुर्दशी व पौर्णिमा ही. म्हणजेच गुरूपौर्णिमा.     म्हणूनच, वाचक हो, काल मी लिहिले कि, उद्या- आज आपण, आपल्या खर्‍या गुरूंना भेटू या. अर्थात् त्यांनी त्यांच्या ग्रंथातून, जे काही लिखाण केलेय, ते जाणून घेऊ या. ज्या योगे आपले भलेच होईल. कारण ते आपल्याला एका जागी बसून देवदेव न करता,सामाजिक व मानसिक व पारिवारिक समाधान कसे मिळवायचे, ते सांगतात. हो, हे खरे कि, ज्ञानदेव- रामदास स्वामी प्रपंचात पडले नाहीत आणि तुकाराम महाराज  कुटुंबात, कमलपत्रागत राहिले. पण त्यामुळे या त्रिमुर्ती आपल्याच परिवारात अडकून न पडता, त्या पल्याड पाहू शकले.       या तिघांनी कधीच, सदैव, अगदी अपराध्यांशी ही क्षमाशील राहा,असे सांगितले नाही. उलट या प्रकाराने, सामाजिक समतोल बिघडेल,असेच ठासून सांगितले. अन् ते कोणी तरी करील. आपण बसावे चूप, हे चूक आहे, हेच कानीकपाळी ओरडून(वाचार्थाने) प्रतिपादन केले.       बघा,  कालचा लेख आठवतोय नं? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ठगाशी असावे ठग। ते काही असे नाही म्हणत, ठगांना करून द्या काहीही.  तुम्ही, मनाची...

ठगाशी असावे महाठग. नको तो, जाने दो यारों attitude.

 २२.७ .२१ . गुरूवार. आषाढ शुक्ल त्रयोदशी.   काल आषाढी एकादशी झाली. विठुराया, तु मात्र कोरडाच राहिलास नं. ठिक आहे. पंढरपुरी तुला, मऽ ऽ ऽ हा पुजा मिळाली ना, मग झाले तर. निदान कार्तिकीला तरी. असो. सध्या मी माझे कर्तव्य करणार आहे. माझ्या लाडक्या रसिक व मनस्वी वाचकांना , ज्ञानेश्वरांच्या अभंग वाणीत, भक्तिरस पाजणार आहे.   तर आधी कालच्याच दोन अभंगांचे सविस्तर रसग्रहण करू या.         पांडुरंग कांति दिव्य तेज झळकती ।        रत्नकिळा फाकती प्रभा।        अगणित लावण्यतेज पुंजाळले।         न वर्णवे तेथीची शोभा ।।१।।        कानडा तो विठ्ठलु करनाटकु।        येणे मज लावियेला वेधु।        खोळ बंधी घेउनि खुणाची पालवी।        आळविता नेदी सादु ।। २।।        किळा म्हणजे अगणित. रत्नांची जणू खाणच त्या विठ्ठलाच्या आसमंतात फाकली आहे. म्हणजे पसरली आहे. तसेच लावण्य- सौंदर्याची पुंजी- सामावली आहे. जशी आ...

कानडा विठ्ठलु करनाटकु। येणे मज लावियले वेधु।

 २१. ७. २१. बुधवार. आषाढ शुक्ल द्वादशी.    काल आषाढी एकादशी झाली. एखादा सण वा पर्व संपले म्हणतो, आपण. पण अं हं. हे तर पर्व सुरू झालेय. ते काही एका दिवशीचे नाही तर चार महिने अहोरात्र चालणारे सत्र आहे. ३० दिन * ४ मास=  १२० दिवस निरंतर चालणारे व्रत आहे. ठिक आहे. सच्चे भक्त पंढरपुरी नाही पोहोचले. पण विठ्ठल रखुमाई आज कोठे त्या जागी आहेत? ते दोघे तर गावोगावी आपल्या मनस्वी भक्तांच्या भेटीस वणवण फिरत आहेत. बघा.समस्त वारकर्‍यांना विचारा बघू. कोणत्यातरी रूपाने, त्यांना त्यांचा विठुराया भेटलाच असणार, निश्चित.     आता माझेच बघा, मी कालचा लेख लिहिताना, अडले, पुंडलिकाच्या नावावर. वय बोलू लागले. मग मी  माझ्या मैत्रिणीला, सौ. अश्विनी(शैला)मनोहर वावीकरला फोन केला. तिला ही भजनाची आवड आहे. अर्थात लगेच सांगितले, तिने.      आज पुन्हा गडबड झाली. " कानडा विठ्ठलु करनाटकु।     ही अोळ असलेला ज्ञानदेवांचा अभंगाची सुरूवात आठवेना.  वहीत सापडेना. अन् असे म्हणावे लागले कि, मैत्रिण असावी तर अशी. शोधून थकले व मोबाईल उचलला तर शैलाचा मेसेज बघ...

जय हरि विठ्ठल, जय हरि विठ्ठल। ज्ञानबा- तुकाराम।

 २०.७ .२१ . मंगळवार. आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाचा परमानंदाचा दिन. त्याची भक्त भेटीची पर्वणी. भक्त कसे तर राहत्या जागेपासून म्हणजे अनेक गावागावातून चालत - भक्तीरंगात नाहून नाचत येतात.अन् विठ्ठलाच्या लाडक्या भक्तांच्या नावाचा जप करीत येतात. तुकोबासाठी तर खुद्द विष्णुने गरूडाला पुष्पक विमानाने सदेह स्वर्गी नेले. ज्ञानोबा तर जन्मलेच कृष्णाष्टमीला. निवृत्ती- ज्ञानदेव- सोपान - हे तर त्रिमुर्तीच शंकर- विष्णू- ब्रम्हा आणि मुक्ताई- आदिमाता.  विठ्ठल- रखुमाई म्हणजे लक्ष्मी नारायणच. त्यांनीच कलियुगात ज्ञानदेवाचा अवतार घेतला.  अन् स्वतः अर्जुनाला सागितलेली गीता, सांप्रत प्रचलित असलेल्या प्राकृत भाषेत  लिहिली. तीच ज्ञानेश्वरी. तुकारामांची गाथा तर सामान्यांना साधा सरळ भक्ती मार्ग सांगते. तर या दोन्ही भक्तश्रेष्ठांचा जप करीत, जी, "पाऊले चालती पंढरीची वाट" ती रोखू नये. तर त्या भक्तांच्या, काल वर्णन केलेल्या शिस्तीचा मान राखा, ही मनोमन विनंती. यापुढे विठुरायाची मर्जी. बा विठ्ठला, तुला आठवत असेल, ४ वर्षामागे, याच आषाढी एकादशीला, भर पावसात भिजत, पण भक्तिरसात चिंब होत, तु...

वारकर्‍यांची आषाढी एकादशी व विठुरायाचे वारकरी. भेटी लावी जिवा.

 १९.७.२१ . सोमवार. आषाढ शुक्ल दशमी.    आज दशमी म्हणजे उद्या आषाढी एकादशी. पंढरपूरची यात्रा.     विठुरायाच्या भेटीने, जमणारी भक्तांची मांदियाळी. वर्षोनुवर्षे, अमाप मंडळी, पुर्‍या महाराष्ट्रातून वारी काढून येतात. पण कशी शिस्तबध्द. जणू कवायतच. जशी सैनिकांची परेड, दोनांत अंतर ठेऊन left right करतात, अगदी तसेऽच, लेझीमच्या तालावर, " ज्ञानबा तुकाराम", करीत संथ गतीने पुढे सरकते, ही मानवी साखळी.  तर सांगायचे,  म्हणजे हा सराव आपआपल्या गावी करतात. पण एकत्र आल्यावर त्या समस्त भक्तांचा ठेका, जणू सर्वाचे हात ऐकमेकांना बांधल्यागत. "ज्ञानबा" ला  हात वर लेझीमवर तो सूर ही ज्ञानबाच शब्द बोलतो. अन् " तुकाराम" ला हात खाली, तो ठेका दिर्घ- चार अक्षरी. दोन्ही नाद जुळतात.  या वारीत , गंमत म्हणजे सदैव, आपसूकच social distance पाळले जातेय. सालोसाल. हा कोरोना आत्ता आला. अाता गंमत sorry  ही बाब तर तशी गांभिर्यानी विचारात घ्यावयास हवी.   अाज पंढरपूरात प्रवेश बंदी. पण याच कोरोना काळात तेथे  निवडणूकीची एक सभा घेतली होती, आठवतेय. ना मास्क ना सोशल डिस्टन्स....

बातमीचा, " बागुलबुवा व सत्य, जे आपल्यालाच शोधायचेय.

 १८.७.२१ . रविवार. आषाढ शुक्ल.नवमी.  या, आलात, माझ्या मनस्वी वाचकहो. दिवसेदिवस आपले वाढता, वाचकवर्ग पाहून, माझा लिहिण्याचा उल्लास द्विगुणित होत आहे. कालचा विषय गंभीरच होता. तरी आपण माहित करून घेण्यात, उत्सुक आहात, हेच माझे यश आहे. अगदी खरे तर आपण जे काही करतो, त्याला इतरांकडून पावती मिळावी, ही कोणाचीही अपेक्षा असते. निरर्थक व निरपेक्ष काहीच घडत नसते. हो, मी ही मालाडला, underprivileged मुलांसाठी, १०वर्षे चालवलेल्या संस्थेतून व आदिवासी लोकांसाठी,  जे केले, ते ही काही अपेक्षेनेच केले. ती मुले चांगल्यापैकी शिकावीत व आपले जीवनमान वाढवावे, ही अपेक्षाच नं? असो.    काल मी एक विनंती केली होती. एक तर कोठचीही बातमी ऐकून, हवेवर I mean एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देऊ नका. ती घटना नेमकी का व कशी घडली असेल, त्यावर विचार करा. ती , " खबर- breaking news होण्यासाठी, पराचा कावळा केला नसेल नं? ह्याची मनोमन, स्वतःशी चर्चा करा. मग बघा मस्त timepass होईल.     यात पहिले काम म्हणजे अध्ययन. हे काही शालेय style करायला सांगत नाही. शिक्षण म्हटले कि, त्यात सात मुख्य...

आपले आपण मनन व चिंतन करून आपले मत बनवा. No breaking news.

 १७.७ .२१ . शनिवार. आषाढ शुक्ल दुर्गा अष्टमी.         आजचा दिवस दुर्गेचा, तर मी विचार केलाय, आपणही दुर्गा बनून का बघू नये? आता, " आणखीन् एक, " आ बैल मुझे मार," चा दाखला देते. खरे तर हे, मुर्खपणाचे उदाहरण नाहीये. माझ्या मते, बैलाला बदनाम करण्याचा एक पध्दतशीर प्रयोग आहे. हे गाई बैल सहसा , स्वतःहून कोणाच्या वाटेस जात नाहीत. पण काहीजण लाल कपडा दाखवून व त्याच्या समोर तो हलवून, जर बैलाला, हूल देत असतील, तर काय बोलायचे? हां, मी आज फार मोठ्ठ्या विषयाला हात घालणार आहे. मग तुम्हीच ठरवा, सरळमार्गी बैल कोण व त्याला उपसणारे कोण? ओके.         नुकतेच सर्व मिडियावर एका लग्नपत्रिकेने, धुमाकुळ घातलाय. वर्तमानपत्र, टिव्ही , मोबाईल, फेसबुक वगैरे वगैरे. ते लग्न आहे, अांतर धर्मिय प्रेम विवाह. मुलगी हिंदू व मुलगा मुस्लीम. नाशकातील घटना. सर्व वाचक ऐकून व वाचून असतीलच. मग काय ह्या लग्नाला जे विरोधक आहेत, त्यांनी म्हणे धमक्या दिल्या. मान्य कि, ही त्या दोन्ही परिवारातील खाजगी बाब आहे. इतरांनी का नाक खूपसायचे, अं? हे ही मान्य. पण मला या परिवारांना एक प्र...

आ बैल मुझे मार. मी घाबरत नाहीये.

Image
 १६.७.२१ . शुक्रवार. आषाढ शुक्ल. विवस्वत सप्तमी.   अाजचा दिवस खरे तर शुभ दिवस. पण हा मी निवडलेला विषय जऽरा शुभ म्हणता येईल का? तसे तर नाही. पण आपणच आपले दिवस शुभ व  मंगलमय ठरवू शकतो.    हिंदीत एक म्हण आहे, " जान है, तो जहाँ है।  मला मान्य आहे आज कोरोनाच्या काळात  lockdown मुळे, सर्वसामान्य जनतेला," trains allowed नाहीत. त्यामुळे कमाईची साधने, प्राप्त करावयाची तर प्रवास MUST आहे. अन् मुंबईत ट्रेनला पर्याय नाही.   स्टेशनमध्ये शिरकाव होण्यासाठी. तिकिट मिळत नाही. मग दुसरा मार्ग- आडमार्ग पत्करण्यास लोक मजबूर होतात. without ticket travelling. मग TC पासून बचावण्यासाठी, ट्रेनमधून उतरल्या नंतर, लाईनीतून चालत जाऊन, फट असेल, तेथून बाहेर पडणे. हा अपराध अाहे, माहित असून ही हाच मार्ग पत्करला जातोय. पण जरा सावध राहा नं! ज्या रूळावरून चालता , तेथे गाडी नाही, ह्याची खात्री करा. आता कालच्या "लोकसत्ता" तील बातमी बघा.    डोळे भरून आले.       " रूळ ओलांडताना तीन दिवसात १८ जणांचा मृत्यु."      १०जुलै- सातजण. ११जुलै...

पॅपिलॉन हे एक पुस्तकच साहस व हिंमत वाढवील. जसे राम:- रा= शक्ती.म= असणे. आत्मशक्ती. क्षमता.

 १५ .७ .२१ .गुरूवार. आषाढ शुक्ल पंचमी/ कुमार षष्ठी. काल मी, तुम्हा वाचकांना, माझ्या दोन short film बघावयास सांगितल्या, त्या काही timepass म्हणून नव्हे, तर फार मोठा ज्वलंत विषय आहे हा. मुलांना मोकळीक देण्याची कल्पना, पालकांच्यात वाढीस लागली. व ही समस्या निर्माण झाली. हेच खरे आहे कि, ह्याची सुरूवात नक्कीच birthday party मनमुराद सहलींतून झालीय. अन्  जल- वर्षासहली धबधबे नद्या समुद्र हेच ह्याचे आकर्षण असते. पण fact is that they doesn't know the swimming, not the natural's  rules.          म्हणून , मी सर्व मुलांचे व पालकांचे डोळे उघडण्यासाठी, नोव्हे १९ मध्ये "हादसे" व जाने २० त         " सातवी लाट" ह्या लघुपटांची निर्मिती केली. plan होता कि, कॉलेजमधून, मुलांची meeting घेऊन, ह्या फिल्म्स दाखवून चर्चा घडवायची. पण मार्च२० पासून कोरोना अन् त्यापायी झालेला lockdown. कॉलेजेस on line  सुरू झाली. मग plan फसला. पण हादसे होत राहिले. या दिड वर्षात शेकडोंनी प्राण गमावले. " गंगा उल्टी बह गयी और माँ बाप पिछे रहे।      ...

पडावे पण योग्य ठिकाणी व योग्य कारणी.

Image
 १४ .७ . २१ .बुधवार . आषाढ शुक्ल.चतुर्थी.    आजही आरंभीच एक मनोरंजक कल्पना. बघा, आजची तारीख नीट.  जुलै म्हणजे ७ ओके. दिनांक १४ ही संख्या  सात दुणे १४ अन् वर्ष २१ म्हणजे ७ त्रिक २१. आम्ही लहानपणी अशाच छोट्या छोट्या गोष्टीत गंमत शोधून आनंद मिळवायचो. आजकाल तर मोबाईल- टिव्ही - टॅब - कॉम्पूटर- लॅपटॉप- लॅपटॅब काय काय आहे, तरी मुलांमुलींना BORE होते. पालकांच्या नकळत पिकनिका काढतात. अन् त्याही धबधबे नदी समुद्र वगैरे. TRILL म्हणे. आधी पोहणे येत नसते कोणालाच. काल मी blog चा शेवट याच मुद्दावर केला होता. अरे जिगर दाखवायची तर धंद्यात , "पडून" दाखवा. अनोळखी स्थळी पाण्यात,    " पडून" कशाला?  नाहीतर,  प्रेमात " पडून"  कसले शौर्य दाखवता, अं?  असे काही  करून धनवान व्हा,की सगळ्याच्या नजरेत भराल. व मनात ठसाल.     हो, मला माहित आहे, माझे वाचक तरूण मंडळी आहेत, तसेच पौढ ही आहेत. ते म्हणतील, आता आमचा काय संबंध याच्याशी? अगदी direct नसला , आसमंतातील, सामाजिक पर्यावरण राखू शकता, सजग व  स्पष्ट बोलून. जर आजुबाजूस जर, असे , " हादसे"...

आयुष्य महत्वाचे आहे, ते जपा. पण त्यासाठी साधन ही महत्वाचे आहे, ते जोखा.

 १३. ७ .२१ . मंगळवार. आषाढ शुक्ल तृतिया.    मी काल व्यवसायासाठी must -मस्त आयडिया सांगितली. हसतमुख राहणे. तसे तर आपल्या जीवनात ही , ही संकल्पना नेहमी फायदेशीरच ठरते. नोकरीत boss शी yes sir करतोच नं, मग एखादा धंदा करावयाचा ठरवले तर  हे follow करायचे नं !     यशस्वी जीवनाचे खरे रहस्य म्हणजे सदैव एक हातचा ठेवावा.  आता बघा, तुम्ही नोकरी करता, पण त्यात     सतरादा बदल करू नका. पण  दुसरे ही काही तरी करायची, तयारी, फक्त मनाचीच नव्हे तर practically ही तयारी ठेवा. दर महिन्याला थोडा तरी fund वेगळा काढून ठेवा. त्याला  any how हात लाऊ नका. तुम्हाला माहीत आहे का, इतर धर्मात कमाईच्या, विशिष्ट % त्यांच्या  धार्मिक संस्थांना देणगी दाखल देण्याची प्रथा असते. आपण जेव्हा मंदिरात जातो, तेव्हा देवाकडे विशिष्ट मागणी  घेऊनच जातो.  नाहीतर, त्या निमित्ताने  ट्रीप काढतो. पण निरपेक्ष दान देतो का? निदान स्वतःसाठी  emergency fund साठवा.        जाने/ फेब्रु २० च्या माझ्या blog मध्ये मी एक उल्लेख केला होता...

मधाळ भाषा व जमवा व्यवसायाचा गाशा.

 १२. ७. २१. सोमवार. आषाढ शुक्ल द्वितिया.  आज पारशी अर्स्पदार्मद मासारंभ. त्यांच्या दृष्टीने महत्वाचा.  असो. काल मी दादर व पुणेच्या व्यवसायिकांचे सत्य सांगणार आहे, असे लिहिले. काल एक जोक सांगितला, पण ते निखालस सत्य होते. आज एक सत्य सांगणार आहे. पण तो जोक ठरू शकतो.  दादरला एक पूर्वीपासून साड्यांचे दुकान आहे. अर्थात् मराठी मालक. कृपया वाचल्यावर, माझ्यावर नाराज होऊ नका. फक्त विचार करा. आत शिरल्यावर विचारणा होते,   " कोणची साडी घेणार, कॉटन, वॉयल, कि सिल्क. किती पर्यंत हवी? मग प्रश्न येतो.रंग कोठचा वगैरे वगैरे .मग मोजकेच नग पुढे ठेवले जातात. बघा आटवले * का ठिकाण?😂 . मग हळूहळू सिंधी गुजराथी लोकांनी साड्यांची दुकाने टाकली.तेथला अनुभव!  सगळा माल समोर उलघडला जाई, " काय पण वांधा नाय. बघा तर आवडेलच आपला माल." फरक सांगणे न लगे.  AND NO COMMENTS      आता माझा पुण्याचा अनुभव. एका प्रसिध्द मिठाईच्या दुकानात प्रवेशले. तेथील शिरस्त्याप्रमाणे लाईन लाऊन पैसे भरले. मग मिठाई घेण्याच्या लाईनीत उभी राहिले. तेथे मला नवीन पदार्थ दिसला. म्हणून पॅकेटस घेतल्या...

व्यवसायाचे गुपित व अगदी रहस्यमय कथा.

११ .७ .२१ रविवार. आषाढ प्रारंभ प्रतिपदा.   आज आहे, रविवार.  आरामाचा दिवस, कोणासाठी  तर आठवडाभर धावपऴ व दगदग करण्यार्‍यांसाठी. म्हणजे बहुदा नोकरदारांसाठी. पण आज कित्येक नोकरदार घरीच आहेत,. या कोरोनाच्या lockdown मुळे. त्यामुळे, या रविवाराचे काही अप्रुप राहिले नाही.    पण व्यवसायिकांना विचारा, रविवार, डब्बल कमाई अन् त्यासाठी तिब्बल मेहनत.  गिर्‍हाईकांची गर्दी. आजकाल अर्धा दिवसच दुकान  उघडायला परवानगी. तरी त्यातून शोधला कि मार्ग सापडतोच.     असो. तुम्हा वाचकांची संख्या दिवसे नं दिवस वाढत आहे. त्या अर्थी माझे लिहिणे, आवडत आहे, असे दिसते. तरी माझे लिखाण जरा जास्तच परखडपणे  असते, मान्य आहे. पण आज मी एक joke सांगणार आहे. माझ्या मावस बहिणीने (सौ. चेतना वाकडे), मला forward केला. मला तो जबरदस्त भावला.      दोन्ही जमातीच्या BUSINESS MIND ची झलक दिसतेय बघा.       एका मारवाड्याने, एका सिंधी माणसाला आपली विहिर विकली. व्यवहार झाला. रितसर कागदपत्र झाली. पण झालं काय, दुसर्‍या दिवशी, मारवाडी, या नव्या विहिर मालकाकडे...

धर्म व संस्कार व बोध व सावध व आदर्श.

Image
 १०. ७ .२१ . शनिवार. जेष्ठ अमावस्या. हो. मी चुकले नाहीये. आज ही अमावस्या आहे. सुर्यादयाला ही तीच तिथी असली, तर दोन दिवस एकच तिथी धरतात.आपल्या प्रथेत व विश्वासात जरा अभ्यास करावा लागतो. म्हणून कानाडोळा करून चालत नाही. दुदैवाने आपल्यातील बरीचशी मंडळी, या सर्व प्रघात व पध्दतीवर लक्ष पुरवत नाहीत. जे उच्च  समाजातील wel cultured आहेत. ते मुलांना फक्त अभ्यास व मार्क याची पाठराखण करीत वाढवतात. इतर धार्मिक सामाजिक बाबतीत तेही चार हात दूर असतात. आजचे पालक ही ह्याच लाईनवर वाढवले गेले आहेत. पुन्हा मी आपल्या शिक्षणपध्दतीवर घसरणार आहे. आपण हिंदू, या देशात  बहुसंख्य असून ही आपल्या कायद्यानुसार, स्वातंत्र्यापासून, शाळेतून, धर्म शिक्षण देऊ शकत नाही. उलट मदरसा व कॉन्व्हेंट मधून सर्रास, त्यांच्या  धर्माचे संस्कार करू शकतात. अाता बघा, आपल्या लहानपणापासून ७० वर्षे धार्मिक म्हणून फक्त, " मनाचे श्लोक",  पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात. अर्थ समजून घेण्याबाबत, समस्त शिक्षण खाते व शिक्षक व पालक व मोठे झालेले विद्यार्थी वर्ग,  अजिबात सावध नाहीत. त्यासाठी या लेखासोबत, माझी एक  shor...

सावध मनुजा, सावध रे, करील कोणीतरी पारध रे.

 ९.७ .२१ . शुक्रवार. जेष्ठ दर्श अमावस्या.  चला, गप्पांना सुरूवात करू या.   काल  मुंबईच्या विकासावरून, जरा लक्ष हटले. कारण तसेच जबरदस्त घडले. वसई - विरारमधून, आपले हक्काचे व आइवडिलांचे घर सोडून पळून जाणार्‍या मुलांमुलींच्या संख्येतील लक्षणीय वाढ. हे फार गंभीर आहे. या बाबत  मला वाटते, specially या मुलींशी व पालकांशी एकत्रित करून बोलणे आवश्यक आहे. असो.  ही समस्या का वाढतेय, ह्याचा गंभीर विचार विमर्श करणे, जरूरी आहे. का? असे का घडत असेल. असो. सध्या आपण मुंबईच्या एकत्र निर्मिती बाबत, इतरांचा सहभाग पाहणार आहोत. त्या काळात, मुख्यत्वे करून, इंग्रजाच्या, या भगिरथ प्रयत्नात, पारसी समाज सामील होता, हे मान्य केलेच पाहिजे. त्यातील महत्वाची व्यक्ती म्हणजे, " सर जमशेटजी जिजीभाई",  परदेशाहून, हा समाज प्रथम, गुजराथेत स्थाईक झाला. ह्यांचा जन्म   गुजराथ प्रांतात, नवसारीतील मलेश्वर गावात झाला. जिजीभाई चानजीभाई व जीवनजी हे माता पिता गरीब पण अब्रुदार  जोडपे, दुदैवाने जमशेटजी, सोळा वर्षाचे असताना, एकाच वर्षी मरण पावले. तेव्हा जमशेटजी,मुंबईला, आपल्या सासर्...

तडजोड करा. पण परिवारातील सदस्यांशी करा.

 ८ .७ .२१ . गुरूवार. जेष्ठ कृष्ण चतुर्दशी.    स्वागत आहे, रसिक मर्मज्ञ वाचक हो,  या माझ्या blog मध्ये. म्हणालं आज अचानक असा औपचारिक  आरंभ का बरे? कारण तसेच आहे. आपण या मुंबईची माहिती घेत होतो. ही मुंबई, जी फक्त मूळ गिरगावापर्यंतच ओळखली जात होती. ती आज अवाढव्य पसरली आहे. मालाड बोरिवली, मुंबईपासून दूऽऽर मानले जात होते. तेथे आज त्या पल्याड विरार पर्यंत मुंबईच धरली जाते. मी स्वतः मीरारोडला राहते. पण मुंबईकरच मानते, मला. असो.     आज आपण मुंबई लक्षणीय बदलून टाकलेय. चांगल्या अर्थी तसेच, वाईट वाटतेय, पण रसातळाला पोहोचवतोय.      बघा आता ही शिक्षणक्षेत्रात अव्वल नंबर असलेली नगरी, संस्कारात मात्र घसरली आहे. हा सामाजिक प्रश्न म्हणावा, की कौटुंबिक प्रश्न म्हणावा, हेच समजत नाही.       पूर्वी बालविवाह होऊ नयेत , म्हणून समाजधुरिणांनी मोहिम उघडली,  त्या विरोधात कायदा करविला. अन् आजची ही अल्पवयीन मुले व मुलीच प्रेम करून पळून जाऊन , "लग्न"  करत्यात.  आता बघा, या फक्त वसई विरार मध्येच जानेवारी २१ ते जून २१या अवधीत २०७ मुली...

तडजोड नको. पण चांगली जीवनशेलौ हवीच.

 ७. ७ .२१ बुधवार. जेष्ठ कृष्ण त्रयोदशी.    आज मी तुम्हाला, एका जाहिरातीतील तत्वज्ञान दाखवणार आहे. generally या जाहिराती, त्यांचा माल खपवण्यासाठीच असतात. rather आपल्या गळी उतरवण्याच्या प्रयत्नात असतात. पण त्यातही बुध्दिमंताची झलक दिसते. एका builder ची जाहिरात आहे, घरे खपवण्यासाठी. अर्थात् ज्यांना घर घेण्याची निकड व क्षमता आहे, साहजिक तेच अशा जाहिराती वाचतील नं. पण या जाहिरातीने माझे मन वेधून घेतले.       त्यात म्हटलेय,  "तडजोड नाकारा. उत्कृष्ट दर्जाची जीवनशैली स्विकारा."  अगदी पटले हे! आपल्या ध्येयापासून दूर न होणे, म्हणजेच चांगली जीवनशैली.  कालच्या रिक्षावाल्या, I mean, लेक्चररने ते दाखवून दिले. पण destination मिळेपर्यंत,  तो हातावर हात ठेवून बसला नाही, विशिष्ट गोष्ट मिळेपर्यंत, आईवडिलांच्या जीवावर रिकामा/ बेकार बसला नाही.       या वरून पुन्हा मी माझ्या आवडत्या शंभूराजेच्या आदर्शवत् ग्रंथाकडे वळते. मूळ विषय,  " मुंबईची पुनर्घडण, ह्या विषयाशीच संबंधित आहे, हे त्यांचे सुभाषित.  त्या मुंबईच्या बाबतीतील त्य...

आजची मुंबई हे कोणाच्या धोरणधीराचे फलित आहे, कळले ना?

 ६ .७. २१ मंगळवार जेष्ठ कृष्णपक्ष द्वादशी.     रसिक व अभ्यासू वाचकवर्ग हो, मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या नियमित वाचनाबद्दल. खास करून सध्याचा थोडा गहन विषय असून, ही तुम्ही उत्साहाने माहिती करून घेत आहात, याबाबत मी आभारी आहे. माझ्या प्रमाणेच तुम्हीही या मुंबईच्या विकासकांच्यात " रस" घेत आहात. Really admirable.       तसेच ह्या ब्रिटीशांचे या मुंबापुरीतील विकासाचे काम तितकेच admirable आहे नं? एरवी आपल्या थंड प्रदेशाचे हवामान सोडून, या चिखलमय भागात येऊन , संकटांना तोंड देत, इथे बदल घडवायचे, काही अडले होते का त्यांना?       बस जिद्द व चिकाटी- दुसरे काय?       वरळीचा बांध तयार करून ते थांबले नाहीत, तर मूळच्या खाड्या होत्या, तेथे तेथे नळ घालून तेथील पाणी समुद्रात सोडण्याच्या त्यांच्या कृप्तीला खरोखर तोड नाही,  शिवाय बांधाच्या शेवटी, जेथे प्रत्यक्ष शहरातील सांडपाणी व समुद्राचे पाणी एकत्र होते, तेथे चुनेगच्ची ( सिमेंट)चा साकव- पूल बांधला आहे. आणखीन् गंमत म्हणजे  खालून आत पाणी यावे म्हणून कळसुत्री करून त्यात दार केले आहे, ...

दलदल/ चिखलराडा. ठरला, लक्ष्मीचा वाडा.

 ५ .७ .२१ . सोमवार जेष्ठ कृष्ण योगिनी एकादशी.   आज योगिनी एकादशी. तुम्हाला माहित आहे का, योगिनी म्हणजे काय व तिचा महिमा नेमका काय आहे? योगिनी म्हणजे आपल्या आयुष्यात,  जे काही योग येतात, मग ते चांगले वा वाईट कसे ही असले तरी, ते का येतात, त्याची समग्र माहिती व जाणिव असणे.          योगिनी म्हणजे योगाची साधना करणारी महिला. जबलपूर जवळ बेडाघाट च्या पुढे एका टेकडीवर ६४ योगिनींचे मंदीर आहे. तेथे गौरीशंकराचे देऊळ आहे. तिथे सभोवताली ६४ योगिनींच्या मुर्ती आहेत. त्या एक एक ज्ञानाच्या शाखेच्या अधिष्ठित देवता आहेत. पुर्वापार परंपरा व घटनांची - इतिहासाची माहिती असणे- त्याची जाणिव असणे, ह्यात अभिप्रेत आहे. अनेक परदेशी येथे भेट देतात.  योगिनींची नावे माहीत करून, त्यावर चर्चा करतात. आणि आपण retirement नंतर तो पैसा खर्च करून युरोपवारी करून धन्यता मानतो. असो.  ह्या योगिनींच्या नावात व विद्येत, आपण, आपल्या जीवनात मिळणार्‍या समृध्दीच्या स्त्रोताबाबत जागृत असावे व अाभारी असावे, हे मानले आहे. नेमक्या ह्या योगिनी एकादशीला मध्यबिंदू ठेऊन, मी अापल्या देशातील ...

सांप्रत समृध्द मुंबईचे निर्माते व आपण तिचे रहिवासी.

 ४.७ .२१ .जेष्ठ कृष्ण दशमी. रविवार.    रसिक व जिज्ञासू वाचक हो, आपण मुंबईची ओळख  करून घेत होतो.  कोणे एके काळी आजारांचे माहेरघर असलेली, ही  खाडीच्या दुर्गंधयुक्त हवेमुळे, रहिवासास, बेकार असणारी, ही सात बेटे आज दिमाखाने, दुनियेतील अव्वल नंबरातील नगरी ठरली आहे.       जे, तिचे निर्माते मानकरी  आहेत, त्यांचे आपण ऋणी राहणे, हीच त्यांना श्रध्दांजलि ठरेल. फक्त मुंबईकरच नव्हे तर सर्व भारतियांनी त्यांना मानवंदना द्यावयास हवी.     त्यापैकी काहीं ज्ञात नावे पाहू या.     मुंबईची जी वाट लागत होती, ती मुख्यत्वे करून, भरतीचे खारे पाणी, खाडीतून बेटातून पसरत होते, त्यामुळे जो चिखलराडा होत असे. व रोगट  हवा तयार होत असे. तेव्हा ते जे येणे बंद केले, तर या कल्पनेतूुन  १७७६ ते १७८० या काळात, जे गव्हर्नर हार्नबी होते, त्यांनी वरळीला बांध घालण्याची कल्पना अमलात  आणली. पण ती सर्वांच्या मते मुर्खाची होती.  आणि पुढे, हीच मुंबईच्या नवनिर्माणाची नांदी ठरली. गंमत म्हणजे, या निरूपयोगी बेटांची सुधारणा करण्याच्या वे...

मूळच्या बकाल, मुंबईचे आजचे संपन्न रूप कसे मिळालेय.

 ३ .७ .२१ . शनिवार जेष्ठ कृष्ण नवमी.  सर्व प्रथम, मी एका बाबतीत sorry म्हणते,काय झाले कि, घाई घाईत मी परवाच्या तपासण्याचा खर्च लिहिताना, आधी चुकून १ टाकला व amt एका digit ने वाढली, ५०००च्या ऐवजी १५००० पडले. अशाच अफवा पसरतात. भय व चिंता पसरते. so extremely sorry.     आता येऊ या मूळ विषयाकडे.  ५.६ दिवसापूर्वी, मी आपल्या मुंबईच्या इतिहास व भूगोलाविषय़ी लिहिण्याचे कबूल केले होते.  अगदी मुंबईच्या तळागाळापासून आरंभ करू या.        आज वैभवसंपन्न असणारी मुंबईनगरी, एके काळी बकाल व हमखास आजाराला आवतण देणारी होती, यावर विश्वास बसणार नाही. पण हे त्रिकालबाधित सत्य आहे. मुंबई सात बेटांची होती. हे तर मान्य आहे नं?         मुंबई शहराची मूळ परिस्थिती कशी होती व आताची स्थिती तिला कशी व कोणामुळे मिळाली आहे, याची माहिती आपल्याला , जे स्वतःला मुंबईकर म्हणवतात, rather मुंबई आमचीच मानतात, त्यांनी इत्थंभूत समजून घेणे, आवश्यक आहेच , पण इतर भारतियांनी ही जाणून घेणे, गरजेचे आहे. १६७२ मध्ये , म्हणजे, रायगडी,  आपल्या मराठी राज्याला, ...

हितधोरण व धोरणधीर.

 २.७.२१. शुक्रवार  जेष्ठ कृष्ण पक्ष अष्टमी. शुक्रवार . शुभ दिवस.        २० शे मधील २१ वे शतक. जुलै आला. म्हणजे अर्धे वरीस सरले हो. दिड वर्षे, ह्या कोरोना/ कोविडच्या विळख्यात काढली. घर एके घर. शाळा - शिक्षण हा तर पोरखेळ झालाय. काल म्हटले, त्याप्रमाणे जणू हा एकच आजार उरलाय. सर्दी ताप खोकला कुछ नही. आता बघा. आमच्या ओळखीत, एका व्यक्तीला काविळ झाली. पण कोरोना टेस्ट वगैरेत वेळ गेल्याने, ते  वैद्याकडे उशीरा पोहोचले. अन् काविळ वाढली. हे तुम्हा सर्वांना खात्रीने माहित आहेच कि, काविळीवर अॅलोपथीमध्ये उपाय नाही. मग हा कोविड मागे लागल्याने, इतर दुखण्यावरील, उपचाराला विलंब होत आहे. मी काल लिहिल्याप्रमाणे, माझा या test वरील खर्च झाला:-approx. 15000/-    आता दुसरा संदर्भ, कालचाच - संपादकिय बाबत.              " धोरणधीर" या वरून आणखी एक शब्द सुचलाय,            " हितधोरण". हितासाठी घेतलेले धोरण. स्वतःच्या नाही हं, तर समस्त जनतेच्या हितासंबंधी घेतलेले धोरण-- जर रास्त असेल, तर त्याबाबत कळकळीने...